शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

उणीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:40 IST

एक अभंग. ‘जाणीव नेणीव भगवंती नाही.’ मग कुणाला आहे. जाणीव आणि नेणीव जर भगवंताला नाही तर तो निर्गुण निराकार आहे, पण तो निर्विषय नाही. त्याला संसार हा प्रमुख विषय आहे.

- किशोर पाठकएक अभंग. ‘जाणीव नेणीव भगवंती नाही.’ मग कुणाला आहे. जाणीव आणि नेणीव जर भगवंताला नाही तर तो निर्गुण निराकार आहे, पण तो निर्विषय नाही. त्याला संसार हा प्रमुख विषय आहे. आपण जाणीव हा शब्द किती अर्थाने वापरतो कळत नाही. तुला जाणीव झाली, जाणीव नाही, जाणीव ठेव, मला जाणवलंच नाही. मला जाणवलं. पण माझ्यात एक उणीव आहे म्हणजे माझ्या उणिवांची मला जाणीव आहे किंवा मला जाणिवांचीच उणीव आहे. या उणिवा जाणिवांनी भरून काढणे म्हणजे नेणिवेच्या पातळीवर जाणे. आपण नेणिवेच्या पातळीवर कधी जगत नाही.आपल्याला आपल्या उणिवा जाणवत नाहीत. ही उणिवांची जाणीव ज्याला प्रथम होते तो खरा साधक आहे. साधकाचे साध्य म्हणजे उणिवा तपासणे, त्यांचा लेखाजोखा मांडणे. त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे. एकदा जाणिवेच्या या पातळीपर्यंत प्रवास झाला की उणिवा संपतात मग नेणिवेचा प्रवास चालू होतो. तो अनंताचा प्रवास. कुसुमाग्रजांच्या भाषेत अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा... यातील ध्येयाची आसक्ती. मुळात आसक्ती हा शब्द आपण त्याज्य गोष्टींसाठी वापरतो. कुठलंही व्यसन, स्त्रीवगैरे याबाबत आसक्ती बोलली जाते. परंतु ध्येयाची आसक्ती वेगळी. ज्याला ती आसक्ती लागली ना तो खरा बेहोश, बेधुंद, मदहोश होतो हे देहभान विसरून तद्रूप होणे म्हणजे जाणिवेची परमोच्च पातळी. बंगालचे गौरांग प्रभू हे धुंद होऊन नाचायचे, मीरा होऊन. तो चैतन्यभाव, ती मीराभक्ती तुम्हाला नेणिवेच्या पातळीपर्यंत नेते. तेथूनच मुक्ती, मोक्ष, इथपर्यंत जाता येतं. म्हणजे थोडक्यात आपल्या उणिवांपासून सुरू झालेला हा जाणिवांचा प्रवास वेगळी जाणीव देत देत एक नेणिवेच्या स्थिर पातळीपर्यंत जातो. तिथेच आपला संन्यास ठरलेला आहे. हा संन्यासी म्हणजे केवळ संसारमुक्त विरागी सत्पुरुष नाही. तर संसारातील उणिवांचं मर्म ज्याला कळलं, ज्याला त्याची जाणीव झाली ती नेणिवेच्या पातळीपर्यंत जाणारी कुणीही व्यक्ती म्हणजे परमसंन्यासी, तो वेगळाच असतो. माणसाच्या मनाचा खरा प्रवास असाच असतो. कित्येकांना तो दिसतो, पण सापडत नाही, काहींना सापडतो, पुढे जाता येत नाही, काही पुढे जातात, पण गोंधळतात. काही जातात, रस्ता चुकतात. एखादाच रस्त्याने थेट जातो, पोचतो तो संत!