शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

१८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद, लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठांचीच गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:35 IST

धुळे : पुरेसे डोस मिळत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

धुळे : पुरेसे डोस मिळत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांचीच गर्दी झाली होती.

जिल्ह्यात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे गरजेचे होते. मात्र, नोंदणी होत नसल्याच्या तक्रारी अनेक तरुणांनी केल्या होत्या. तसेच पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने इच्छा असूनही अनेक तरुणांना कोरोनाची लस घेता आली नाही. त्यातच पुरेसे डोस मिळत नसल्याचे कारण देत राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील केंद्रांवर केवळ ज्येष्ठ नागरिकांचेच लसीकरण करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस तीव्र होतो आहे. दैनंदिन बाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून घट झाली आहे. पण, मृत्यूचे सत्र अजूनही सुरूच आहे. दररोज जिल्ह्यातील सरासरी पाच ते सहा कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू होत आहेत. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला आहे. ग्रामीण भागात आढळणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. कोरोनापासून संरक्षण मिळण्यासाठी लस महत्त्वाचे शस्त्र आहे. लसीकरणाबाबत चांगली जनजागृती करण्यात शासनाला यश आले आहे. लस घेण्यासाठी नागरिक इच्छुक आहेत. त्यासाठी लसीकरण केंद्रांवर ते पहाटे पाच वाजल्यापासूनच गर्दी करत आहेत. पण एका लसीकरण केंद्रावर ८० ते १०० डोस उपलब्ध होत आहेत.

४५ वर्षांवरील २० टक्के लसीकरण पूर्ण -

जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील २० टक्के नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. ४५ वर्षांवरील ७ लाख २२ हजार नागरिकांपैकी १ लाख ४७ हजार जणांनी पहिला डोस घेतला आहे. पुरेशा संख्येत डोस प्राप्त झाले तर ४५ वर्षांवरील नागरिकांचे ६० टक्के लसीकरण लवकरच पूर्ण करू, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी व्यक्त केला आहे.

ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर सकाळी ५ वाजल्यापासूनच रांगा -

ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर सकाळी पाच वाजल्यापासून नागरिक रांगा लावत असल्याचे चित्र आहे. मात्र, नोंदणी करण्यात अडचण येत असल्याने अनेकांना रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याचे चित्र आहे. नोंदणी करण्याबाबत नागरिकांची समजूत घालताना आरोग्य कर्मचाऱ्यांची दमछाक होते आहे.

आतापर्यंत ३५ हजार डोस वाया -

१- आतापर्यंत जिल्ह्यात ३५ हजार डोस वाया गेले आहेत. एका कुपीत १० डोस असतात. त्यावेळी लसीकरण केंद्रावर जर सहा जण उपस्थित असतील तर चार डोस वाया जातात. लसीकरण मोहिमेच्या सुरुवातील डोस वाया जाण्याचे प्रमाण जास्त होते.

२- लसीकरणाबाबत जनजागृती झाल्यापासून डोस वाया जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आता तर उपलब्ध डोस अपूर्ण पडत आहेत. मंगळवारी ४०७ तर बुधवारी केवळ १३३ डोस वाया गेल्याची माहिती मिळाली.