शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रकल्पांमधून सोडणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:37 IST

धुळे : उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईपासून दिलासा देण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील प्रकल्पांमधून पाणी ...

धुळे : उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईपासून दिलासा देण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील प्रकल्पांमधून पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. अक्कलपाडा, अमरावती, वाडीशेवाडी, अनेर, जामखेडी मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सिंचन विभागाला दिले आहेत.

पाणीटंचाई उपाययोजनांसाठी धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यातील तहसीलदारांनी पांझरा नदीवरील अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार अक्कलपाडा प्रकल्पात आरक्षित असलेल्या ६५०५३८ दशलक्ष घनफूट पाण्यापैकी ३२० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवर्तन सोडण्यापूर्वी नदीवरील कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाऱ्यावरील फळ्या काढण्यात याव्या. तसेच पाणी अडविले जाणार नाही, याची काळजी पाटबंधारे विभागाने घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

प्रकल्पांमधून पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर पाणीचोरी रोखण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त द्यावा. अक्कलपाडा प्रकल्प ते तापी संगमापर्यंत पाणी अखंडपणे प्रवाहित राहील, याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समितीची असेल. अमरावती मध्यम प्रकल्पातील १३६.४९३ दशलक्ष घनफूट पाणी शिंदखेडा तालुक्यातील ११ गावांसाठी आरक्षित आहे. दोंडाईचा येथील अपर तहसीलदारांनी टंचाईचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार अमरावती मध्यम प्रकल्पातून ५६. ९३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे.

वाडीशेवाडी प्रकल्पातून २० गावांसाठी १२० दशलक्ष घनफूट, अनेर धरणातून चोपडा तालुक्यातील १६ गावांसाठी ९१.३५ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. जामखेडी मध्यम प्रकल्पातील १९ दशलक्ष घनफूट पाणी साक्री तालुक्यातील ४ गावांसाठी आरक्षित आहे. त्यापैकी १०.२८ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे.