शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

जलयुद्ध टाळण्यासाठी जलसंवर्धनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 11:51 IST

जलसाक्षरता अभियान : महाराणा प्रताप विद्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉ. अरगडे यांचे प्रतिपादन

ठळक मुद्देमहाराणा प्रताप विद्यामंदिरात जलसाक्षरता अभियानविद्यार्थ्यांनी घेतली जलसंवर्धनाची शपथ

आॅनलाइन लोकमतधुळे : पाणी या नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. सध्या अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्याने, दुष्काळाचा सामना करावा लागतोय. काळाची पाऊले ओळखून जलयुद्ध टाळण्यासाठी प्रत्येकाने जलसंवर्धन करावे असे प्रतिपादन डॉ. किशोर अरगडे यांनी येथे केले.महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना विभाग मार्फत आयोजित जलसाक्षरता अभियान अंतर्गत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. अरगडे बोलत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र पाटील होते.डॉ. अरगडे म्हणाले, जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. कारण तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यासाठी होईल असे शास्त्रज्ञांनी भाकीत केले आहे. हे जलयुद्ध टाळण्यासाठी आपल्याला पाणी बचतीशिवाय तरणोपाय नाही. जल हेच जीवन आहे. पाणी बचतीतूनच देश समृद्ध होऊ शकतो. म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत. त्याचप्रमाणे विविध कृतीतून, उपक्रमातून पाण्याची कशी बचत करता येईल याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सोनाली सिसोदिया यांनी विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा दिली. अनिता राजपूत, संगीता कुवर, मीनल राठोड, रविंद्र राजपूत, भारती पाटील, हितेंद्र परमार, गजेंद्र पावरा, निलेश राजपूत आदी शिक्षक उपस्थित होते. इंद्रजित जमादार यांनी आभार मानले. 

टॅग्स :Educationशिक्षणDhuleधुळे