शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

उन्हाची झळ, धरणे गाठतायत तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 17:05 IST

शिरपूर : करवंद धरणातही अल्पसा साठा, १० लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट

शिरपूर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागले आहेत़ परिणामी आदिवासी भागात टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत़ तालुक्यातील १३ पैकी १० लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट झाल्यामुळे पशुधन धोक्यात आले आहे़ संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे़ विशेषत: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करवंद धरणात २० टक्के पाणी साठा असल्यामुळे शहरवासियांचे पाणीविना हाल होवू नये म्हणून शिरपूर नगरपालिकेने यापूर्वीच उपाययोजना करून ठेवल्या आहेत़ असे असतांना शहरात निजर्तुंक पिण्याचे पाणी पुरविले जात आहे़शिरपूर तालुक्यात २ मध्यम प्रकल्पासह १३ लघु प्रकल्प आहेत़ शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून आतापर्यंत दोनशेच्यावर बंधारे बांधण्यात आली आहेत़ तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक गावांमध्ये ओढे, नाले, नदी व तलावांचे प्रशासनाने लोकसहभागातून पुनरुज्जीवन केले आहे़ शिरपूर पॅटर्न व जलयुक्तमुळे गावे बहरली तर शिवारं हिरवीगार झाली़गत पावसाळ्यात बहुतांशी धरणे ओव्हर फ्लो सुध्दा झाली होती, परंतु काही बंधारे कमी-अधिक पाऊसामुळे भरली नव्हती़ पश्चिम भागातील बंधाºयात अडविण्यात आलेले पाणी काही महिन्यानंतर ते आटलीत़ गेल्या वर्षी पावसाने सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला मात्र नदी-नाले वाहून नेणारा पाऊस न झाल्यामुळे बंधारे-धरणे पाण्याने भरली नाहीत़ त्यामुळे आता जवळपास सर्वच धरणे-बंधारे कोरडी झाली आहेत़सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने आदिवासी भागातील गावांमधील नैसर्गिक जलस्त्रोत हळूहळू आटू लागले आहेत़ परिणामी ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ आदिवासी पाड्यांवर तर २-४ किमीपर्यंत पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे़ काही पाड्यांवर तर पाण्याच्या भटकंतीसाठी मुल-मुली शाळेला दांडी मारत आहेत तर काहींनी शाळेला कायमचा बाय दिला आहे़आतापर्यंत तालुक्यात एकही गावात टँकर नाही़ प्रशासनाच्यावतीने ग्रामस्थांना दिलासा देवून उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत़ अधिक टंचाईग्रस्त गावांमध्ये मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर करण्यात आलेली आहे़ त्यांचे अंदाजपत्रकासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे़ लवकरच या गावांमध्ये पाणी टंचाई दूर केली जाणार आहे़ प्रस्तावित गावांमध्ये बोअरविहिर करण्याची मागणी केली जात आहे़एकीकडे जलस्त्रोत आटत चालले असतांना दुसरीकडे धरणांमधील पाणीसाठाही खालावत चालला आहे़ करवंद व अनेर मध्ये प्रकल्पातच बºयापैकी पाण्याचा साठा आहे़ त्यापैकी करवंद धरणाचे पाणी शहरासाठी आरक्षित करण्यात आलेले आहे़आजमितीस या धरणात ३़३४ दशघमी म्हणजेच २०़६५ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे़ त्यात शिरपूर नगरपालिकेने २़८३ दशघमी एवढे पाणी आरक्षित केले आहे, तसेच करवंद येथील मका फॅक्टरीने सुध्दा पाणी आरक्षित केले आहे़ याशिवाय या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे़ त्यामुळे या धरणातील पाणीसाठी मे अखेरपर्यंत संपण्याची शक्यता नाकारता येत नाही़ २०१३ मध्ये हवाई सर्व्हेक्षण होवून या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याचे समोर आले आहे़ धरण बांधतेवेळी या धरणाची पाणीसाठा क्षमता ५० दशघमी एवढी होती़ मात्र २०१३ च्या सर्व्हेक्षणापर्यंत पाणीसाठा क्षमता १८़२६ दशघमी इतका राहीला़ शहरात संभाव्य पाणी टंचाई भासवू नये म्हणून नगरपालिकेने आधीच शहरातील सर्वच पाणी टाक्यांवर टयुबवेल केल्या आहेत़ फिल्टरशन प्लॅन येथे सुध्दा टयुबवेल व तापी फिल्टर प्लॅन सुरु केले.१० प्रकल्पात ठणठणाटतालुक्यातील करवंद धरणात २०.६५ टक्के, अनेर ५४.३३, अभणपूर ४०, नांदर्डे ६ आणि गधडदेव धरणात ८ टक्के जलसाठा आहे.तर लौकी, खामखेडा, जळोद, कालीकराड, वाडी, मिटगांव, बुडकी, रोहिणी, विखरण आणि वकवाड धरणात पाण्याचा ठणठणाट आहे.

टॅग्स :Dhuleधुळे