शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: अजितदादा.. पूर्णविराम की ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 11:20 IST

Ajit Pawar:

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार या वृत्ताने गेले तीन दिवस राजकीय वर्तुळ ढवळून निघाले असताना स्वतः त्यांनीच आता जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असे स्पष्ट केल्याने तूर्त पडदा पडायला हरकत नसावी. आपल्याबाबतच्या बातम्या पेरल्या गेल्या अशी अजितदादांची तक्रार आहे. प्रसारमाध्यमांनी आता हे प्रकरण संपवावे असे आर्जवही त्यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटे झालेल्या शपथविधीनंतर अजितदादांबाबत शंकेचे वातावरण कायमच राहिले आहे. त्यामुळे त्याबाबत छोटेसेही काही घडले की लगेच त्याच्या मोठ्या बातम्या होतात. त्यातच अचानक नॉट रिचेबल होत अजितदादाच मग गॉसिपिंगला वाव देतात. गेले तीन दिवस सुरू असलेल्या चर्चेच्या मुळाशी अजित पवार यांच्यावर रोख असलेले संजय राऊत यांचे मुखपत्रातील ठोक वाक्य कारणीभूत ठरले. भाजपसोबत जाण्यासाठी आपल्या कुटुंबातील काही जणांवर दबाव असल्याचे उद्धव ठाकरेंबरोबरच्या भेटीत शरद पवार यांनीच सांगितल्याचा दावा त्यावेळी तिथे हजर असलेले राऊत यांनी केला अन् अजितदादा हे भाजपचे बोट धरणार असल्याच्या बातमीला बळ मिळाले. त्यामुळे केवळ माध्यमांनी अफवा पसरविल्याचा आरोप खरा नाही. शिवाय शरद पवार यांनी उद्योगपती अदानींसंदर्भात घेतलेल्या भूमिकेचीही किनार होतीच.

'आमच्या पक्षाच्या वतीने कोणी काही बोलण्याची गरज नाही' असे अजितदादांनी राऊत यांचे नाव न घेता खडसावले अन् राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगितले खरे; पण ४८ तास आधीच भूमिका जाहीर केली असती तर एवढा धुरळा उडालाच नसता. राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधीही लागू शकतो अशी स्थिती असताना अजित पवारांच्या संभाव्य बंडाचे टायमिंग साधले गेले. हा निकाल येईल तेव्हा वेगवान राजकीय घडामोडी घडणारच नाहीत आणि राजकीय समीकरणे बदलणारच नाहीत असे आज कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. सत्तापक्ष विरोधात आणि विरोधक सत्तापक्षात बसल्याचा व चारही प्रमुख पक्षांना सत्ताधारी बनविण्याचा अद्भुत घटनाक्रम महाराष्ट्राने २०१९ पासून अनुभवला आहे. कालचे मित्र रात्रीतून शत्रू झाले अन् कालपर्यंत दोस्तीच्या आणाभाका घेणारे एकमेकांच्या जीवावर कसे उठले हेही सगळ्यांनी पाहिले आहेच. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर चमत्कारिक घटनाक्रम घडणार नाही याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही.

आज अजितदादांच्या स्पष्टीकरणानंतर मोकळे झालेले आकाश पुन्हा दाटून येऊ शकते. घोडा-मैदान दूर नाही. न्यायालयीन निर्णयानंतर समजा सध्याचे राज्य सरकार मुख्यमंत्र्यांसह स्थिर राहिले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ऑपरेशन लोटस घडू शकेल. दिल्लीतील श्रेष्ठींनी पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भाजप- एकनाथ शिंदे युतीच्या बळावर आणि समोर महाविकास आघाडीची वज्रमूठ असताना ते शक्य नाही याचा अंदाज आल्याने अजितदादांना गळाशी लावण्याच्या हालचाली अधूनमधून उचल खात राहतील. कारण अजितदादा हे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीतील सर्वात प्रभावी नेते आहेत. ते स्पष्टवक्ते आहेतच, शिवाय एकावेळी पाचपन्नास लोकांना आमदार, खासदार करण्याची धमक त्यांच्या नेतृत्वात आहे. आपल्या सहकाऱ्यांना ताकद देणारा हा नेता आहे. त्यामुळेच असा दमदार नेता आपल्यासोबत असावा जेणेकरून मिशन ४५ साध्य होईल असे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला नक्कीच वाटत असणार.

त्यामुळे भाजप भविष्यात त्यांच्यावर जाळे टाकू शकेल. तूर्त अजितदादांच्या स्पष्टीकरणामुळे अनेकांना दिलासा मिळाला असणार. त्यांच्यासारखा दिग्गज नेता भाजपसोबत गेला असता तर महाविकास आघाडीची वज्रमूठ पार ढिली झाली असती. महाराष्ट्रात भाजपचा एकत्रितपणे मुकाबला करण्याच्या निर्धाराचे पार खोबरे झाले असते; मात्र आता या आघाडीचा जीव भांड्यात पडायला हरकत नसावी. अजितदादा भाजपसोबत गेले तर आपले काय होईल, त्यांच्या माणसांना काही मंत्रिपदे द्यावी लागतील मग आपला नंबर लागेल की नाही या विवंचनेत पडलेल्या भाजप व शिंदे गटातील आमदारांनाही हायसे वाटले असणार. अजितदादांनी मांडलेल्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीतील फूट कायमची टळली वा राष्ट्रवादी सर्वकाळ महाविकास आघाडीसोबतच राहणार हा तर्क काढणे मात्र धारिष्ट्याचे ठरेल. हा स्वल्पविराम आहे फारतर पण पूर्णविराम नक्कीच नाही...

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा