शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
2
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
3
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
4
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
5
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
6
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
7
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी भेटणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
8
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
9
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
10
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
11
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
12
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
13
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
14
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
15
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
16
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
17
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
18
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
19
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
20
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला

भाष्य - टक्केवारीचा खेळ सारा

By admin | Updated: May 31, 2017 00:15 IST

वाढत्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अभ्यासाला पर्याय नाही, असे लहानपणापासूनच मुलांच्या मनावर बिंबवले जाते. पण अभ्यास म्हणजे

 वाढत्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अभ्यासाला पर्याय नाही, असे लहानपणापासूनच मुलांच्या मनावर बिंबवले जाते. पण अभ्यास म्हणजे ज्ञान मिळवणे नाही तर गुण मिळवणे असे समीकरण रूढ झाले आहे. याचेच पडसाद आता बोर्डाच्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवरून दिसू लागले आहेत. बारावीच्या तिन्ही बोर्डाचे निकाल जाहीर झाले आहेत.गेल्या काही वर्षात गुणांना अधिक महत्त्व प्राप्त झाल्याने अन्य बोर्डाप्रमाणे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडूनही गुण दानाचे प्रमाण वाढले आहे. ९० ते ९५ टक्के आणि ९५ टक्क्यांवर गुण मिळवण्याच्या प्रमाणात भरघोस वाढ झाली आहे. रविवारी सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मुलीला फक्त २ गुण कमी पडल्याने तिचे १०० टक्के हुकले. तिला ९९.०६ टक्के गुण मिळाले आहेत. सोमवारी जाहीर झालेल्या आयसीएसीई बोर्डाचे बारावीचे निकाल जाहीर झाले. त्यात ९९.५० टक्के गुण मिळाले आहेत. काहीसे असेच चित्र हे राज्य मंडळाच्या निकालामध्ये पहायला मिळाले आहे. यावरून असे स्पष्ट होते की, गुणाच्या स्पर्धेत काही प्रमाणत मागे असलेल्या राज्य बोर्डाने आता उडी घेतली आहे. आणि दुसरे साधर्म्य म्हणजे तिन्ही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. एकीकडे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणत घट होत असली तरी टक्केवारी ही दरवर्षी वाढत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थी तणावाचा सामना करत आहेत. टक्केवारीतही काही पूर्णांकाचा फरक पडल्याने महाविद्यालयातील प्रवेश हुकतो. अन्य बोर्डाच्या तुलनेत राज्य बोर्डाच्या अभ्यासक्र म, परीक्षा पद्धतीमध्ये फरक आहे. अन्य बोर्ड आणि राज्य बोर्ड यांच्या विद्यार्थ्यांमध्ये गुणांच्या स्पर्धेत राज्य बोर्डाचे विद्यार्थी मागे पडत होते. त्यामुळे एकाएकी गुण वाढविण्यासाठी परीक्षा पद्धतीत बदल केले गेले. पण विद्यार्थ्यांचा विचार केलेला दिसून येत नाही. सामान्य क्षमतेच्या विद्यार्थ्यांना गुण अधिक मिळूनही पुढची वाट सोपी राहिलेली नाही. त्यातच हुशार विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा अधिक रंगू लागली आहे. पण याचा नक्की किती आणि कसा फायदा विद्यार्थ्यांना होतो याचा विचार केलेला नाही. बदलाचा दिखावा होत असल्याने त्याला वेळीच आळा घातला पाहिजे. तसेच ज्ञान आणि गुण यामध्येही सुवर्णमध्य काढणे विद्यार्थ्यांच्या हिताचे होणार आहे. शिक्षण घेताना ज्ञान मिळणे याला महत्त्व प्राप्त झाले पाहिजे. गुणाच्या स्पर्धेत यशस्वी झाल्यास यशाचा मार्ग मोकळा होतो हा विचार बदलण्यासाठी शिक्षण क्षेत्रात बदल व्हायला हवेत.