शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

कोकणासाठी ९० दिवस चालत राहिलो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 09:15 IST

विकासाच्या नावाखाली होणाऱ्या कोकणाच्या बेसुमार हानीची जाणीव करून देण्यासाठी रेवस ते रेडी सलग २० दिवसांची पदयात्रा काढणाऱ्या तरुणाची भ्रमणगाथा.

आशुतोष जोशीपर्यावरणवादी

रत्नागिरीतल्या २२ तालुक्यातील नरवण इथून गुहागर घेतल्यानंतर शिक्षण कामानिमित्त परदेशी गेलो तेव्हा तिथं असं लक्षात आलं की, इंग्लंडसारखा देशसुद्धा कधीकाळी कोकणासारखा हिरवागार होता; पण सततची बेसुमार जंगलतोड, औद्योगीकरण आणि शहरीकरणामुळे त्याची विविधता गेल्या शंभर वर्षांत नष्ट झाली. हीच वेळ कोकणावर येऊ घातली आहे, असं मला तीव्रतेनं दिसू लागलं. 

२०२२ मध्ये इंग्लंड कायमचं सोडलं आणि मी नरवणमध्ये राहायला लागलो. तेव्हा इथल्या समस्या अधिक तीव्रतेने जाणवू लागल्या. त्याच सुमारास कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमधून जाणारा रेवस ते रेडी हा सागरी महामार्ग वेगाने बांधण्याचा निर्णय तत्कालीन शासनाने जाहीर केला. त्यामुळे होणारा निसर्गाचा ऱ्हास आणि या मार्गावरील गावांचं होऊ घातलेलं नुकसान डोळ्यासमोर आलं. सर्वेक्षण तर झालेलं आणि धनदांडग्या लोकांकडून जमिनींची खरेदीही सुरू झालेली; पण या भागातला सर्वसामान्य माणूस त्याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ होता. हे लक्षात आल्यावर मी स्वतःच या मार्गानं चालण्याचं आणि या संभाव्य नुकसानीबाबत लोकांची मतं जाणून घेण्याचं ठरवलं. गेल्यावर्षी २४ नोव्हेंबरला रायगडमधल्या रेवस बंदराच्या जेटीवर अथांग सागराला नमस्कार करून चालायला सुरुवात केली आणि गेल्या २ मार्च जी सिंधुदुर्गातल्या रेडी येथील निसर्गाचा रक्षणकर्ता घंगाळेश्वराच्या पायी सागराच्या साक्षीनेच या पदयात्रेची सांगता केली. तीन महिन्यांच्या या काळात सुमारे ९०० किलोमीटरची पायपीट करताना प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यांत वेगवेगळी परिस्थिती दिसली. मुंबई जवळ असल्यामुळे रेवसचा परिसर शहरीकरणाच्या प्रभावाखाली दडपून गेलेला दिसला. आपल्या नेमक्या गरजा काय आहेत, हेही त्यांच्या लक्षात येत नव्हतं. एका ठिकाणी कोणाला तरी उत्तम आरोग्य सेवेची गरज होती; पण तो मागणी करत होता मुंबईला जाण्यासाठी चांगल्या रस्त्याची. अनेक जणांना कोकणातलं शांत आयुष्य आवडत होतं. पुढच्या काळातही ते तसंच राहावं, अशी त्यांचीही अपेक्षा होती; पण ते कसं टिकवायचं, ते कळत नव्हतं.

यात्रेत अनेक ग्रामस्थांशी संवाद झाला. तिन्ही जिल्ह्यांमधील शेकडो एकर पडीक जमीन किंवा अगदी डोंगरही काही वजनदार राजकारणी व त्यांच्या जवळच्या लोकांनी खरेदी केल्याची चर्चा दबक्या आवाजात ऐकायला मिळाली. अनेक सडे आणि सडे आणि कातळभाग सपाट करून टाकल्याचं दिसलं. त्यामुळे तिथल्या प्राणी-पक्ष्यांचे अधिवास कायमचे नष्ट झाले... संपन्न जैवविविधतेची कधीही भरून न येणारी हानी झाली. या नुकसानीची कल्पना नसलेल्या स्थानिक गावकऱ्यांना किरकोळ आर्थिक मदत किंवा देणग्या देऊन हे सारं घडवण्यात आलं होतं. काही ठिकाणी तात्पुरता रोजगार निर्माण झाल्याने तेथील विरोधाची धार बोथट झाली होती; मात्र काही गावांमध्ये आमिषं, धमक्यांना भीक न घालता लोकांनी वडिलोपार्जित संपत्ती जपल्याचंही आढळलं.

या पदयात्रेत कधी मंदिरात, तर कधी स्थानिकांच्या घरात, जंगलात असा कुठेही जागा मिळेल तिथं झोपत होतो. अनेकांनी पदयात्रेत माझ्याबरोबर चालून कृतिशील पाठिंबा दिला. पदयात्रेच्या मार्गावरील गावांमध्ये ग्रामसभा झाल्या. ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे, काही लोकांनी मला विकासविरोधी, 'अर्बन नक्षल' ठरवून बदनामीचा प्रयत्न केला; पण कोकणातल्या लोकांमध्ये जाऊन निसर्गातील त्यांच्या देवांबद्दल, राखणदारांबद्दल, पंचमहाभूतांबद्दल पुन्हा एकदा आठवण करून देण्याची माझी धडपड होती.

जैवविविधतेने नटलेल्या माझ्या या कोकणचा विकास उत्तम शैक्षणिक आणि आरोग्यविषयक सुविधा, सेंद्रिय शेती आणि निसर्गपूरक व्यवसाय-उद्योगांद्वारे व्हायला हवा, असं मला वाटतं. आधुनिक विकासाच्या हव्यासापोटी इथली नैसर्गिक संपदा आपण उद्ध्वस्त केली तर त्याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल, हेही मला लोकांच्या लक्षात आणून द्यायचं होतं. म्हणून आजच्या आधुनिक, वेगवान जमान्यात पदयात्रा हा काहींना जरा विचित्र वाटणारा मार्ग मी निवडला आणि सलग ९० दिवस चाललो...

टॅग्स :konkanकोकणenvironmentपर्यावरण