शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

सर्वं मधु।

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 4:31 AM

धूच्या वडिलांचे निधन झाले. अंत्येष्टी संस्कार तीर्थक्षेत्री करण्याचे ठरले. दिवस थंडीचे. सकाळी उठून तीर्थक्षेत्रावर तीनदा गार पाण्याचे स्नान. मधू पार गारठला. वडिलांचे और्ध्वदेहिक आपल्या हातून व्यवस्थित पार पडावे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी या हेतूने मधूने सर्व विधी व्यवस्थित केले. विधी चालू असताना पुरोहितांनी सर्वं मधु। सर्वं मधु।

- डॉ. गोविंद काळेमधूच्या वडिलांचे निधन झाले. अंत्येष्टी संस्कार तीर्थक्षेत्री करण्याचे ठरले. दिवस थंडीचे. सकाळी उठून तीर्थक्षेत्रावर तीनदा गार पाण्याचे स्नान. मधू पार गारठला. वडिलांचे और्ध्वदेहिक आपल्या हातून व्यवस्थित पार पडावे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी या हेतूने मधूने सर्व विधी व्यवस्थित केले. विधी चालू असताना पुरोहितांनी सर्वं मधु। सर्वं मधु। सर्वं मधु असे मधुकडून त्रिवार म्हणून घेतले. मधूला वाटले वडिलांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून भटजीनी ‘सर्वं मधु’ असे त्रिवार म्हणून घेतले. म्हणजे तुमचे सर्व काही मधूच आहे असा अर्थ मधूने काढला.मधु म्हणजे मध हा सर्वांना माहीत असणारा लौकिक अर्थ. देवपूजेमध्ये पंचामृत स्नान देवास घालताना ‘मधुस्नानं समर्पयामि’ असे म्हणून पळीतील मधाचा थेंब देवाच्या अंगावर घातला जातो. तर भा. रा. तांबेंच्या गीतात ‘मधु मागसी माझ्या सख्या परि। मधु घटची रिकामे पडती घरी’ असा संदर्भ येतो. जीवनात मधाची आवश्यकता फार आहे. एखादे काम होईना तर लावा साहेबांना मधाचे बोट म्हणजे लवकर काम फत्ते होईल, असे म्हटले जाई. म्हणजे कार्यपूर्तीसाठी मधाचे बोट पाहिजे तर.वैदिक ऋषींची तर प्रार्थनाच होती.‘‘मधु वाता ऋतायते मधुक्षरंति सिन्धव:’’ ऋग्वेदाच्या प्रथम मंडलातील ९०वे सूक्त. या ठिकाणी मधुचा अर्थ पोषक शक्ती, सुमधुर, सुखकर असा करण्यात आला आहे. मधुने आपल्या जीवनात कायमचेच घर केले आहे. मधुचा मधुकर महिमा भारतीय संस्कृतीने सर्वमान्य केला आहे. आचार्य विनोबा भावेंच्या लहानशा परंतु विचाराने परिप्लुत असलेल्या पुस्तकाचे नाव आहे मधुकर.मधूच्या वडिलांची अंत्येष्टी करणाऱ्या भटजींना ‘सर्वं मधु’ हे जे तुम्ही वदवून घेतले या ठिकाणी मधुचा अर्थ काय घ्यावयाचा असे आम्ही विचारले. तेव्हा ते म्हणाले तुम्ही अजून लहान आहात. आपल्या संस्कारांची व्यवस्था पूर्वजांनी मानवी कल्याण डोळ्यापुढे ठेवूनच केली हे नि:संशय सत्य अभ्यासाअंती स्वीकारावे लागते. ‘मधु’ म्हणजे ब्रह्म. ‘सर्वं मधु’ म्हणजे सर्व ब्रह्ममय आहे. मधुचा अलौकिक अर्थ पहिल्यांदाच कुणीतरी समजावून सांगितला होता. नाशवंत विश्वाच्या ठिकाणीसुद्धा पूर्वजांनी ब्रह्म पाहिले. ब्रह्म अनुभविले. ‘ऋषे: तु दर्शनात््’ अशी ऋषींची व्याख्या केली जाते. ब्रह्मैक्य भावच त्यांनी ऋचांतून गायिला. तो जर कळला तर ‘सर्वं मधु। सर्वं मधु। सर्वं मधु हेच गाणे विश्व आनंदाने गायील.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या