शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भाष्य - टक्केवारीचा खेळ सारा

By admin | Updated: May 31, 2017 00:15 IST

वाढत्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अभ्यासाला पर्याय नाही, असे लहानपणापासूनच मुलांच्या मनावर बिंबवले जाते. पण अभ्यास म्हणजे

 वाढत्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अभ्यासाला पर्याय नाही, असे लहानपणापासूनच मुलांच्या मनावर बिंबवले जाते. पण अभ्यास म्हणजे ज्ञान मिळवणे नाही तर गुण मिळवणे असे समीकरण रूढ झाले आहे. याचेच पडसाद आता बोर्डाच्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवरून दिसू लागले आहेत. बारावीच्या तिन्ही बोर्डाचे निकाल जाहीर झाले आहेत.गेल्या काही वर्षात गुणांना अधिक महत्त्व प्राप्त झाल्याने अन्य बोर्डाप्रमाणे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडूनही गुण दानाचे प्रमाण वाढले आहे. ९० ते ९५ टक्के आणि ९५ टक्क्यांवर गुण मिळवण्याच्या प्रमाणात भरघोस वाढ झाली आहे. रविवारी सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मुलीला फक्त २ गुण कमी पडल्याने तिचे १०० टक्के हुकले. तिला ९९.०६ टक्के गुण मिळाले आहेत. सोमवारी जाहीर झालेल्या आयसीएसीई बोर्डाचे बारावीचे निकाल जाहीर झाले. त्यात ९९.५० टक्के गुण मिळाले आहेत. काहीसे असेच चित्र हे राज्य मंडळाच्या निकालामध्ये पहायला मिळाले आहे. यावरून असे स्पष्ट होते की, गुणाच्या स्पर्धेत काही प्रमाणत मागे असलेल्या राज्य बोर्डाने आता उडी घेतली आहे. आणि दुसरे साधर्म्य म्हणजे तिन्ही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. एकीकडे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणत घट होत असली तरी टक्केवारी ही दरवर्षी वाढत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थी तणावाचा सामना करत आहेत. टक्केवारीतही काही पूर्णांकाचा फरक पडल्याने महाविद्यालयातील प्रवेश हुकतो. अन्य बोर्डाच्या तुलनेत राज्य बोर्डाच्या अभ्यासक्र म, परीक्षा पद्धतीमध्ये फरक आहे. अन्य बोर्ड आणि राज्य बोर्ड यांच्या विद्यार्थ्यांमध्ये गुणांच्या स्पर्धेत राज्य बोर्डाचे विद्यार्थी मागे पडत होते. त्यामुळे एकाएकी गुण वाढविण्यासाठी परीक्षा पद्धतीत बदल केले गेले. पण विद्यार्थ्यांचा विचार केलेला दिसून येत नाही. सामान्य क्षमतेच्या विद्यार्थ्यांना गुण अधिक मिळूनही पुढची वाट सोपी राहिलेली नाही. त्यातच हुशार विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा अधिक रंगू लागली आहे. पण याचा नक्की किती आणि कसा फायदा विद्यार्थ्यांना होतो याचा विचार केलेला नाही. बदलाचा दिखावा होत असल्याने त्याला वेळीच आळा घातला पाहिजे. तसेच ज्ञान आणि गुण यामध्येही सुवर्णमध्य काढणे विद्यार्थ्यांच्या हिताचे होणार आहे. शिक्षण घेताना ज्ञान मिळणे याला महत्त्व प्राप्त झाले पाहिजे. गुणाच्या स्पर्धेत यशस्वी झाल्यास यशाचा मार्ग मोकळा होतो हा विचार बदलण्यासाठी शिक्षण क्षेत्रात बदल व्हायला हवेत.