शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

अखंड हिरव्या बोलीचं ‘महानोर’ नावाचं झाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 10:43 IST

महानोरांची कविता जगण्यातून आली. ती रानातली कविता आहे! लोकपरंपरा आणि आधुनिकतेच्या बांधावर उभे राहून त्यांनी कवितेची मशागत केली!

शंभू पाटील, ख्यातनाम लेखक, रंगकर्मी -

कवीचं काही वय असतं का ? कवी कधी म्हातारा होतो का ?कवी कधी मरतो का ?  कवीचं शरीर थकतं, तो काळाचा महिमा; पण कवी शाश्वत असतो. कविता नावाची अद्भुत गोष्ट काळाला पुरून उरते, कवी कायमचा मनात कोरलेला असतो. मनावर कोरलेले काहीच कवी असतात, अशा मराठी कवींमध्ये महानोर दादा आहेत. ब्याऐंशीव्या वर्षी दादा गेले, म्हणजे दादांचं शरीर गेलं; त्यांची कविता मात्र अजरामर आहे.

दादांची कविता राज्यकर्त्यांना मोहात पाडते, कवितेचे अभ्यासक चकित होऊन या कवितेबद्दल बोलत राहतात, समीक्षक यातील शब्दकळा बघून अवाक होतात, विद्यापीठात यावर चर्चासत्र सुरू असतं तेव्हा कुठे तरी शेतात पाणी भरणारा शेतमजूर ही कविता म्हणत असतो, बांधावर बसून राखण करणारा पोरगा ही कविता गात असतो, एखादी बाई घरकाम करता करता त्यांचे शब्द गुणगुणत असते... किती कवींच्या वाट्याला हे भाग्य येतं ? मानवाला विस्मरणाचा शाप आहे; पण महानोरांच्या कविता मनातून जात नाहीत त्या नाहीतच!

पळसखेड अगदी छोटंसं गाव. या गावाच्या बाहेर असलेल्या शेतातल्या कुडाच्या झोपडीत मराठीत शतकानुशतके पुरून उरेल अशी कविता लिहिणारा हा शेतकरी. ज्याचं नातं तुकारामाशी अगदी घट्ट बांधल गेलं होतं. जात्यावर ओव्या म्हणणाऱ्या आईने कवितेची ओळख करून दिली; आयुष्यभर हा कवी त्या कवितेचा पदर पकडून प्रार्थना करत राहिला!

या नभाने या भुईला दान द्यावे या मातीतुनी चैतन्य गावे...कवीची कविता जगण्यातून आली तर ती श्रेष्ठ कविता असते. महानोरांची कविता अशीच जगण्यातून आली, म्हणून ती रानातली कविता आहे. चांगल्या गीतकाराला एरवी कधी कवी समजलं जात नाही, चांगला कवी गीतकार असतोच असंही नाही; पण अजरामर गाणी लिहिणारे महानोर तितकेच थोर कवी होते; हे किती दुर्मीळ आहे! आपल्या लोकपरंपरा पूर्ण रीचवत त्यांना आधुनिक कवितेचा  आयाम देणारा हा कवी लोकपरंपरा आणि आधुनिक कविता यांच्या बांधावर कवितेची मशागत करत होता!  

सूर्यनारायणा नित नेमाने उगवाअंधाराच्या ठायी थोडा उजेड पाठवामराठी साहित्यात हा उजेड अनेकांच्या जीवनात प्रकाश घेऊन आला. आडवळणाच्या  खेड्यातील या कवीसाठी मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण, कुसुमाग्रज, लताबाई, पुलं आणि शरद पवारांपासून कित्येक मान्यवर  रस्ता नसलेल्या त्यांच्या गावात जात राहिले! किती किती जणांनी महानोरांवर, त्यांच्या कवितांवर लोभ केला! प्रतिभावंत लेखक, संगीतकार, गायक असोत, की शरद पवारांसारखे राजकीय नेते आणि भवरलाल जैन यांच्यासारखे रसिकाग्रणी उद्योगपती असोत, की त्यांच्या कविता-गाण्यांवर जीव ओवाळणारी सामान्य माणसं; महानोरांना भरभरून स्नेह लाभला! 

...हे सगळं असताना दुःखाची वर्तुळंही कायम या माणसाभोवती गरगरत राहिली!जन्माचेच दुःख, जन्मभर असोमला न काही, त्याचे फारसेअसं म्हणत दुःखावर मात करत, शेतीत सतत नवनवे प्रयोग करत आयुष्यभर शेती करत राहणारा हा शेतकरी  शेतकऱ्यांना कायम प्रेरणा देत राहिला. पाणलोट क्षेत्र, फळबागांसाठीचं धोरण;  शेती समृद्ध करण्यासाठी या माणसाने आपली आमदारकी वापरली. दोन वेळा आमदार असून महानोर यांची कोणतीही संस्था नाही की मुंबईतच काय; पण जळगावमध्येदेखील त्यांचा स्वतःचा फ्लॅट नाही.  जे केलं ते शेतीसाठी केलं, जे मिळवलं ते शेतीमधून मिळवलं. 

कष्टाला कल्पकतेची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली की शेती पोट भरून देते, असं ते वारंवार सांगायचे. शेतकरी आत्महत्या हा शेवटपर्यंत त्यांना अस्वस्थ करणारा विषय होता. आत्महत्या हा आपला मार्ग नाही असं प्रत्यक्ष कृतीतून पटवून देत दादा शेवटपर्यंत शेतीत प्रयोग करत राहिले. 

त्यांचा सांभाळ करणारी मुलं, मुली आणि लाडका नातू शशी; हे सगळे आहेत; पण सुलोचना काकूंनी दादांची साथ अर्ध्यातच सोडली. दोन वर्षांपूर्वी त्या गेल्या आणि कोणत्याही दुःखाने न हललेला हा कवी अंतर्बाह्य हादरला! अनेक व्याधी व आजार यांच्यासोबतचा दादांचा लढा सुरू होता. 

निष्पर्ण झालेल्या सीताफळाला पावसाच्या पहिल्या थेंबाने पालवी फुटते, गर्द हिरवा रंग धारण करून हे झाड फळांनी लदबदून जातं,  तसंच आम्हाला सावली देणारं  महानोर नावाचं झाड पुन्हा बहरून येईल असं वाटलं होतं; पण हिरव्या बोलीचा शब्द झालेले दादा आज सर्वत्र हिरवळ असताना तिला अबोल करून निघून गेले आहेत!

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Songsमराठी गाणीMaharashtraमहाराष्ट्र