शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

उणीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:40 IST

एक अभंग. ‘जाणीव नेणीव भगवंती नाही.’ मग कुणाला आहे. जाणीव आणि नेणीव जर भगवंताला नाही तर तो निर्गुण निराकार आहे, पण तो निर्विषय नाही. त्याला संसार हा प्रमुख विषय आहे.

- किशोर पाठकएक अभंग. ‘जाणीव नेणीव भगवंती नाही.’ मग कुणाला आहे. जाणीव आणि नेणीव जर भगवंताला नाही तर तो निर्गुण निराकार आहे, पण तो निर्विषय नाही. त्याला संसार हा प्रमुख विषय आहे. आपण जाणीव हा शब्द किती अर्थाने वापरतो कळत नाही. तुला जाणीव झाली, जाणीव नाही, जाणीव ठेव, मला जाणवलंच नाही. मला जाणवलं. पण माझ्यात एक उणीव आहे म्हणजे माझ्या उणिवांची मला जाणीव आहे किंवा मला जाणिवांचीच उणीव आहे. या उणिवा जाणिवांनी भरून काढणे म्हणजे नेणिवेच्या पातळीवर जाणे. आपण नेणिवेच्या पातळीवर कधी जगत नाही.आपल्याला आपल्या उणिवा जाणवत नाहीत. ही उणिवांची जाणीव ज्याला प्रथम होते तो खरा साधक आहे. साधकाचे साध्य म्हणजे उणिवा तपासणे, त्यांचा लेखाजोखा मांडणे. त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे. एकदा जाणिवेच्या या पातळीपर्यंत प्रवास झाला की उणिवा संपतात मग नेणिवेचा प्रवास चालू होतो. तो अनंताचा प्रवास. कुसुमाग्रजांच्या भाषेत अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा... यातील ध्येयाची आसक्ती. मुळात आसक्ती हा शब्द आपण त्याज्य गोष्टींसाठी वापरतो. कुठलंही व्यसन, स्त्रीवगैरे याबाबत आसक्ती बोलली जाते. परंतु ध्येयाची आसक्ती वेगळी. ज्याला ती आसक्ती लागली ना तो खरा बेहोश, बेधुंद, मदहोश होतो हे देहभान विसरून तद्रूप होणे म्हणजे जाणिवेची परमोच्च पातळी. बंगालचे गौरांग प्रभू हे धुंद होऊन नाचायचे, मीरा होऊन. तो चैतन्यभाव, ती मीराभक्ती तुम्हाला नेणिवेच्या पातळीपर्यंत नेते. तेथूनच मुक्ती, मोक्ष, इथपर्यंत जाता येतं. म्हणजे थोडक्यात आपल्या उणिवांपासून सुरू झालेला हा जाणिवांचा प्रवास वेगळी जाणीव देत देत एक नेणिवेच्या स्थिर पातळीपर्यंत जातो. तिथेच आपला संन्यास ठरलेला आहे. हा संन्यासी म्हणजे केवळ संसारमुक्त विरागी सत्पुरुष नाही. तर संसारातील उणिवांचं मर्म ज्याला कळलं, ज्याला त्याची जाणीव झाली ती नेणिवेच्या पातळीपर्यंत जाणारी कुणीही व्यक्ती म्हणजे परमसंन्यासी, तो वेगळाच असतो. माणसाच्या मनाचा खरा प्रवास असाच असतो. कित्येकांना तो दिसतो, पण सापडत नाही, काहींना सापडतो, पुढे जाता येत नाही, काही पुढे जातात, पण गोंधळतात. काही जातात, रस्ता चुकतात. एखादाच रस्त्याने थेट जातो, पोचतो तो संत!