शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

पुन्हा कंत्राटी भरती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 05:01 IST

राज्य शासनाने आपला कारभार चालविण्यासाठी विविध विभागांत कर्मचाऱ्यांच्या पदांना मंजुरी दिलेली असते, याचा अर्थ हे सर्व विभाग चालविण्यासाठी तेवढ्या संख्येने कर्मचारी लागतात, हे स्पष्ट आहे.

राज्य शासनाने आपला कारभार चालविण्यासाठी विविध विभागांत कर्मचाऱ्यांच्या पदांना मंजुरी दिलेली असते, याचा अर्थ हे सर्व विभाग चालविण्यासाठी तेवढ्या संख्येने कर्मचारी लागतात, हे स्पष्ट आहे. एखाद्या पदावरील व्यक्ती निवृत्त झाल्यावर पद रिक्त होते. नवीन पदे मंजूर केलेली असतात, मात्र ती भरलीच गेली नाहीत, असे प्रकार घडत असतात. शिक्षण विभागात विद्यार्थ्यांच्या कमी-अधिक प्रमाणावरून तुकड्या कमी-अधिक होतात. तुकड्या कमी झाल्या की शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरतात, संख्या वाढली तर अतिरिक्त शिक्षकांची गरज असते. अलीकडे मात्र राज्य शासन रिक्त पदेच भरायची नाहीत, असे अघोषित धोरणच राबविते आहे. परिणामी, महाराष्ट्रात विविध शासकीय विभागांत सुमारे अडीच लाख पदे रिक्त आहेत. ही पदे बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य शासनाने २०२२ मध्ये घेतला होता. विरोधी पक्षांनी या निर्णयास विरोध दर्शविला. शिवाय, स्पर्धा परीक्षा देऊन राज्य शासनाच्या सेवेत येण्यासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलने केली. अखेरीस ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. इतके सारे नाट्य घडल्यानंतरही महायुती सरकारने आरोग्य विभागात २६०० पदे भरण्यासाठी जाहिरात काढली होती. राज्य शासनाच्या  कर्मचारी भरतीसाठी यंत्रणा राबविणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी लागणारे कर्मचारीच कंत्राटी पद्धतीने भरण्यासही परवानगी देण्यात आली.

 मुळात परीक्षा-पेपरफुटीची प्रकरणे-निकाल-भरती या प्रत्येक स्तरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भोंगळ कारभारावर दीर्घकाळापासून विद्यार्थ्यांचा मोठा रोष आहे. त्यात एकीकडे बेरोजगारी वाढत असताना शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आर्थिक भार वाढू नये म्हणून रिक्त पदेच न भरण्याचे अघोषित धोरण राबविले जाते. सत्ताधारी पक्ष कुणीही असो, याबाबतीत कुणाचाच अपवाद नाही. उमेदीच्या वयातल्या तरुण-तरुणींनी पाच-दहा वर्षे स्पर्धा परीक्षा देत प्रतीक्षा केल्यानंतरही त्यांच्या पदरी निराशाच येते. कंत्राटी पद्धतीने बाह्य यंत्रणेला नोकर भरतीसाठी आमंत्रित करणे हा यावर उपाय नाही. सर्वच शासकीय विभागांच्या कामांची फेरतपासणी करून आवश्यक तेथे कर्मचारी देण्याचे धोरण स्वीकारायला हवे. काही योजना किंवा प्रकल्प संपले असतील तर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती रिक्त पदांवर करायला हरकत नाही. पण रिक्त पदेच वर्षानुवर्षे भरायची नाहीत, हा काही पर्याय नव्हे.  कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरताना आरक्षणासारख्या धोरणांची अंमलबजावणी होत नाही. शिवाय, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणावरच नसते. असे कर्मचारी ना त्या कंत्राटदार कंपनीचे असतात, ना शासनाचे! त्यांना कोणतेही संरक्षण मिळत नाही.

सरकार एकीकडे असंघटित क्षेत्रातील कर्मचारी तथा मजुरांना संरक्षण देण्यासाठी विविध योजना राबवत असताना शासनासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र असंघटित क्षेत्रात ढकलत आहे. महाराष्ट्रात सध्या अडीच लाख पदे रिक्त आहेत, असे सांगितले जाते. गेल्या वर्षी कंत्राटी कर्मचारी भरती रद्द केल्यानंतरही विदर्भात काही ठिकाणी एसटी महामंडळात शिकाऊ उमेदवार कंत्राटी पद्धतीने भरती करून घेतले गेले. विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता गेल्या सोमवारी समाप्त होताच अमरावती जिल्हा तथा सत्र न्यायालयाने पाच पदांसाठी ४४ जणांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी जाहिरात दिली आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. राज्य शासनाने यासंदर्भात एकदा योग्य धोरण आखून निर्णय घ्यायला हवा. शासन यंत्रणा उत्तम असेल तर विविध योजना आणि प्रकल्प उत्तमरीत्या राबविता येतील. ‘लाडकी बहीण’सारख्या अनियोजित योजनेला अर्थसंकल्पबाह्य कोट्यवधी रुपयांचा खर्च राज्य शासनाने आपल्या तिजोरीतून केला. त्याच्या राजकारणाचा उद्देश बाजूला ठेवला तरी तो राज्य सरकारचा खर्च होता. रिक्त पदे भरल्यानंतर इतका खर्च वाढणार नाही. शिवाय, तरुण-तरुणींना राज्य सरकारच्या सेवेत येण्याची अपेक्षा असते. त्यांनी परीक्षा देऊन स्पर्धा पार करून आले तर त्यांना संधी दिली पाहिजे. शिवाय, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतेच संरक्षण नसते, तसे सरकारसाठी काम करणाऱ्यांचे संरक्षण कवच काढून घेऊ नये, या धोरणाचा फेरविचार व्हायला हवा! राज्यात बहुमतांनी निवडून आलेले सरकार लवकरच सत्तारूढ होते आहे. या सरकारकडे भक्कम बहुमताचे कवच आहे, त्यांनी धोरणात्मक निर्णयांच्या दिशेने पावले उचलावीत. सरकारी नोकर भरती हा विषय प्राधान्य यादीत असायला हरकत नाही.