शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

अवकाळी पावसाने मालपूर परिसरातील वीटभट्टी व्यावसायिकांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:27 IST

मालपूरसह परिसरात विटा बनविण्याचा व्यवसाय कोरोनामुळे अगोदर संकटात सापडला. त्यानंतर कसाबसा व्यवसाय सुरू केला तर मागील महिन्यातील अवकाळी पावसामुळे ...

मालपूरसह परिसरात विटा बनविण्याचा व्यवसाय कोरोनामुळे अगोदर संकटात सापडला. त्यानंतर कसाबसा व्यवसाय सुरू केला तर मागील महिन्यातील अवकाळी पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्याचीच पुनरावृत्ती आता पुन्हा झाली आहे. अवकाळी पावसामुळे कच्चा, पक्क्या विटा पुरत्या भिजल्या असून, संपूर्ण वाया गेल्या आहेत. यामुळे लागलेल्या संपूर्ण मजुरीचे ओझे डोक्यावर बसले आहे. तसेच नुकतीच भट्टी लावलेल्यांचे भागभांडवलदेखील वाया गेल्याने या व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले आहे.

या अचानक आलेल्या पावसामुळे तयार कच्च्या, विटा भिजून वाया गेल्या आहेत. सतत दोन दिवस पाऊस चालल्यामुळे पेटलेली भट्टी अर्धवट राहिल्यामुळे तो खर्चदेखील संपूर्ण वाया गेला आहे. कोरोनानंतर मोठ्या उमेदीने व्यावसायिक या व्यवसायाकडे वळले होते. मात्र, अवकाळी पावसाने सर्वकाही मातीत मिसळले आहे. वीट व्यावसायिकांना शासनाने आर्थिक मदतीचा हातभार द्यावा, अशी मागणी होत आहे.

इन्फो

योग्य माती आणून त्यात विविध घटकांचा समावेश करून विटा तयार करण्यासाठी माती तयार करावी लागते. यासाठी हातापायांच्या साहाय्याने माती तुडवून रात्रभर मुरू दिली जाते. भल्या पहाटे उठून पुन्हा मातीची मेहनत करुन विटा बनविण्यासाठी योग्य केली जाते. व त्यानंतर संपूर्ण कुटुंब एक एक विट थापत असतात. यानंतर सुकल्यावर एकत्रित रांग करून. भट्टी लावून कच्च्या विटा या भट्ट्यात भाजून पक्क्या केल्या जातात. मात्र, या उघड्यावरील व्यवसायाची सतत दोन दिवस झालेल्या संततधार अवकाळी पावसामुळे पुरती वाट लागली असून, त्यातून सावरणेदेखील मुश्किल झाले असल्याची व्यथा व्यावसायिकांनी मांडली.

कोट

अवकाळी पावसाने कच्च्या, पक्क्या तयार विटांचे अतोनात नुकसान झाल्याने आता काय करावे, हेच व्यावसायिकांना उमजत नाही. अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले आहे. मागील महिन्यातील संकटातून सावरत नाही तोच पुन्हा डोळ्यासमोर हे नुकसान पहावे लागल्यामुळे व्यावसायिक हतबल झाले आहेत. आता हा व्यवसाय करणे खूपच धोक्याचे झाले आहे. शासनाने आता तरी आमच्याकडे लक्ष द्यावे.

-पिंटू कुंभार, वीट व्यावसायिक, मालपूर