शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 7:06 AM

निसर्गाची एक मोठी विस्मयकारक रचना आहे़ या रचनेची ही विषेषता आहे की, ती नियमाने बांधील आहे़ ही सृष्टी व्यवस्थित रूपाने चालावी याकरिता निसर्गाने प्रत्येक ठिकाणी नियम बनविलेले आहे़

निसर्गाची एक मोठी विस्मयकारक रचना आहे़ या रचनेची ही विषेषता आहे की, ती नियमाने बांधील आहे़ ही सृष्टी व्यवस्थित रूपाने चालावी याकरिता निसर्गाने प्रत्येक ठिकाणी नियम बनविलेले आहे़ या नियमांचा शोध घेऊन विज्ञानाने निसर्गाच्या लुप्त असलेल्या अनेक रहस्यांची उकल केलेली असून त्याच आधारावर मानवाने सुध्दा अनेक नियम बनविलेले आहेत.

जशी निसर्ग नियमानुसार सृष्टी चालत असते, त्याचप्रमाणे मानवाने तयार केलेल्या नियमानुसार हे जीवन आणि समाज चालत असतो. जेव्हा या नियमांचे उल्लंघन होत असते, तेव्हा रचना विस्कळीत होऊन दुर्घटना घडत असते. जेव्हा समाजामधील आरोग्याचे नियम विस्कळीत होत असतात, तेव्हा शारीरिक आणि मानसिक रोगांची उत्पत्ती होत असते. जेव्हा नैतिकतेचे नियम विस्कळीत होत असतात, तेव्हा समाजामध्ये भेदभाव वाढत असतो़ आर्थिक नियमांचे उल्लंघन होणे ही या गोष्टीची साक्ष आहे की, समाजामध्ये आर्थिक गुन्हे/अपराध वाढलेले आहेत़ तसेच रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणे म्हणजेच दुर्घटनेला निमंत्रण देणे होय.़ रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करून होणाऱ्या दुर्घटना, भारतवर्षाकरिता फारच चिंताजनक अशी बाब आहे़ संपूर्ण भारतवर्षामध्ये एका वर्षात १ लक्ष ४० हजार लोक दुुर्घटनांमध्ये मृत्यू पावतात. केवळ महाराष्टÑ राज्यामध्ये रहदारींचे उल्लंघन करून मृत पावणाºयांची संख्या ३३,००० पेक्षा जास्त आहे़ इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्घटनांमध्ये मृत पावणाºया लोकांची संख्या फक्त भारतामध्येच आहे़ दुर्घटना घडण्याचे मुख्य कारण वाहन चालकांची चूक होय़ आपल्या देशामध्ये ७० ते ८० टक्के दुर्घटना या वाहनचालकांच्या चुकांमुळे घडत असतात़ सदर दु:खद दुर्घटना घडण्यामध्ये १६ ते ३५ वर्षे वय असलेल्या व्यक्तींचा सर्वात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. जो वर्ग देश, समाज आणि परिवाराचा आधार आहे, तोच या दुर्घटनेचा शिकार होत आहे़ अशा प्रकारच्या दुर्घटनांना थांबविण्याचे काम हे प्रशासनाचे तर आहेच़ परंतु सामान्य जनतेच्या सक्रिय सहयोगाशिवाय हे काम पूर्णत्वास नेणे शक्य नाही़ याचा प्रारंभ आम्ही शिकत असलेल्या शाळेतून/विद्यालयातून व्हावयास पाहिजे़ पालकांची भूमिकासुध्दा यादृष्टीने फार महत्त्वाची आहे़ पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून त्यांना समजावण्यापासून, स्वत: नियमांचे पालन करणे जरुरीचे आहे़ त्यामुळे दुर्घटनांना आळा बसण्यास फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडेल़ अशा प्रकारे दुर्घटनांमुळे होणाºया मृत्यूंंना थांबवून आम्ही कधीही न भरल्या जाऊ शकणाºया नुकसानीला आळा घालू शकतो़

 - डॉ़ भूषण कुमार उपाध्याय

टॅग्स :Accidentअपघातtraffic policeवाहतूक पोलीस