शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

मतदारांसमोर जाण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ

By किरण अग्रवाल | Updated: February 18, 2024 12:01 IST

Politics : प्रस्थापित राजकीय पक्षांसोबतच इतर लहान पक्षांचीही आपले अस्तित्व दर्शविण्याची धडपड दिसून येत आहे.

- किरण अग्रवाल 

पेरणीपूर्व मशागत केली जाते त्या पद्धतीने निवडणूक पूर्व संघटनात्मक बांधणीला व लोकप्रश्नांवर आंदोलने करण्याला आता मोठ्या प्रमाणात प्रारंभ झाला आहे. यात प्रस्थापित राजकीय पक्षांसोबतच इतर लहान पक्षांचीही आपले अस्तित्व दर्शविण्याची धडपड दिसून येत आहे.

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले असून, पक्ष संघटनात्मक पातळीवरील उत्साह वाढीस लावतानाच मतदारांसमोर जाण्यासाठीही त्यांच्यात चढाओढ सुरू झालेली आहे. निवेदनबाजी व जनआंदोलने त्यामुळे वाढली असून, विकासकामांच्या श्रेयाची स्पर्धाही रंगताना दिसणे स्वाभाविक ठरले आहे.

निवडणुकीची तयारी आता दिवसेंदिवस गडद होऊ पाहते आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या असून, मतदारांच्या नजरेसमोर राहण्यासाठी त्यांची उपक्रमशीलताही वाढली आहे. यावर्षी प्रथम लाेकसभा निवडणूक हाेणार असल्याने अपेक्षेप्रमाणे देशात ४०० जागांचा टप्पा गाठण्यासाठी भाजप यात सर्वांत आघाडीवर दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम वऱ्हाडतील पाच लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अकोला दौऱ्याचे नियोजन नजीकच्या काळात होत आहे. शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यातही केंद्रीय मंत्र्यांचे वरचेवर दौरे होत आहेतच; मात्र भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची महायुती असल्याने वऱ्हाडातील जागावाटपाबाबतचे चित्र स्पष्ट हाेण्याकडे नेत्यांंसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दाैराही हाेणार आहे. तत्पूर्वी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी त्यासाठी पेरणी सुरू केली आहे. वाशिम जिल्ह्यात शिवसेना नेते, मंत्र्यांचे दाैरे वाढले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनीही वाशिमचा दाैरा करून वाशिम-यवतमाळ, बुलढाणा-रावेर लाेकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचे अधाेरेखित हाेत आहे. काँग्रेस पक्षाने पश्चिम वऱ्हाडातील तीनही मतदारसंघांची चाचपणी केलेली आहे. इंडिया आघाडीतील जागावाटपाचे चित्र स्पष्ट हाेणे बाकी असले तरी त्यादृष्टीने हा पक्ष अगाेदरपासूनच कामाला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पश्चिम वऱ्हाडावर लक्ष केंद्रित केले असून आमदार अमाेल मिटकरी यांच्या माध्यमातून विकासकामांवर भर दिला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटही जाेमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. राजकीय व सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी, सामान्यांचे प्रश्न साेडविण्यासाठी नेते, कार्यकर्ते झटत आहेत. अकाेला लाेकसभा मतदारसंघाकडे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही लक्ष केंद्रित करून त्यादृष्टीने दाैरे सुरू केले आहेत.

मतदारांच्या नजरेत भरावा अशा विकासकामांवर सत्तापक्षाकडून भर दिला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते दुरुस्ती, बांधणीची कामे हाती घेण्यात आल्याचे निदर्शनात येत आहे. दुसरीकडे अकाेला जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित दराची गॅरंटी मिळावी, यासाठी शेतकरी संघर्ष यात्रेचा प्रारंभ करून ग्रामीण भाग पिंजून काढण्यावर भर दिला आहे. मनसे, बसपा, प्रहार, रिपाइं असे अन्य पक्षही आपापल्या शक्तीप्रमाणे बैठकांचा धडाका लावून आपले अस्तित्व अधोरेखित करण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहेत. शेतकरी, शेतमजूर, शहरी, ग्रामीण भागातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर सर्वच राजकीय पक्षांकडून भर देण्यात येत आहे. प्रत्येक समाज, छाेट्या-छाेट्या घटकांच्या समस्या, गाऱ्हाणे शासनदरबारी मांंडण्यासाठीची निवेदनबाजी वाढलेली आहे. उपाेषण मंडपांना भेटी देऊन सहानुभूती प्राप्त करण्यावरही भर दिला जात आहे.

येऊ घातलेली लाेकसभा निवडणूक सत्ताधाऱ्यांना जेवढी महत्त्वाची आहे, त्यापेक्षा अधिक ती विराेधी पक्षांसाठी महत्त्वाची असल्याने त्यांचे नेते, पदाधिकाऱ्यांचे ग्रामीण भागातील दाैरे वाढले आहेत. लाेकप्रतिनिधी केलेल्या कामांचे श्रेय घेऊ पाहत असून, विरोधक मात्र ती कामे पूर्वीच कशी मंजूर झाली आहेत, हे सांगण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. यावरून श्रेयवादाची लढाई रंगताना दिसत आहे.

सारांशात, निवडणूक घोषित होण्यापूर्वी सारेच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले असून मतदारांचे मन काबीज करण्यासाठी साऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. राजकीय विषय, लोकहिताचे मुद्दे व स्थानिक विकासकामे अशा विविध पातळींवर सध्या मशागत सुरू असून, यात कोण पुढे जाते, हेच आता पाहायचे.