शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सोसाट्याचा वारा..संगे गारांचा वारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST

धुळे- हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्याला आज सोसाट्याचा वारा व गारापिटीने झोपडून काढले. विविध ठिकाणी सुमारे २५ ते ३० ...

धुळे- हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्याला आज सोसाट्याचा वारा व गारापिटीने झोपडून काढले. विविध ठिकाणी सुमारे २५ ते ३० मिनिटे झालेल्या दमदार पावसामुळे गहू, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शुक्रवारपासूनच जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याने अगोदरच ‘अलर्ट’ केल्याने, अनेक शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून घेण्यावर भर दिला होता. असे असतानाही अवकाळीचा तडाखा बसलाच.

पिंपळनेरला गारपीट

साक्री तालुक्यातील मालनगाव, खबरी, सातारपाडा तसेच बल्हाणे शिवारात शनिवारी दुपारी २ वाजता अचानक झालेल्या जोरदार अवकाळी पावसासोबत गारपीट होऊन शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. काही दिवसांवरच कांदा पीक पूर्ण क्षमतेने होणार होते पण त्यापूर्वीच अवकाळी पाऊस व गारपिटीने या भागातील शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे, एका शेतकऱ्यांच्या शेतात गारांचा खच दिसत होता, तर काढणीवर आलेला गहू या अवकाळी पाऊस व गारपिटीने संपूर्ण खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हातातोंडाशी आलेला घास शेवटी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पदरी संकट व निराशा घेऊनच आल्याचे शेतकरी सांगत आहे. बलाने येथे जोरदार गारपीट होऊन शेती पिकांचे नुकसान झाले असून त्वरित पंचनामे करावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास बिरारीस यांनी प्रशासनाकडे केली आहे तर शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनी केली आहे.

धुळ्यात मुसळधार पाऊस

धुळे शहरात दुपारपासूनच ढगाळ वातावरण तयार झालेले होते. सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पावसाला सुरूवात झाली. अवघ्या २० मिनिटाच्या पावसात सर्व शहर ओलेचिंब झालेले होते. अचानक पाऊस सुरू झाल्याने, बााजरपेठेतील व्यावसायिकांची चांगलीच धांदल उडालेली होती. नागरिकांनी पावसापासून बचाव व्हावा म्हणून दुकानाचा आडोसा घेतला होता.

वडजाई

वडजाई तिखी परिसरात जोरदार वादळ वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली, त्यात शेतात गहू काढत असताना शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली अचानक आलेल्या पावसामुळे गहू ओला होऊ नये म्हणून झाकावे लागले .

याशिवाय नेर, कुसुंबा, न्याहळोद या परिसरातही पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला होता.