शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Inside Story: 'त्या' पहाटे डार्लिंग असलेल्या अजितदादांवर भाजपाश्रेष्ठींची खप्पामर्जी का झाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 08:51 IST

एखाद्या पक्षासोबत सत्तासंसार थाटण्यापेक्षा राज्यात राष्ट्रपती राजवट आणि नंतर मध्यावधी निवडणुकीची स्थिती निर्माण करायची, असा एकूण भाजपचा रोख दिसतो.

ठळक मुद्देमहाराष्ट्र भाजपमध्ये सध्यातरी फडणवीसांना फडणवीस हेच पर्याय आहेत. तिन्ही सत्ताधारी पक्षांना अंगावर घेण्यासाठी प्रदेश भाजपला त्यांची फार गरज आहे.

देवेंद्र फडणवीस या आठवड्यात दिल्लीत गेले. त्यांच्या दोन भेटींविषयी कुठे लिहिले गेले नाही. एकतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तासभर भेटले आणि दुसरे म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांनी जवळपास दोन तास चर्चा केली. या दोन्ही भेटींमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणासंबंधीची पुढील रणनीती नक्कीच ठरली असेल. फडणवीस भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात, थिंकटँकमध्ये हळूहळू सामावले जात आहेत. त्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. कर्नाटकमध्ये वादग्रस्त सीडीमुळे मंत्रिपद गमवावे लागलेले आणि कमालीचे नाराज असलेले  रमेश जरकीहोळी हे नुकतेच मुंबईत येऊन फडणवीस यांना भेटले. ‘फडणवीस माझे नेते आहेत’, असे ते म्हणाले. बिहारचे मंत्री शाहनवाज हुसेन हेही फडणवीसांना मुंबईत येऊन भेटले. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार तोंडावर असताना फडणवीस केंद्रात जाणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते दिल्लीत गेले, तर पक्षाची राज्यात दुरवस्था होईल, ही एकच बाब त्यांना दिल्लीत जाण्यापासून रोखत आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये सध्यातरी फडणवीसांना फडणवीस हेच पर्याय आहेत. तिन्ही सत्ताधारी पक्षांना अंगावर घेण्यासाठी प्रदेश भाजपला त्यांची फार गरज आहे.

सध्याच्या घटनाक्रमाने भाजपचे आमदार, नेते, कार्यकर्तेही गोंधळलेले दिसतात. अनिल देशमुख यांची ईडी चौकशी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची भाजपने थेट अमित शहांकडे केलेली मागणी यावरून एकाच वेळी राष्ट्रवादी व शिवसेनेला हेडऑन घेण्याचे भाजप श्रेष्ठींनी ठरविलेले दिसते. ‘आता सरकार स्थापनेसाठी कोणत्याच पक्षाला डोळा मारायचा नाही, महाआघाडीतील  दोन पक्षांपैकी कोणाला भाजपसोबत सरकार स्थापन करायचे असेल, तर त्यांनी आधी सरकारमधून बाहेर पडावे, त्यानंतरच सरकार स्थापनेचे बघू. तूर्त केंद्रीय तपास यंत्रणा भुसभुशीत जमीन असलेल्या मंत्र्यांना घेरतील तेवढे घेरू देत’, असे राज्यातील भाजपच्या नेत्यांना दिल्लीहून बजावण्यात आल्याचे समजते.  एखाद्या पक्षासोबत सत्तासंसार थाटण्यापेक्षा राज्यात राष्ट्रपती राजवट आणि नंतर मध्यावधी निवडणुकीची स्थिती निर्माण करायची, असा एकूण भाजपचा रोख दिसतो.

शिवालिक, भोसले, जाधवगैरमार्गाने आलेला पैसा शेल कंपन्यांना हवालाद्वारे पाठवायचा आणि तिथून तो आपल्या संस्थांकडे देणग्या म्हणून वळवायचा ही  मोड्स ऑपरेंडी वापरणारे दोन मंत्री चौकशीच्या रडारवर येऊ शकतात. आपल्याकडे पकडला गेला तो चोर असतो, बाकीचे साव. ‘केंद्रीय तपास यंत्रणांपासून आम्हाला कृपया वाचवा,’ अशी विनवणी करत काही जण फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्याचे उंबरठे झिजवत आहेत. ‘सागर’चे सीसीटीव्ही फुटेज पाहिले, तर धक्कादायक नावे समोर येतील. गेल्या आठवड्यात स्वत:चे गृहनिर्माण वाचविण्यासाठी एक ठाणेदार दोन तास भेटून आले. अर्थात, फडणवीस असे कोणाला वाचवण्याच्या भानगडीत कधीही पडत नाहीत. त्यामुळेच त्यांचा धाक आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपची खप्पामर्जी दिसते. एकदा पहाटे-पहाटे ते भाजपचे डार्लिंग बनले होते. मात्र, आता  अजित पवार पुन्हा पहाटे राजभवनवर येण्याची शक्यता संपली आहे. असे म्हणतात की, अनिल देशमुख प्रकरणात काही अन्य नेत्यांचे ‘मनी ट्रेल’ ईडीच्या हाती लागले आहेत. त्यावरूनच राष्ट्रवादी व शिवसेनेच्या मंत्र्यांना घेरले जाऊ शकते. भाजपला त्याची कुणकुण लागल्यानेच थेट अमित शहांना पत्र लिहिले गेले. आता शहा आपल्याच पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीने केलेली मागणी केराच्या टोपलीत तर नक्कीच टाकणार नाहीत. सर्व काही ठरवून होताना दिसत आहे.  शिवालिक, भोसले, जाधव यांच्या संपत्तीवर टाच आणून कोणाची रसद बंद करविली जात आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तशी ही माणसे सर्वपक्षीय आहेत. त्या-त्यावेळी त्यांनी सगळ्यांनाच खुश केले; पण अलीकडे त्यांनी घड्याळाचे  अधिक लाड चालवलेले दिसतात.- यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय