शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
6
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
7
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
8
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
9
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
10
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
11
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
12
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
13
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
14
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
15
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
16
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

उन्हाची झळ, धरणे गाठतायत तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 17:05 IST

शिरपूर : करवंद धरणातही अल्पसा साठा, १० लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट

शिरपूर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागले आहेत़ परिणामी आदिवासी भागात टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत़ तालुक्यातील १३ पैकी १० लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट झाल्यामुळे पशुधन धोक्यात आले आहे़ संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे़ विशेषत: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करवंद धरणात २० टक्के पाणी साठा असल्यामुळे शहरवासियांचे पाणीविना हाल होवू नये म्हणून शिरपूर नगरपालिकेने यापूर्वीच उपाययोजना करून ठेवल्या आहेत़ असे असतांना शहरात निजर्तुंक पिण्याचे पाणी पुरविले जात आहे़शिरपूर तालुक्यात २ मध्यम प्रकल्पासह १३ लघु प्रकल्प आहेत़ शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून आतापर्यंत दोनशेच्यावर बंधारे बांधण्यात आली आहेत़ तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक गावांमध्ये ओढे, नाले, नदी व तलावांचे प्रशासनाने लोकसहभागातून पुनरुज्जीवन केले आहे़ शिरपूर पॅटर्न व जलयुक्तमुळे गावे बहरली तर शिवारं हिरवीगार झाली़गत पावसाळ्यात बहुतांशी धरणे ओव्हर फ्लो सुध्दा झाली होती, परंतु काही बंधारे कमी-अधिक पाऊसामुळे भरली नव्हती़ पश्चिम भागातील बंधाºयात अडविण्यात आलेले पाणी काही महिन्यानंतर ते आटलीत़ गेल्या वर्षी पावसाने सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला मात्र नदी-नाले वाहून नेणारा पाऊस न झाल्यामुळे बंधारे-धरणे पाण्याने भरली नाहीत़ त्यामुळे आता जवळपास सर्वच धरणे-बंधारे कोरडी झाली आहेत़सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने आदिवासी भागातील गावांमधील नैसर्गिक जलस्त्रोत हळूहळू आटू लागले आहेत़ परिणामी ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ आदिवासी पाड्यांवर तर २-४ किमीपर्यंत पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे़ काही पाड्यांवर तर पाण्याच्या भटकंतीसाठी मुल-मुली शाळेला दांडी मारत आहेत तर काहींनी शाळेला कायमचा बाय दिला आहे़आतापर्यंत तालुक्यात एकही गावात टँकर नाही़ प्रशासनाच्यावतीने ग्रामस्थांना दिलासा देवून उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत़ अधिक टंचाईग्रस्त गावांमध्ये मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर करण्यात आलेली आहे़ त्यांचे अंदाजपत्रकासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे़ लवकरच या गावांमध्ये पाणी टंचाई दूर केली जाणार आहे़ प्रस्तावित गावांमध्ये बोअरविहिर करण्याची मागणी केली जात आहे़एकीकडे जलस्त्रोत आटत चालले असतांना दुसरीकडे धरणांमधील पाणीसाठाही खालावत चालला आहे़ करवंद व अनेर मध्ये प्रकल्पातच बºयापैकी पाण्याचा साठा आहे़ त्यापैकी करवंद धरणाचे पाणी शहरासाठी आरक्षित करण्यात आलेले आहे़आजमितीस या धरणात ३़३४ दशघमी म्हणजेच २०़६५ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे़ त्यात शिरपूर नगरपालिकेने २़८३ दशघमी एवढे पाणी आरक्षित केले आहे, तसेच करवंद येथील मका फॅक्टरीने सुध्दा पाणी आरक्षित केले आहे़ याशिवाय या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे़ त्यामुळे या धरणातील पाणीसाठी मे अखेरपर्यंत संपण्याची शक्यता नाकारता येत नाही़ २०१३ मध्ये हवाई सर्व्हेक्षण होवून या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याचे समोर आले आहे़ धरण बांधतेवेळी या धरणाची पाणीसाठा क्षमता ५० दशघमी एवढी होती़ मात्र २०१३ च्या सर्व्हेक्षणापर्यंत पाणीसाठा क्षमता १८़२६ दशघमी इतका राहीला़ शहरात संभाव्य पाणी टंचाई भासवू नये म्हणून नगरपालिकेने आधीच शहरातील सर्वच पाणी टाक्यांवर टयुबवेल केल्या आहेत़ फिल्टरशन प्लॅन येथे सुध्दा टयुबवेल व तापी फिल्टर प्लॅन सुरु केले.१० प्रकल्पात ठणठणाटतालुक्यातील करवंद धरणात २०.६५ टक्के, अनेर ५४.३३, अभणपूर ४०, नांदर्डे ६ आणि गधडदेव धरणात ८ टक्के जलसाठा आहे.तर लौकी, खामखेडा, जळोद, कालीकराड, वाडी, मिटगांव, बुडकी, रोहिणी, विखरण आणि वकवाड धरणात पाण्याचा ठणठणाट आहे.

टॅग्स :Dhuleधुळे