शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

अखंड हिरव्या बोलीचं ‘महानोर’ नावाचं झाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 10:43 IST

महानोरांची कविता जगण्यातून आली. ती रानातली कविता आहे! लोकपरंपरा आणि आधुनिकतेच्या बांधावर उभे राहून त्यांनी कवितेची मशागत केली!

शंभू पाटील, ख्यातनाम लेखक, रंगकर्मी -

कवीचं काही वय असतं का ? कवी कधी म्हातारा होतो का ?कवी कधी मरतो का ?  कवीचं शरीर थकतं, तो काळाचा महिमा; पण कवी शाश्वत असतो. कविता नावाची अद्भुत गोष्ट काळाला पुरून उरते, कवी कायमचा मनात कोरलेला असतो. मनावर कोरलेले काहीच कवी असतात, अशा मराठी कवींमध्ये महानोर दादा आहेत. ब्याऐंशीव्या वर्षी दादा गेले, म्हणजे दादांचं शरीर गेलं; त्यांची कविता मात्र अजरामर आहे.

दादांची कविता राज्यकर्त्यांना मोहात पाडते, कवितेचे अभ्यासक चकित होऊन या कवितेबद्दल बोलत राहतात, समीक्षक यातील शब्दकळा बघून अवाक होतात, विद्यापीठात यावर चर्चासत्र सुरू असतं तेव्हा कुठे तरी शेतात पाणी भरणारा शेतमजूर ही कविता म्हणत असतो, बांधावर बसून राखण करणारा पोरगा ही कविता गात असतो, एखादी बाई घरकाम करता करता त्यांचे शब्द गुणगुणत असते... किती कवींच्या वाट्याला हे भाग्य येतं ? मानवाला विस्मरणाचा शाप आहे; पण महानोरांच्या कविता मनातून जात नाहीत त्या नाहीतच!

पळसखेड अगदी छोटंसं गाव. या गावाच्या बाहेर असलेल्या शेतातल्या कुडाच्या झोपडीत मराठीत शतकानुशतके पुरून उरेल अशी कविता लिहिणारा हा शेतकरी. ज्याचं नातं तुकारामाशी अगदी घट्ट बांधल गेलं होतं. जात्यावर ओव्या म्हणणाऱ्या आईने कवितेची ओळख करून दिली; आयुष्यभर हा कवी त्या कवितेचा पदर पकडून प्रार्थना करत राहिला!

या नभाने या भुईला दान द्यावे या मातीतुनी चैतन्य गावे...कवीची कविता जगण्यातून आली तर ती श्रेष्ठ कविता असते. महानोरांची कविता अशीच जगण्यातून आली, म्हणून ती रानातली कविता आहे. चांगल्या गीतकाराला एरवी कधी कवी समजलं जात नाही, चांगला कवी गीतकार असतोच असंही नाही; पण अजरामर गाणी लिहिणारे महानोर तितकेच थोर कवी होते; हे किती दुर्मीळ आहे! आपल्या लोकपरंपरा पूर्ण रीचवत त्यांना आधुनिक कवितेचा  आयाम देणारा हा कवी लोकपरंपरा आणि आधुनिक कविता यांच्या बांधावर कवितेची मशागत करत होता!  

सूर्यनारायणा नित नेमाने उगवाअंधाराच्या ठायी थोडा उजेड पाठवामराठी साहित्यात हा उजेड अनेकांच्या जीवनात प्रकाश घेऊन आला. आडवळणाच्या  खेड्यातील या कवीसाठी मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण, कुसुमाग्रज, लताबाई, पुलं आणि शरद पवारांपासून कित्येक मान्यवर  रस्ता नसलेल्या त्यांच्या गावात जात राहिले! किती किती जणांनी महानोरांवर, त्यांच्या कवितांवर लोभ केला! प्रतिभावंत लेखक, संगीतकार, गायक असोत, की शरद पवारांसारखे राजकीय नेते आणि भवरलाल जैन यांच्यासारखे रसिकाग्रणी उद्योगपती असोत, की त्यांच्या कविता-गाण्यांवर जीव ओवाळणारी सामान्य माणसं; महानोरांना भरभरून स्नेह लाभला! 

...हे सगळं असताना दुःखाची वर्तुळंही कायम या माणसाभोवती गरगरत राहिली!जन्माचेच दुःख, जन्मभर असोमला न काही, त्याचे फारसेअसं म्हणत दुःखावर मात करत, शेतीत सतत नवनवे प्रयोग करत आयुष्यभर शेती करत राहणारा हा शेतकरी  शेतकऱ्यांना कायम प्रेरणा देत राहिला. पाणलोट क्षेत्र, फळबागांसाठीचं धोरण;  शेती समृद्ध करण्यासाठी या माणसाने आपली आमदारकी वापरली. दोन वेळा आमदार असून महानोर यांची कोणतीही संस्था नाही की मुंबईतच काय; पण जळगावमध्येदेखील त्यांचा स्वतःचा फ्लॅट नाही.  जे केलं ते शेतीसाठी केलं, जे मिळवलं ते शेतीमधून मिळवलं. 

कष्टाला कल्पकतेची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली की शेती पोट भरून देते, असं ते वारंवार सांगायचे. शेतकरी आत्महत्या हा शेवटपर्यंत त्यांना अस्वस्थ करणारा विषय होता. आत्महत्या हा आपला मार्ग नाही असं प्रत्यक्ष कृतीतून पटवून देत दादा शेवटपर्यंत शेतीत प्रयोग करत राहिले. 

त्यांचा सांभाळ करणारी मुलं, मुली आणि लाडका नातू शशी; हे सगळे आहेत; पण सुलोचना काकूंनी दादांची साथ अर्ध्यातच सोडली. दोन वर्षांपूर्वी त्या गेल्या आणि कोणत्याही दुःखाने न हललेला हा कवी अंतर्बाह्य हादरला! अनेक व्याधी व आजार यांच्यासोबतचा दादांचा लढा सुरू होता. 

निष्पर्ण झालेल्या सीताफळाला पावसाच्या पहिल्या थेंबाने पालवी फुटते, गर्द हिरवा रंग धारण करून हे झाड फळांनी लदबदून जातं,  तसंच आम्हाला सावली देणारं  महानोर नावाचं झाड पुन्हा बहरून येईल असं वाटलं होतं; पण हिरव्या बोलीचा शब्द झालेले दादा आज सर्वत्र हिरवळ असताना तिला अबोल करून निघून गेले आहेत!

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Songsमराठी गाणीMaharashtraमहाराष्ट्र