शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

अखंड हिरव्या बोलीचं ‘महानोर’ नावाचं झाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 10:43 IST

महानोरांची कविता जगण्यातून आली. ती रानातली कविता आहे! लोकपरंपरा आणि आधुनिकतेच्या बांधावर उभे राहून त्यांनी कवितेची मशागत केली!

शंभू पाटील, ख्यातनाम लेखक, रंगकर्मी -

कवीचं काही वय असतं का ? कवी कधी म्हातारा होतो का ?कवी कधी मरतो का ?  कवीचं शरीर थकतं, तो काळाचा महिमा; पण कवी शाश्वत असतो. कविता नावाची अद्भुत गोष्ट काळाला पुरून उरते, कवी कायमचा मनात कोरलेला असतो. मनावर कोरलेले काहीच कवी असतात, अशा मराठी कवींमध्ये महानोर दादा आहेत. ब्याऐंशीव्या वर्षी दादा गेले, म्हणजे दादांचं शरीर गेलं; त्यांची कविता मात्र अजरामर आहे.

दादांची कविता राज्यकर्त्यांना मोहात पाडते, कवितेचे अभ्यासक चकित होऊन या कवितेबद्दल बोलत राहतात, समीक्षक यातील शब्दकळा बघून अवाक होतात, विद्यापीठात यावर चर्चासत्र सुरू असतं तेव्हा कुठे तरी शेतात पाणी भरणारा शेतमजूर ही कविता म्हणत असतो, बांधावर बसून राखण करणारा पोरगा ही कविता गात असतो, एखादी बाई घरकाम करता करता त्यांचे शब्द गुणगुणत असते... किती कवींच्या वाट्याला हे भाग्य येतं ? मानवाला विस्मरणाचा शाप आहे; पण महानोरांच्या कविता मनातून जात नाहीत त्या नाहीतच!

पळसखेड अगदी छोटंसं गाव. या गावाच्या बाहेर असलेल्या शेतातल्या कुडाच्या झोपडीत मराठीत शतकानुशतके पुरून उरेल अशी कविता लिहिणारा हा शेतकरी. ज्याचं नातं तुकारामाशी अगदी घट्ट बांधल गेलं होतं. जात्यावर ओव्या म्हणणाऱ्या आईने कवितेची ओळख करून दिली; आयुष्यभर हा कवी त्या कवितेचा पदर पकडून प्रार्थना करत राहिला!

या नभाने या भुईला दान द्यावे या मातीतुनी चैतन्य गावे...कवीची कविता जगण्यातून आली तर ती श्रेष्ठ कविता असते. महानोरांची कविता अशीच जगण्यातून आली, म्हणून ती रानातली कविता आहे. चांगल्या गीतकाराला एरवी कधी कवी समजलं जात नाही, चांगला कवी गीतकार असतोच असंही नाही; पण अजरामर गाणी लिहिणारे महानोर तितकेच थोर कवी होते; हे किती दुर्मीळ आहे! आपल्या लोकपरंपरा पूर्ण रीचवत त्यांना आधुनिक कवितेचा  आयाम देणारा हा कवी लोकपरंपरा आणि आधुनिक कविता यांच्या बांधावर कवितेची मशागत करत होता!  

सूर्यनारायणा नित नेमाने उगवाअंधाराच्या ठायी थोडा उजेड पाठवामराठी साहित्यात हा उजेड अनेकांच्या जीवनात प्रकाश घेऊन आला. आडवळणाच्या  खेड्यातील या कवीसाठी मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण, कुसुमाग्रज, लताबाई, पुलं आणि शरद पवारांपासून कित्येक मान्यवर  रस्ता नसलेल्या त्यांच्या गावात जात राहिले! किती किती जणांनी महानोरांवर, त्यांच्या कवितांवर लोभ केला! प्रतिभावंत लेखक, संगीतकार, गायक असोत, की शरद पवारांसारखे राजकीय नेते आणि भवरलाल जैन यांच्यासारखे रसिकाग्रणी उद्योगपती असोत, की त्यांच्या कविता-गाण्यांवर जीव ओवाळणारी सामान्य माणसं; महानोरांना भरभरून स्नेह लाभला! 

...हे सगळं असताना दुःखाची वर्तुळंही कायम या माणसाभोवती गरगरत राहिली!जन्माचेच दुःख, जन्मभर असोमला न काही, त्याचे फारसेअसं म्हणत दुःखावर मात करत, शेतीत सतत नवनवे प्रयोग करत आयुष्यभर शेती करत राहणारा हा शेतकरी  शेतकऱ्यांना कायम प्रेरणा देत राहिला. पाणलोट क्षेत्र, फळबागांसाठीचं धोरण;  शेती समृद्ध करण्यासाठी या माणसाने आपली आमदारकी वापरली. दोन वेळा आमदार असून महानोर यांची कोणतीही संस्था नाही की मुंबईतच काय; पण जळगावमध्येदेखील त्यांचा स्वतःचा फ्लॅट नाही.  जे केलं ते शेतीसाठी केलं, जे मिळवलं ते शेतीमधून मिळवलं. 

कष्टाला कल्पकतेची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली की शेती पोट भरून देते, असं ते वारंवार सांगायचे. शेतकरी आत्महत्या हा शेवटपर्यंत त्यांना अस्वस्थ करणारा विषय होता. आत्महत्या हा आपला मार्ग नाही असं प्रत्यक्ष कृतीतून पटवून देत दादा शेवटपर्यंत शेतीत प्रयोग करत राहिले. 

त्यांचा सांभाळ करणारी मुलं, मुली आणि लाडका नातू शशी; हे सगळे आहेत; पण सुलोचना काकूंनी दादांची साथ अर्ध्यातच सोडली. दोन वर्षांपूर्वी त्या गेल्या आणि कोणत्याही दुःखाने न हललेला हा कवी अंतर्बाह्य हादरला! अनेक व्याधी व आजार यांच्यासोबतचा दादांचा लढा सुरू होता. 

निष्पर्ण झालेल्या सीताफळाला पावसाच्या पहिल्या थेंबाने पालवी फुटते, गर्द हिरवा रंग धारण करून हे झाड फळांनी लदबदून जातं,  तसंच आम्हाला सावली देणारं  महानोर नावाचं झाड पुन्हा बहरून येईल असं वाटलं होतं; पण हिरव्या बोलीचा शब्द झालेले दादा आज सर्वत्र हिरवळ असताना तिला अबोल करून निघून गेले आहेत!

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Songsमराठी गाणीMaharashtraमहाराष्ट्र