शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

बुजवा विहिरी व बारवा; करा उत्सव... द्या अपघातांना निमंत्रण!

By shrimant mane | Updated: April 1, 2023 07:55 IST

तुमच्या पायाखाली कदाचित पन्नास फूट खोल विहीर असेल आणि ते तुम्हाला माहितीही नसेल! इंदूरच्या अपघाताने हे जुने जलवैभव समोर आले आहे.

- श्रीमंत माने

मध्यप्रदेशातील इंदूरच्या बेलेश्वर महादेव मंदिरात आपण जिला बावडी अथवा बारव म्हणतो ती पायऱ्यांची विहीर झाकण्यासाठी टाकलेले प्लास्टरचे छत माणसांचे ओझे असह्य होऊन कोसळले. रामनवमीच्या दिवशी श्रद्धाभावाने परमेश्वराच्या दर्शनाला आलेले, होमहवन करणारे भाविक खाली खोल विहिरीत कोसळले. शुक्रवारी सकाळपर्यंत छत्तीस मृतदेह बाहेर काढले गेले. रामनवमीच्या उत्सवावर शोककळा पसरली. पुढे आलेल्या माहितीनुसार, पटेलनगर, स्नेहनगर नावाच्या वस्त्या उभ्या राहण्याआधी शेतात असलेली ऐंशी-शंभर वर्षे जुनी बावडी झाकून त्यावर ४०-४५ वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले गेले. उत्सव सुरू झाले. वर्षानुवर्षे मंदिरात जाणाऱ्यांनाही कल्पना नसायची की, जिथे उभे आहोत त्याच्या खाली पन्नास फूट खोल बावडी आहे. 

असो; हा अपघातच. दोषी धरायचेच तर मंदिराच्या विश्वस्तांना धरावे लागेल; परंतु या अपघाताने एका ऐतिहासिक संचिताची आजची परवड चव्हाट्यावर आली आहे. देशाच्या विविध भागांत, विशेषत: जिथे भूजलावरच तहान भागवली जायची, संरक्षित ओलित केले जायचे, त्या मध्य, पश्चिम भारतात दोन-पाचशे, हजार वर्षांपूर्वी खोदलेल्या, बांधलेल्या विहिरी, आड, हेळ, बावडी, बारवा, कुंड, पुष्करणी हे आपले वैभव आहे. काळाची गरज भागवितानाच आपल्या पूर्वजांनी मोठ्या परिश्रमाने हे वैभव सजविलेही. आजच्या प्रगत अभियांत्रिकीलाही आश्चर्य वाटावे असा स्थापत्यकलेचा ताे आविष्कार आहे.

अगदी हडप्पा, मोहेंजोदारोपासून शासनकर्ते, राजेरजवाडे, संस्थानिकांनी पुढच्या पिढ्यांच्या हाती सोपविलेला हा समृद्ध वारसा आहे. त्यातूनच जलव्यवस्थापनाची एक इको सिस्टीम भारतातून जगाला दिली गेली. साेबतच जमिनीखालून पाणीपुरवठ्याची इराणमधील कनात व्यवस्थेची प्रतिकृती मोगल साम्राज्यावेळी आपल्याकडे आली. बऱ्हाणपूरचा कुंडी भंडारा, छत्रपती संभाजीनगरची नहर-ए-अंबरी, बिदरची तशीच व्यवस्था ही त्याची उदाहरणे. 

आतापर्यंत आपण समजायचो की, पाण्याची टंचाई असलेल्या राजस्थान, गुजरातमध्येच अशा मोठ्या बांधीव बारवा आहेत. गुजरातमधील पाटनची ‘राणी की वाव’ जगप्रसिद्ध आहे. ‘युनेस्को’ने तिला जागतिक वारसास्थळांमध्ये, तर भारत सरकारने शंभरच्या नोटेवर स्थान दिले. महाराष्ट्रात फारतर साताऱ्याजवळच्या लिंब येथील बारा मोटेची विहीर चर्चेत असायची. अलीकडे कोरोना लॉकडाउनपासून रोहन काळे व मनोज सिनकर हे तरुण पदरमोड करून महाराष्ट्र बारव मोहीम राबवीत आहेत. हजारो किलोमीटर दुचाकीवर फिरून त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात जुन्या विहिरी, बारवा, पुष्करणी शोधल्या.

स्थानिकांना त्यांची स्वच्छता व पुनरुज्जीवनासाठी तयार केले. पुनरुज्जीवन कसले; प्राचीन जलमंदिरांचा जीर्णोद्धारच तो. महाशिवरात्रीला बारवांवर दीपोत्सवाचा उपक्रम साजरा होऊ लागला. गावोगावी तरुण मंडळी पुढे आली. रोहन काळे व इतरांनी अशा तब्बल सतराशेच्या आसपास जलस्रोतांचा इतिहास शोधला. त्यांचे मॅपिंग केले. त्यातून अहमदनगर, परभणीत मोठे काम झाले. सिन्नरला मोठ्या बारवेचा जीर्णोद्धार झाला. नागपूरकर भोसल्यांनी बांधलेल्या बावडींच्या स्वच्छतेचे काही प्रयत्न विदर्भात झाले. तिकडे दुष्काळी माणदेशात गावांमध्ये वाड्यांतल्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न झाले. काळाच्या ओघात नष्ट झालेला हा ठेवा काही प्रमाणात आजच्या पिढीला आठवला खरे; पण एवढे पुरेसे नाही. 

लहानसहान वस्त्या, छोटी-मोठी गावे, आता फुगलेली शहरे अशा सर्वच ठिकाणी आधी घराच्या अंगणात किंवा परसदारी आठ-दहा हात व्यासाच्या; परंतु खोलवर विहिरी असायच्या. तेच पाणी पिण्यासाठी, इतर कामासाठी वापरले जायचे; पण नळातून येणाऱ्या पाण्याच्या मोहापायी त्या विहिरी जमिनीखाली गाडल्या गेल्या. आताची त्यांची अवस्था कचराकुंड्यांची आहे. गावखेड्यांनीही विहिरींवर मोट, डिझेल इंजिन व विजेवर चालणारे कृषिपंप, त्याला जोडलेल्या जलवाहिन्या, कालव्याचे-पाटाचे पाणी अशा प्रवासात जलवैभव गमावले. तहानेने जीव कासावीस झाला की, ते शहरे व खेड्यांना आठवते. वीसेक वर्षांपूर्वी वऱ्हाडात अकोल्यावर अभूतपूर्व जलसंकट आले, रेल्वेने पाणी आणण्याची वेळ ओढवली. तेव्हा जुन्या विहिरींची आठवण झाली, त्या स्वच्छ केल्या गेल्या. तिथे हायड्रंट सुरू करून टँकर भरले गेले. खरेतर ही आठवण अपघाताच्या निमित्तानेच यायला नको. आपत्तीकाळाची व्यवस्था, भविष्याची बेगमी म्हणून जलव्यवस्थापनाच्या वैभवाकडे पाहायला हवे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश