शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
4
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
5
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
6
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
7
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
8
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
9
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
10
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
11
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
12
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
13
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
14
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
15
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
16
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
17
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
19
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
20
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रकल्पांमधून सोडणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:37 IST

धुळे : उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईपासून दिलासा देण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील प्रकल्पांमधून पाणी ...

धुळे : उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईपासून दिलासा देण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील प्रकल्पांमधून पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. अक्कलपाडा, अमरावती, वाडीशेवाडी, अनेर, जामखेडी मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सिंचन विभागाला दिले आहेत.

पाणीटंचाई उपाययोजनांसाठी धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यातील तहसीलदारांनी पांझरा नदीवरील अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार अक्कलपाडा प्रकल्पात आरक्षित असलेल्या ६५०५३८ दशलक्ष घनफूट पाण्यापैकी ३२० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवर्तन सोडण्यापूर्वी नदीवरील कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाऱ्यावरील फळ्या काढण्यात याव्या. तसेच पाणी अडविले जाणार नाही, याची काळजी पाटबंधारे विभागाने घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

प्रकल्पांमधून पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर पाणीचोरी रोखण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त द्यावा. अक्कलपाडा प्रकल्प ते तापी संगमापर्यंत पाणी अखंडपणे प्रवाहित राहील, याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समितीची असेल. अमरावती मध्यम प्रकल्पातील १३६.४९३ दशलक्ष घनफूट पाणी शिंदखेडा तालुक्यातील ११ गावांसाठी आरक्षित आहे. दोंडाईचा येथील अपर तहसीलदारांनी टंचाईचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार अमरावती मध्यम प्रकल्पातून ५६. ९३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे.

वाडीशेवाडी प्रकल्पातून २० गावांसाठी १२० दशलक्ष घनफूट, अनेर धरणातून चोपडा तालुक्यातील १६ गावांसाठी ९१.३५ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. जामखेडी मध्यम प्रकल्पातील १९ दशलक्ष घनफूट पाणी साक्री तालुक्यातील ४ गावांसाठी आरक्षित आहे. त्यापैकी १०.२८ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे.