शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न लावणाऱ्यांवर होईल कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:07 IST

प्रश्न: कोरोना पार्श्वभूमीवर महापालिकेकडून कोणते प्रयत्न होत आहे. उत्त्तर : जिल्हा कोरोनामुक्त राहावा, बाधितांची संख्येत वाढ होऊ नये यासाठी ...

प्रश्न: कोरोना पार्श्वभूमीवर महापालिकेकडून कोणते प्रयत्न होत आहे.

उत्त्तर : जिल्हा कोरोनामुक्त राहावा, बाधितांची संख्येत वाढ होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनासह, महापालिका, आरोग्य व पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. या काळात मास्कचा वापर न करणाऱ्यांना २०० रुपये दंड लागू करण्यात आला आहे. त्यासाठी मनपाचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. दरराेज मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

प्रश्न: लग्नासाठी किती जणांना परवानगी देण्यात आली आहे.

उत्त्तर : विवाह सोहळा, अंत्यविधी व इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. विवाह सोहळ्यात ५० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यासाठी स्थानिक पोलीस ठाणे, तहसीलदार व स्थानिक स्वराज्य संस्थेची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे. याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी मनपाच्या पथकाकडून मंगल कार्यालयात पाहणी केली जाणार आहे.

प्रश्न: कोरोना चाचणीसाठी काय नियोजन करण्यात आले आहे.

उत्त्तर : शहरातील भाजी मंडई, मुख्य बाजारपेठा, मोठे संस्थाचालक, दुकानदार यांची रॅपिड टेस्ट करणे, कॉन्टक्ट ट्रेसिंगची संख्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. नागरिकांनी देखील भीती न बाळगता कोरोना चाचणी स्वत:हून करून घ्यावी.

प्रश्न: सार्वजनिक ठिकाणी काय निर्बंध लावण्यात आले आहे.

उत्त्तर : काही महिन्यांपासून नागरिकांनी हाॅटेल, दुकाने, सार्वजनिक उद्याने सकाळी ५ ते सकाळी ९ यावेळेत व्यायाम, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसाठीच खुले राहतील. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक, कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई होईल.

अन्यथा गुन्हा दाखल होईल

सर्दी, फ्लू व तत्सम आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी कोविड टेस्ट केली जात आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गर्दी करण्यास मनाई

आग्रारोड, देवपुरातील भाजीबाजार, पारोळा रोड, कराचीवाला खुटंसह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. सध्या ही गर्दी सर्व सामान्यांसाठी त्रासदायक ठरू शकते. कोरोनाचा संसर्ग वाढू नये. यासाठी भाजी बाजार व अन्य गर्दीच्या ठिकाणी कोरोना तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी

कोरोना संपला, लस बाजारात आली म्हणून विनामास्क लावणाऱ्यांची संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र मास्क व सॅनिटराझरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तीन महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत मोठी वाढ झाल्याने त्याठिकाणी लाॅकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला आहे. आपले शहर लाॅकडाऊन होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी.