शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
6
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
7
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
8
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
9
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

शिवसैनिकांची कसोटी; बंडखोरी व निष्ठेचा मुद्दा निर्णायक ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 07:06 IST

गुरुवारी नाशिकचा तिढा सुटला, ती जागा अखेर शिंदेसेनेला सुटली आणि शिंदेसेनेला ठाण्याची जागा देऊन पालघरची जागा भाजप लढविणार हे स्पष्ट झाले.

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया मध्यावर आली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, ‘उद्धव ठाकरे काही आमचे शत्रू नाहीत, आजारी असताना त्यांची मी रोज विचारपूस करीत होतो आणि भविष्यातही त्यांना काही मदत लागली तर ती निश्चित करू’, अशी प्रेमळ भाषा वापरली आहे. उद्धव ठाकरे मात्र मोदींसह संपूर्ण भाजपविरुद्ध प्रचंड आक्रमक आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेची लढाई उत्तरार्धात पोहोचली आहे. पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरणे सुरू आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पाहता ही निवडणूक आधी वाटली तशी एकतर्फी होण्याची शक्यता नसल्याचे अंदाज बांधले जात आहेत. विशेषत: महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांना खूप ताकद लावावी लागत आहे.

गुरुवारी नाशिकचा तिढा सुटला, ती जागा अखेर शिंदेसेनेला सुटली आणि शिंदेसेनेला ठाण्याची जागा देऊन पालघरची जागा भाजप लढविणार हे स्पष्ट झाले. अशारीतीने राज्यातील सगळ्या लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून महायुतीमध्ये भाजप २८, शिंदेसेना १५, अजित पवारांची राष्ट्रवादी ४ व रासप एक तर महाविकास आघाडीत उद्धव सेना २१, काँग्रेस १७ व शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागा असे ४८ जागांचे वाटप आहे. महायुतीची सगळी सूत्रे भारतीय जनता पक्षाच्या हातात आहेत. जागावाटपावर भाजपचा वरचष्मा आहेच. शिवाय, मित्र पक्षाला योग्य उमेदवार मिळत नसेल तर त्याचीही जुळवाजुळव करण्याची जबाबदारी मोठा भाऊ म्हणून भाजपने घेतली आहे. त्यातूनच भाजपने रामटेकमध्ये काँग्रेसच्या आमदारांना फोडून शिंदेसेनेत प्रवेश घ्यायला लावला, तिकीटही दिले. शरद पवारांच्या भेटीगाठीत गुंतलेले महादेव जानकर यांना परत आणून त्यांना अजित पवारांच्या वाट्याचा परभणी मतदारसंघ दिला. शिवाजीराव आढळराव पाटील यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पाठवून शिरूर मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध उतरवले.

राजकीय सारीपाटावर असे मोहरे फिरविताना यंदा सर्वाधिक चर्चा झाली ती भाजपच्या सर्वेक्षणाची. वेळोवेळी त्याचाच हवाला देत देत स्वत:चे तसेच मित्रपक्षातील उमेदवारींचे निर्णय घेतले गेले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्यपूर्ण अंतिम चित्र समोर आले असून पालघर, ईशान्य मुंबई, सांगली, जळगाव व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या केवळ पाच जागांवर भाजप आणि उद्धवसेना आमने-सामने आहे. उद्धव यांच्या तुलनेत निम्म्या जागा लढविणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मात्र आठ जागांवर भाजपशी मुकाबला होत आहे. गेल्या दोन वर्षांमधील राजकीय घडामोडी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षात पडलेल्या उभ्या फुटी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न, प्रचंड गोंधळाचे राजकीय वातावरण या सगळ्यांचा विचार करता भविष्यातील राजकारणाची दिशा ठरविणारे हे चित्र आहे. महायुतीमधील जागावाटप, उमेदवारांची निवड, एकूणच लढतींचे चित्र निश्चित करण्यातील भाजपची भूमिका लक्षात घेता ही स्थिती निर्णायक म्हणावी लागेल. उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे पक्ष फुटणे, त्यासाठी ईडी, सीबीआय वगैरे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर वगैरेचे सगळे खापर भारतीय जनता पक्षावर फोडले गेले. आता ठाकरे व पवार थेट मैदानात उतरले आहेत. त्यांच्याप्रती मतदारांमध्ये सहानुभूती दिसते. तेव्हा त्या सहानुभूतीचा फटका थेट आपल्याला बसू नये, असे नक्कीच भाजपला वाटत असेल. त्यानुसार ठरवलेली व्यूहरचना अपरिहार्यदेखील होती. कारण, शिवसेनेचे गेल्या निवडणुकीत जिंकलेले राज्यातील अठरापैकी तेरा खासदार शिंदे यांच्यासोबत गेले.

जागावाटपात किमान तेवढ्या जागा वाट्याला याव्यात, यासाठी शिंदे यांनी ताकद लावली आणि त्यात त्यांना चांगले यशही आले. साहजिकच या जागांवर सेनेची ताकद असल्याने महाविकास आघाडीतही त्या जागा आपसूक उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आल्या. परिणामी, दोन्ही बाजूंनी शिवसैनिक एकमेकांविरुद्ध लढतील. यात खरे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे आहे. त्यांच्या वाट्याच्या पंधरा जागांपैकी रामटेक व कोल्हापूर वगळता उरलेल्या सर्व तेरा जागांवर निष्ठावंतांचे कडवे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये सेना विरुद्ध सेना अशी लढत होत आहे आणि साहजिकच या लढाईत बंडखोरी व निष्ठेचा मुद्दा निर्णायक ठरणार आहे. यात कोणाची सरशी होते, याकडे सर्वाधिक लक्ष असेल ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे. उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील त्यांच्या ताज्या वक्तव्याकडे त्याच दृष्टीने पाहायला हवे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना