शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाची झळ, धरणे गाठतायत तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 17:05 IST

शिरपूर : करवंद धरणातही अल्पसा साठा, १० लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट

शिरपूर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागले आहेत़ परिणामी आदिवासी भागात टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत़ तालुक्यातील १३ पैकी १० लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट झाल्यामुळे पशुधन धोक्यात आले आहे़ संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे़ विशेषत: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करवंद धरणात २० टक्के पाणी साठा असल्यामुळे शहरवासियांचे पाणीविना हाल होवू नये म्हणून शिरपूर नगरपालिकेने यापूर्वीच उपाययोजना करून ठेवल्या आहेत़ असे असतांना शहरात निजर्तुंक पिण्याचे पाणी पुरविले जात आहे़शिरपूर तालुक्यात २ मध्यम प्रकल्पासह १३ लघु प्रकल्प आहेत़ शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून आतापर्यंत दोनशेच्यावर बंधारे बांधण्यात आली आहेत़ तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक गावांमध्ये ओढे, नाले, नदी व तलावांचे प्रशासनाने लोकसहभागातून पुनरुज्जीवन केले आहे़ शिरपूर पॅटर्न व जलयुक्तमुळे गावे बहरली तर शिवारं हिरवीगार झाली़गत पावसाळ्यात बहुतांशी धरणे ओव्हर फ्लो सुध्दा झाली होती, परंतु काही बंधारे कमी-अधिक पाऊसामुळे भरली नव्हती़ पश्चिम भागातील बंधाºयात अडविण्यात आलेले पाणी काही महिन्यानंतर ते आटलीत़ गेल्या वर्षी पावसाने सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला मात्र नदी-नाले वाहून नेणारा पाऊस न झाल्यामुळे बंधारे-धरणे पाण्याने भरली नाहीत़ त्यामुळे आता जवळपास सर्वच धरणे-बंधारे कोरडी झाली आहेत़सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने आदिवासी भागातील गावांमधील नैसर्गिक जलस्त्रोत हळूहळू आटू लागले आहेत़ परिणामी ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ आदिवासी पाड्यांवर तर २-४ किमीपर्यंत पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे़ काही पाड्यांवर तर पाण्याच्या भटकंतीसाठी मुल-मुली शाळेला दांडी मारत आहेत तर काहींनी शाळेला कायमचा बाय दिला आहे़आतापर्यंत तालुक्यात एकही गावात टँकर नाही़ प्रशासनाच्यावतीने ग्रामस्थांना दिलासा देवून उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत़ अधिक टंचाईग्रस्त गावांमध्ये मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर करण्यात आलेली आहे़ त्यांचे अंदाजपत्रकासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे़ लवकरच या गावांमध्ये पाणी टंचाई दूर केली जाणार आहे़ प्रस्तावित गावांमध्ये बोअरविहिर करण्याची मागणी केली जात आहे़एकीकडे जलस्त्रोत आटत चालले असतांना दुसरीकडे धरणांमधील पाणीसाठाही खालावत चालला आहे़ करवंद व अनेर मध्ये प्रकल्पातच बºयापैकी पाण्याचा साठा आहे़ त्यापैकी करवंद धरणाचे पाणी शहरासाठी आरक्षित करण्यात आलेले आहे़आजमितीस या धरणात ३़३४ दशघमी म्हणजेच २०़६५ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे़ त्यात शिरपूर नगरपालिकेने २़८३ दशघमी एवढे पाणी आरक्षित केले आहे, तसेच करवंद येथील मका फॅक्टरीने सुध्दा पाणी आरक्षित केले आहे़ याशिवाय या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे़ त्यामुळे या धरणातील पाणीसाठी मे अखेरपर्यंत संपण्याची शक्यता नाकारता येत नाही़ २०१३ मध्ये हवाई सर्व्हेक्षण होवून या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याचे समोर आले आहे़ धरण बांधतेवेळी या धरणाची पाणीसाठा क्षमता ५० दशघमी एवढी होती़ मात्र २०१३ च्या सर्व्हेक्षणापर्यंत पाणीसाठा क्षमता १८़२६ दशघमी इतका राहीला़ शहरात संभाव्य पाणी टंचाई भासवू नये म्हणून नगरपालिकेने आधीच शहरातील सर्वच पाणी टाक्यांवर टयुबवेल केल्या आहेत़ फिल्टरशन प्लॅन येथे सुध्दा टयुबवेल व तापी फिल्टर प्लॅन सुरु केले.१० प्रकल्पात ठणठणाटतालुक्यातील करवंद धरणात २०.६५ टक्के, अनेर ५४.३३, अभणपूर ४०, नांदर्डे ६ आणि गधडदेव धरणात ८ टक्के जलसाठा आहे.तर लौकी, खामखेडा, जळोद, कालीकराड, वाडी, मिटगांव, बुडकी, रोहिणी, विखरण आणि वकवाड धरणात पाण्याचा ठणठणाट आहे.

टॅग्स :Dhuleधुळे