शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

अखंड हिरव्या बोलीचं ‘महानोर’ नावाचं झाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 10:43 IST

महानोरांची कविता जगण्यातून आली. ती रानातली कविता आहे! लोकपरंपरा आणि आधुनिकतेच्या बांधावर उभे राहून त्यांनी कवितेची मशागत केली!

शंभू पाटील, ख्यातनाम लेखक, रंगकर्मी -

कवीचं काही वय असतं का ? कवी कधी म्हातारा होतो का ?कवी कधी मरतो का ?  कवीचं शरीर थकतं, तो काळाचा महिमा; पण कवी शाश्वत असतो. कविता नावाची अद्भुत गोष्ट काळाला पुरून उरते, कवी कायमचा मनात कोरलेला असतो. मनावर कोरलेले काहीच कवी असतात, अशा मराठी कवींमध्ये महानोर दादा आहेत. ब्याऐंशीव्या वर्षी दादा गेले, म्हणजे दादांचं शरीर गेलं; त्यांची कविता मात्र अजरामर आहे.

दादांची कविता राज्यकर्त्यांना मोहात पाडते, कवितेचे अभ्यासक चकित होऊन या कवितेबद्दल बोलत राहतात, समीक्षक यातील शब्दकळा बघून अवाक होतात, विद्यापीठात यावर चर्चासत्र सुरू असतं तेव्हा कुठे तरी शेतात पाणी भरणारा शेतमजूर ही कविता म्हणत असतो, बांधावर बसून राखण करणारा पोरगा ही कविता गात असतो, एखादी बाई घरकाम करता करता त्यांचे शब्द गुणगुणत असते... किती कवींच्या वाट्याला हे भाग्य येतं ? मानवाला विस्मरणाचा शाप आहे; पण महानोरांच्या कविता मनातून जात नाहीत त्या नाहीतच!

पळसखेड अगदी छोटंसं गाव. या गावाच्या बाहेर असलेल्या शेतातल्या कुडाच्या झोपडीत मराठीत शतकानुशतके पुरून उरेल अशी कविता लिहिणारा हा शेतकरी. ज्याचं नातं तुकारामाशी अगदी घट्ट बांधल गेलं होतं. जात्यावर ओव्या म्हणणाऱ्या आईने कवितेची ओळख करून दिली; आयुष्यभर हा कवी त्या कवितेचा पदर पकडून प्रार्थना करत राहिला!

या नभाने या भुईला दान द्यावे या मातीतुनी चैतन्य गावे...कवीची कविता जगण्यातून आली तर ती श्रेष्ठ कविता असते. महानोरांची कविता अशीच जगण्यातून आली, म्हणून ती रानातली कविता आहे. चांगल्या गीतकाराला एरवी कधी कवी समजलं जात नाही, चांगला कवी गीतकार असतोच असंही नाही; पण अजरामर गाणी लिहिणारे महानोर तितकेच थोर कवी होते; हे किती दुर्मीळ आहे! आपल्या लोकपरंपरा पूर्ण रीचवत त्यांना आधुनिक कवितेचा  आयाम देणारा हा कवी लोकपरंपरा आणि आधुनिक कविता यांच्या बांधावर कवितेची मशागत करत होता!  

सूर्यनारायणा नित नेमाने उगवाअंधाराच्या ठायी थोडा उजेड पाठवामराठी साहित्यात हा उजेड अनेकांच्या जीवनात प्रकाश घेऊन आला. आडवळणाच्या  खेड्यातील या कवीसाठी मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण, कुसुमाग्रज, लताबाई, पुलं आणि शरद पवारांपासून कित्येक मान्यवर  रस्ता नसलेल्या त्यांच्या गावात जात राहिले! किती किती जणांनी महानोरांवर, त्यांच्या कवितांवर लोभ केला! प्रतिभावंत लेखक, संगीतकार, गायक असोत, की शरद पवारांसारखे राजकीय नेते आणि भवरलाल जैन यांच्यासारखे रसिकाग्रणी उद्योगपती असोत, की त्यांच्या कविता-गाण्यांवर जीव ओवाळणारी सामान्य माणसं; महानोरांना भरभरून स्नेह लाभला! 

...हे सगळं असताना दुःखाची वर्तुळंही कायम या माणसाभोवती गरगरत राहिली!जन्माचेच दुःख, जन्मभर असोमला न काही, त्याचे फारसेअसं म्हणत दुःखावर मात करत, शेतीत सतत नवनवे प्रयोग करत आयुष्यभर शेती करत राहणारा हा शेतकरी  शेतकऱ्यांना कायम प्रेरणा देत राहिला. पाणलोट क्षेत्र, फळबागांसाठीचं धोरण;  शेती समृद्ध करण्यासाठी या माणसाने आपली आमदारकी वापरली. दोन वेळा आमदार असून महानोर यांची कोणतीही संस्था नाही की मुंबईतच काय; पण जळगावमध्येदेखील त्यांचा स्वतःचा फ्लॅट नाही.  जे केलं ते शेतीसाठी केलं, जे मिळवलं ते शेतीमधून मिळवलं. 

कष्टाला कल्पकतेची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली की शेती पोट भरून देते, असं ते वारंवार सांगायचे. शेतकरी आत्महत्या हा शेवटपर्यंत त्यांना अस्वस्थ करणारा विषय होता. आत्महत्या हा आपला मार्ग नाही असं प्रत्यक्ष कृतीतून पटवून देत दादा शेवटपर्यंत शेतीत प्रयोग करत राहिले. 

त्यांचा सांभाळ करणारी मुलं, मुली आणि लाडका नातू शशी; हे सगळे आहेत; पण सुलोचना काकूंनी दादांची साथ अर्ध्यातच सोडली. दोन वर्षांपूर्वी त्या गेल्या आणि कोणत्याही दुःखाने न हललेला हा कवी अंतर्बाह्य हादरला! अनेक व्याधी व आजार यांच्यासोबतचा दादांचा लढा सुरू होता. 

निष्पर्ण झालेल्या सीताफळाला पावसाच्या पहिल्या थेंबाने पालवी फुटते, गर्द हिरवा रंग धारण करून हे झाड फळांनी लदबदून जातं,  तसंच आम्हाला सावली देणारं  महानोर नावाचं झाड पुन्हा बहरून येईल असं वाटलं होतं; पण हिरव्या बोलीचा शब्द झालेले दादा आज सर्वत्र हिरवळ असताना तिला अबोल करून निघून गेले आहेत!

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Songsमराठी गाणीMaharashtraमहाराष्ट्र