शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

उणीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:40 IST

एक अभंग. ‘जाणीव नेणीव भगवंती नाही.’ मग कुणाला आहे. जाणीव आणि नेणीव जर भगवंताला नाही तर तो निर्गुण निराकार आहे, पण तो निर्विषय नाही. त्याला संसार हा प्रमुख विषय आहे.

- किशोर पाठकएक अभंग. ‘जाणीव नेणीव भगवंती नाही.’ मग कुणाला आहे. जाणीव आणि नेणीव जर भगवंताला नाही तर तो निर्गुण निराकार आहे, पण तो निर्विषय नाही. त्याला संसार हा प्रमुख विषय आहे. आपण जाणीव हा शब्द किती अर्थाने वापरतो कळत नाही. तुला जाणीव झाली, जाणीव नाही, जाणीव ठेव, मला जाणवलंच नाही. मला जाणवलं. पण माझ्यात एक उणीव आहे म्हणजे माझ्या उणिवांची मला जाणीव आहे किंवा मला जाणिवांचीच उणीव आहे. या उणिवा जाणिवांनी भरून काढणे म्हणजे नेणिवेच्या पातळीवर जाणे. आपण नेणिवेच्या पातळीवर कधी जगत नाही.आपल्याला आपल्या उणिवा जाणवत नाहीत. ही उणिवांची जाणीव ज्याला प्रथम होते तो खरा साधक आहे. साधकाचे साध्य म्हणजे उणिवा तपासणे, त्यांचा लेखाजोखा मांडणे. त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे. एकदा जाणिवेच्या या पातळीपर्यंत प्रवास झाला की उणिवा संपतात मग नेणिवेचा प्रवास चालू होतो. तो अनंताचा प्रवास. कुसुमाग्रजांच्या भाषेत अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा... यातील ध्येयाची आसक्ती. मुळात आसक्ती हा शब्द आपण त्याज्य गोष्टींसाठी वापरतो. कुठलंही व्यसन, स्त्रीवगैरे याबाबत आसक्ती बोलली जाते. परंतु ध्येयाची आसक्ती वेगळी. ज्याला ती आसक्ती लागली ना तो खरा बेहोश, बेधुंद, मदहोश होतो हे देहभान विसरून तद्रूप होणे म्हणजे जाणिवेची परमोच्च पातळी. बंगालचे गौरांग प्रभू हे धुंद होऊन नाचायचे, मीरा होऊन. तो चैतन्यभाव, ती मीराभक्ती तुम्हाला नेणिवेच्या पातळीपर्यंत नेते. तेथूनच मुक्ती, मोक्ष, इथपर्यंत जाता येतं. म्हणजे थोडक्यात आपल्या उणिवांपासून सुरू झालेला हा जाणिवांचा प्रवास वेगळी जाणीव देत देत एक नेणिवेच्या स्थिर पातळीपर्यंत जातो. तिथेच आपला संन्यास ठरलेला आहे. हा संन्यासी म्हणजे केवळ संसारमुक्त विरागी सत्पुरुष नाही. तर संसारातील उणिवांचं मर्म ज्याला कळलं, ज्याला त्याची जाणीव झाली ती नेणिवेच्या पातळीपर्यंत जाणारी कुणीही व्यक्ती म्हणजे परमसंन्यासी, तो वेगळाच असतो. माणसाच्या मनाचा खरा प्रवास असाच असतो. कित्येकांना तो दिसतो, पण सापडत नाही, काहींना सापडतो, पुढे जाता येत नाही, काही पुढे जातात, पण गोंधळतात. काही जातात, रस्ता चुकतात. एखादाच रस्त्याने थेट जातो, पोचतो तो संत!