शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सोसाट्याचा वारा..संगे गारांचा वारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST

धुळे- हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्याला आज सोसाट्याचा वारा व गारापिटीने झोपडून काढले. विविध ठिकाणी सुमारे २५ ते ३० ...

धुळे- हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्याला आज सोसाट्याचा वारा व गारापिटीने झोपडून काढले. विविध ठिकाणी सुमारे २५ ते ३० मिनिटे झालेल्या दमदार पावसामुळे गहू, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शुक्रवारपासूनच जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याने अगोदरच ‘अलर्ट’ केल्याने, अनेक शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून घेण्यावर भर दिला होता. असे असतानाही अवकाळीचा तडाखा बसलाच.

पिंपळनेरला गारपीट

साक्री तालुक्यातील मालनगाव, खबरी, सातारपाडा तसेच बल्हाणे शिवारात शनिवारी दुपारी २ वाजता अचानक झालेल्या जोरदार अवकाळी पावसासोबत गारपीट होऊन शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. काही दिवसांवरच कांदा पीक पूर्ण क्षमतेने होणार होते पण त्यापूर्वीच अवकाळी पाऊस व गारपिटीने या भागातील शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे, एका शेतकऱ्यांच्या शेतात गारांचा खच दिसत होता, तर काढणीवर आलेला गहू या अवकाळी पाऊस व गारपिटीने संपूर्ण खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हातातोंडाशी आलेला घास शेवटी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पदरी संकट व निराशा घेऊनच आल्याचे शेतकरी सांगत आहे. बलाने येथे जोरदार गारपीट होऊन शेती पिकांचे नुकसान झाले असून त्वरित पंचनामे करावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास बिरारीस यांनी प्रशासनाकडे केली आहे तर शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनी केली आहे.

धुळ्यात मुसळधार पाऊस

धुळे शहरात दुपारपासूनच ढगाळ वातावरण तयार झालेले होते. सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पावसाला सुरूवात झाली. अवघ्या २० मिनिटाच्या पावसात सर्व शहर ओलेचिंब झालेले होते. अचानक पाऊस सुरू झाल्याने, बााजरपेठेतील व्यावसायिकांची चांगलीच धांदल उडालेली होती. नागरिकांनी पावसापासून बचाव व्हावा म्हणून दुकानाचा आडोसा घेतला होता.

वडजाई

वडजाई तिखी परिसरात जोरदार वादळ वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली, त्यात शेतात गहू काढत असताना शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली अचानक आलेल्या पावसामुळे गहू ओला होऊ नये म्हणून झाकावे लागले .

याशिवाय नेर, कुसुंबा, न्याहळोद या परिसरातही पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला होता.