शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

सोसाट्याचा वारा..संगे गारांचा वारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST

धुळे- हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्याला आज सोसाट्याचा वारा व गारापिटीने झोपडून काढले. विविध ठिकाणी सुमारे २५ ते ३० ...

धुळे- हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्याला आज सोसाट्याचा वारा व गारापिटीने झोपडून काढले. विविध ठिकाणी सुमारे २५ ते ३० मिनिटे झालेल्या दमदार पावसामुळे गहू, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शुक्रवारपासूनच जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याने अगोदरच ‘अलर्ट’ केल्याने, अनेक शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून घेण्यावर भर दिला होता. असे असतानाही अवकाळीचा तडाखा बसलाच.

पिंपळनेरला गारपीट

साक्री तालुक्यातील मालनगाव, खबरी, सातारपाडा तसेच बल्हाणे शिवारात शनिवारी दुपारी २ वाजता अचानक झालेल्या जोरदार अवकाळी पावसासोबत गारपीट होऊन शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. काही दिवसांवरच कांदा पीक पूर्ण क्षमतेने होणार होते पण त्यापूर्वीच अवकाळी पाऊस व गारपिटीने या भागातील शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे, एका शेतकऱ्यांच्या शेतात गारांचा खच दिसत होता, तर काढणीवर आलेला गहू या अवकाळी पाऊस व गारपिटीने संपूर्ण खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हातातोंडाशी आलेला घास शेवटी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पदरी संकट व निराशा घेऊनच आल्याचे शेतकरी सांगत आहे. बलाने येथे जोरदार गारपीट होऊन शेती पिकांचे नुकसान झाले असून त्वरित पंचनामे करावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास बिरारीस यांनी प्रशासनाकडे केली आहे तर शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनी केली आहे.

धुळ्यात मुसळधार पाऊस

धुळे शहरात दुपारपासूनच ढगाळ वातावरण तयार झालेले होते. सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पावसाला सुरूवात झाली. अवघ्या २० मिनिटाच्या पावसात सर्व शहर ओलेचिंब झालेले होते. अचानक पाऊस सुरू झाल्याने, बााजरपेठेतील व्यावसायिकांची चांगलीच धांदल उडालेली होती. नागरिकांनी पावसापासून बचाव व्हावा म्हणून दुकानाचा आडोसा घेतला होता.

वडजाई

वडजाई तिखी परिसरात जोरदार वादळ वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली, त्यात शेतात गहू काढत असताना शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली अचानक आलेल्या पावसामुळे गहू ओला होऊ नये म्हणून झाकावे लागले .

याशिवाय नेर, कुसुंबा, न्याहळोद या परिसरातही पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला होता.