शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

उजव्या कालव्यातून पाणी नासाडी थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 22:06 IST

अमरावती प्रकल्प : सोडलेले पाणी जाते कुठे याचे कुतूहल शेतकऱ्यांना होते

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर :अमरावती मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी बंद करून ते प्रकल्पातच अडविण्यात आले आहे. त्यामुळे उजव्या कालव्यातून होणोरी पाण्याची नासाडी थांबली आहे.अमरावती मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाण्याची नासाडी या मथळ्याखाली लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच, पाटबंधारे विभागाने त्याची दखल घेतली आहे.पाण्याच्या प्रत्येक थेंबांचे महत्त्व मालपूरकरांनी मागच्यावर्षी अनुभवले आहे. नळांना वीस दिवसानंतर तेही घड्याळ्याच्या काट्यावर लक्ष ठेवून पाणी सोडले जात होते.तरी सुध्दा याच्यातून कुठलाही बोध न घेता गेल्या बºयाच दिवसांपासून येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या कालव्यातून बेसुमार पाणी पाटबंधारे विभागाने सोडुन पाण्याची नासाडी होत होती. हे पाणी शेतशिवारातील नाल्यातून देखील वाहत होते. यावरून सुराय ग्रामस्थांमध्ये वाद झाला. तो थेट दोंडाईचा पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला तरी कोणी ही याची दखल घेतली नाही. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाले होते.मालपुर येथे अमरावती मध्यम प्रकल्प असून याला दोन कालवे आहेत. शेतकऱ्यांचा खरिप व रब्बी दोन ही हंगामातील पिक आता निघाले आहेत. काहींची काढणी चालु आहे. अशा परिस्थितीत पाण्याची गरज नसतांना हे एवढे पाणी कुठे जात आहे याचे ग्रामस्थांना मोठे कुतुहल होते. शेतकºयांनी याबाबत कैफियत मांडली.पाण्याचा साठा प्रकल्पात राहिल्यास याचा भविष्यात उपयोग घेता येवू शकतो, यासाठी प्रकल्पात पाणी साठा असणे आवश्यक आहे अन्यथा आडातच नाही तर पोह?्यात कुठुन येईल अशी अवस्था होवू नये म्हणून काही जागृत शेतक?्यांनी हा प्रकार लक्षात आणून दिला. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यावर वाया जाणाºया पाण्याला पायबंद बसला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे