शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांची कसोटी; बंडखोरी व निष्ठेचा मुद्दा निर्णायक ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 07:06 IST

गुरुवारी नाशिकचा तिढा सुटला, ती जागा अखेर शिंदेसेनेला सुटली आणि शिंदेसेनेला ठाण्याची जागा देऊन पालघरची जागा भाजप लढविणार हे स्पष्ट झाले.

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया मध्यावर आली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, ‘उद्धव ठाकरे काही आमचे शत्रू नाहीत, आजारी असताना त्यांची मी रोज विचारपूस करीत होतो आणि भविष्यातही त्यांना काही मदत लागली तर ती निश्चित करू’, अशी प्रेमळ भाषा वापरली आहे. उद्धव ठाकरे मात्र मोदींसह संपूर्ण भाजपविरुद्ध प्रचंड आक्रमक आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेची लढाई उत्तरार्धात पोहोचली आहे. पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरणे सुरू आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पाहता ही निवडणूक आधी वाटली तशी एकतर्फी होण्याची शक्यता नसल्याचे अंदाज बांधले जात आहेत. विशेषत: महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांना खूप ताकद लावावी लागत आहे.

गुरुवारी नाशिकचा तिढा सुटला, ती जागा अखेर शिंदेसेनेला सुटली आणि शिंदेसेनेला ठाण्याची जागा देऊन पालघरची जागा भाजप लढविणार हे स्पष्ट झाले. अशारीतीने राज्यातील सगळ्या लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून महायुतीमध्ये भाजप २८, शिंदेसेना १५, अजित पवारांची राष्ट्रवादी ४ व रासप एक तर महाविकास आघाडीत उद्धव सेना २१, काँग्रेस १७ व शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागा असे ४८ जागांचे वाटप आहे. महायुतीची सगळी सूत्रे भारतीय जनता पक्षाच्या हातात आहेत. जागावाटपावर भाजपचा वरचष्मा आहेच. शिवाय, मित्र पक्षाला योग्य उमेदवार मिळत नसेल तर त्याचीही जुळवाजुळव करण्याची जबाबदारी मोठा भाऊ म्हणून भाजपने घेतली आहे. त्यातूनच भाजपने रामटेकमध्ये काँग्रेसच्या आमदारांना फोडून शिंदेसेनेत प्रवेश घ्यायला लावला, तिकीटही दिले. शरद पवारांच्या भेटीगाठीत गुंतलेले महादेव जानकर यांना परत आणून त्यांना अजित पवारांच्या वाट्याचा परभणी मतदारसंघ दिला. शिवाजीराव आढळराव पाटील यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पाठवून शिरूर मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध उतरवले.

राजकीय सारीपाटावर असे मोहरे फिरविताना यंदा सर्वाधिक चर्चा झाली ती भाजपच्या सर्वेक्षणाची. वेळोवेळी त्याचाच हवाला देत देत स्वत:चे तसेच मित्रपक्षातील उमेदवारींचे निर्णय घेतले गेले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्यपूर्ण अंतिम चित्र समोर आले असून पालघर, ईशान्य मुंबई, सांगली, जळगाव व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या केवळ पाच जागांवर भाजप आणि उद्धवसेना आमने-सामने आहे. उद्धव यांच्या तुलनेत निम्म्या जागा लढविणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मात्र आठ जागांवर भाजपशी मुकाबला होत आहे. गेल्या दोन वर्षांमधील राजकीय घडामोडी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षात पडलेल्या उभ्या फुटी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न, प्रचंड गोंधळाचे राजकीय वातावरण या सगळ्यांचा विचार करता भविष्यातील राजकारणाची दिशा ठरविणारे हे चित्र आहे. महायुतीमधील जागावाटप, उमेदवारांची निवड, एकूणच लढतींचे चित्र निश्चित करण्यातील भाजपची भूमिका लक्षात घेता ही स्थिती निर्णायक म्हणावी लागेल. उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे पक्ष फुटणे, त्यासाठी ईडी, सीबीआय वगैरे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर वगैरेचे सगळे खापर भारतीय जनता पक्षावर फोडले गेले. आता ठाकरे व पवार थेट मैदानात उतरले आहेत. त्यांच्याप्रती मतदारांमध्ये सहानुभूती दिसते. तेव्हा त्या सहानुभूतीचा फटका थेट आपल्याला बसू नये, असे नक्कीच भाजपला वाटत असेल. त्यानुसार ठरवलेली व्यूहरचना अपरिहार्यदेखील होती. कारण, शिवसेनेचे गेल्या निवडणुकीत जिंकलेले राज्यातील अठरापैकी तेरा खासदार शिंदे यांच्यासोबत गेले.

जागावाटपात किमान तेवढ्या जागा वाट्याला याव्यात, यासाठी शिंदे यांनी ताकद लावली आणि त्यात त्यांना चांगले यशही आले. साहजिकच या जागांवर सेनेची ताकद असल्याने महाविकास आघाडीतही त्या जागा आपसूक उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आल्या. परिणामी, दोन्ही बाजूंनी शिवसैनिक एकमेकांविरुद्ध लढतील. यात खरे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे आहे. त्यांच्या वाट्याच्या पंधरा जागांपैकी रामटेक व कोल्हापूर वगळता उरलेल्या सर्व तेरा जागांवर निष्ठावंतांचे कडवे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये सेना विरुद्ध सेना अशी लढत होत आहे आणि साहजिकच या लढाईत बंडखोरी व निष्ठेचा मुद्दा निर्णायक ठरणार आहे. यात कोणाची सरशी होते, याकडे सर्वाधिक लक्ष असेल ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे. उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील त्यांच्या ताज्या वक्तव्याकडे त्याच दृष्टीने पाहायला हवे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना