शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अग्रलेख: उसाची एआय शेती! उत्पादनामध्ये ३० टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 08:13 IST

एआय तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत, अचूकता आली आहे.

नीलेश नलावडे, तुषार जाधव कृषी विज्ञान केंद्र, बारामती

एआय... आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात आज ‘एआय’चा शिरकाव झाला आहे. एआय तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत, अचूकता आली आहे. शेतीतही एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. महाराष्ट्र त्यात आघाडीवर आहे. ऊसाची शेतीही आता एआय तंत्रज्ञानावर करण्याचे युग अवतरले आहे. ॲग्रिकल्चर डेव्हेलोपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या मार्गदर्शनानुसार काही शेतकऱ्यांनी एआयवर उसाची शेती सुरू केली आहे. त्याचे निष्कर्ष खूपच चांगले आहेत. 

एआय म्हणजे मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण करणारी संगणकीय प्रणाली. त्यात शिकण्याची, विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता असते. एआय केवळ एक तंत्रज्ञान नाही, तर मानवी जीवनात परिवर्तन घडवणारी शक्ती आहे. ती आपली भविष्यातील साथीदार ठरू शकते. एआयची सुरुवात १९५० साली अमेरिकेत झाली. संगणक वैज्ञानिक ॲलन ट्यूरिंग यांनी मशीन विचार करू शकते का? या प्रश्नावर आधारित संशोधनाला सुरुवात केली. त्यातून एआयचा जन्म झाला. 

एआयची कार्यपद्धतीड्रोन, सेन्सरमार्फत जमीन, पीक आणि हवामानातील घटकाची माहिती संकलित केली जाते. मागील अनेक वर्षांतील पारंपरिक पद्धतीने एकत्रित केलेल्या माहितीचे विश्लेषण केले जाते. एआय तंत्रज्ञानाने विश्लेषित केलेल्या आणि नकाशावरून हवामान, पीक उत्पादन, रोग व किडींचा प्रादुर्भाव यांचा अचूक अंदाज येतो. मोबाइलद्वारे किंवा ड्रोनद्वारे पिकांच्या घेतलेल्या फोटोवरून रोग व कीड तसेच अन्नद्रव्य कमतरतेची अचूक माहिती मिळते.

एआयमुळे होणारे फायदे- पेरणीची वेळ ठरवता येते.- अचूक पाणी व्यवस्थापन करता येते.- हवामानानुसार संभाव्य रोगांची माहिती मिळते, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय करता येतात. योग्य हवामानानुसार ऊस शेतीचे नियोजन करता येते. - पूर, दुष्काळ या आपत्तींसाठी पूर्वसूचना मिळते.- उसाच्या उत्पादन खर्चात बचत होते. अनावश्यक खते, पाणी, संसाधने वाचतात. - एआय आणि अचूक उपग्रह नकाशा प्रणालीच्या साहाय्याने ऊस शेतीच्या उत्पादनात  ३५% ते ४०% पर्यंत वाढ मिळते.- मातीतील पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यास मदत.- शेतकऱ्यांना प्रती टन २०० रुपयांपर्यंत अधिकचा नफा मिळण्यास मदत होईल.

एआय ठरले गेम चेंजर- एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादनामध्ये वाढ- महाराष्ट्रात ऊस उत्पादनातून मिळणारे एकूण उत्पन्न : ३०,००० कोटी ते ३५,००० कोटी - एआयमुळे उत्पादनामध्ये ३०% वाढ : अपेक्षित उत्पन्न : ४५,००० कोटी रुपये

टॅग्स :sugarcaneऊसMaharashtraमहाराष्ट्र