शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - टक्केवारीचा खेळ सारा

By admin | Updated: May 31, 2017 00:15 IST

वाढत्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अभ्यासाला पर्याय नाही, असे लहानपणापासूनच मुलांच्या मनावर बिंबवले जाते. पण अभ्यास म्हणजे

 वाढत्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अभ्यासाला पर्याय नाही, असे लहानपणापासूनच मुलांच्या मनावर बिंबवले जाते. पण अभ्यास म्हणजे ज्ञान मिळवणे नाही तर गुण मिळवणे असे समीकरण रूढ झाले आहे. याचेच पडसाद आता बोर्डाच्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवरून दिसू लागले आहेत. बारावीच्या तिन्ही बोर्डाचे निकाल जाहीर झाले आहेत.गेल्या काही वर्षात गुणांना अधिक महत्त्व प्राप्त झाल्याने अन्य बोर्डाप्रमाणे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडूनही गुण दानाचे प्रमाण वाढले आहे. ९० ते ९५ टक्के आणि ९५ टक्क्यांवर गुण मिळवण्याच्या प्रमाणात भरघोस वाढ झाली आहे. रविवारी सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मुलीला फक्त २ गुण कमी पडल्याने तिचे १०० टक्के हुकले. तिला ९९.०६ टक्के गुण मिळाले आहेत. सोमवारी जाहीर झालेल्या आयसीएसीई बोर्डाचे बारावीचे निकाल जाहीर झाले. त्यात ९९.५० टक्के गुण मिळाले आहेत. काहीसे असेच चित्र हे राज्य मंडळाच्या निकालामध्ये पहायला मिळाले आहे. यावरून असे स्पष्ट होते की, गुणाच्या स्पर्धेत काही प्रमाणत मागे असलेल्या राज्य बोर्डाने आता उडी घेतली आहे. आणि दुसरे साधर्म्य म्हणजे तिन्ही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. एकीकडे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणत घट होत असली तरी टक्केवारी ही दरवर्षी वाढत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थी तणावाचा सामना करत आहेत. टक्केवारीतही काही पूर्णांकाचा फरक पडल्याने महाविद्यालयातील प्रवेश हुकतो. अन्य बोर्डाच्या तुलनेत राज्य बोर्डाच्या अभ्यासक्र म, परीक्षा पद्धतीमध्ये फरक आहे. अन्य बोर्ड आणि राज्य बोर्ड यांच्या विद्यार्थ्यांमध्ये गुणांच्या स्पर्धेत राज्य बोर्डाचे विद्यार्थी मागे पडत होते. त्यामुळे एकाएकी गुण वाढविण्यासाठी परीक्षा पद्धतीत बदल केले गेले. पण विद्यार्थ्यांचा विचार केलेला दिसून येत नाही. सामान्य क्षमतेच्या विद्यार्थ्यांना गुण अधिक मिळूनही पुढची वाट सोपी राहिलेली नाही. त्यातच हुशार विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा अधिक रंगू लागली आहे. पण याचा नक्की किती आणि कसा फायदा विद्यार्थ्यांना होतो याचा विचार केलेला नाही. बदलाचा दिखावा होत असल्याने त्याला वेळीच आळा घातला पाहिजे. तसेच ज्ञान आणि गुण यामध्येही सुवर्णमध्य काढणे विद्यार्थ्यांच्या हिताचे होणार आहे. शिक्षण घेताना ज्ञान मिळणे याला महत्त्व प्राप्त झाले पाहिजे. गुणाच्या स्पर्धेत यशस्वी झाल्यास यशाचा मार्ग मोकळा होतो हा विचार बदलण्यासाठी शिक्षण क्षेत्रात बदल व्हायला हवेत.