शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

उणीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:40 IST

एक अभंग. ‘जाणीव नेणीव भगवंती नाही.’ मग कुणाला आहे. जाणीव आणि नेणीव जर भगवंताला नाही तर तो निर्गुण निराकार आहे, पण तो निर्विषय नाही. त्याला संसार हा प्रमुख विषय आहे.

- किशोर पाठकएक अभंग. ‘जाणीव नेणीव भगवंती नाही.’ मग कुणाला आहे. जाणीव आणि नेणीव जर भगवंताला नाही तर तो निर्गुण निराकार आहे, पण तो निर्विषय नाही. त्याला संसार हा प्रमुख विषय आहे. आपण जाणीव हा शब्द किती अर्थाने वापरतो कळत नाही. तुला जाणीव झाली, जाणीव नाही, जाणीव ठेव, मला जाणवलंच नाही. मला जाणवलं. पण माझ्यात एक उणीव आहे म्हणजे माझ्या उणिवांची मला जाणीव आहे किंवा मला जाणिवांचीच उणीव आहे. या उणिवा जाणिवांनी भरून काढणे म्हणजे नेणिवेच्या पातळीवर जाणे. आपण नेणिवेच्या पातळीवर कधी जगत नाही.आपल्याला आपल्या उणिवा जाणवत नाहीत. ही उणिवांची जाणीव ज्याला प्रथम होते तो खरा साधक आहे. साधकाचे साध्य म्हणजे उणिवा तपासणे, त्यांचा लेखाजोखा मांडणे. त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे. एकदा जाणिवेच्या या पातळीपर्यंत प्रवास झाला की उणिवा संपतात मग नेणिवेचा प्रवास चालू होतो. तो अनंताचा प्रवास. कुसुमाग्रजांच्या भाषेत अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा... यातील ध्येयाची आसक्ती. मुळात आसक्ती हा शब्द आपण त्याज्य गोष्टींसाठी वापरतो. कुठलंही व्यसन, स्त्रीवगैरे याबाबत आसक्ती बोलली जाते. परंतु ध्येयाची आसक्ती वेगळी. ज्याला ती आसक्ती लागली ना तो खरा बेहोश, बेधुंद, मदहोश होतो हे देहभान विसरून तद्रूप होणे म्हणजे जाणिवेची परमोच्च पातळी. बंगालचे गौरांग प्रभू हे धुंद होऊन नाचायचे, मीरा होऊन. तो चैतन्यभाव, ती मीराभक्ती तुम्हाला नेणिवेच्या पातळीपर्यंत नेते. तेथूनच मुक्ती, मोक्ष, इथपर्यंत जाता येतं. म्हणजे थोडक्यात आपल्या उणिवांपासून सुरू झालेला हा जाणिवांचा प्रवास वेगळी जाणीव देत देत एक नेणिवेच्या स्थिर पातळीपर्यंत जातो. तिथेच आपला संन्यास ठरलेला आहे. हा संन्यासी म्हणजे केवळ संसारमुक्त विरागी सत्पुरुष नाही. तर संसारातील उणिवांचं मर्म ज्याला कळलं, ज्याला त्याची जाणीव झाली ती नेणिवेच्या पातळीपर्यंत जाणारी कुणीही व्यक्ती म्हणजे परमसंन्यासी, तो वेगळाच असतो. माणसाच्या मनाचा खरा प्रवास असाच असतो. कित्येकांना तो दिसतो, पण सापडत नाही, काहींना सापडतो, पुढे जाता येत नाही, काही पुढे जातात, पण गोंधळतात. काही जातात, रस्ता चुकतात. एखादाच रस्त्याने थेट जातो, पोचतो तो संत!