शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

सर आली धाऊन... रस्ता गेला वाहूऩ़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 22:32 IST

मुसळधार पावसाचा परिणाम : रुग्णांसह सर्वांचेच हाल, रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

धुळे : साक्री रोडवरील जवाहर मेडीकल फाऊंडेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी सकाळी पाणी आल्याने पुन्हा एकदा एसीपीएम महाविद्यालय आणि रुग्णालयाचा शहराशी असलेला संपर्क तुटला़ परिणामी एसीपीएम महाविद्यालयाला दोन दिवसांची सुटी देण्याची वेळ आली़मोराणे, हरण्यामाळ परिसर तसेच नकाणे तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे साक्री रोड ते हरण्यामाळला जाणाºया रस्त्यावर तलावाच्या सांडव्यातील पाण्याचा प्रचंड प्रवाह वाढू लागला. त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचाही संपर्क तुटल्याने या ठिकाणी येणारे रुग्ण, महिला आणि त्यांच्या सोबत असलेल्या सर्वांचेच हाल झाले.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालयातील नॉन कोविड रुग्ण जवाहर मेडीकल कॉलेजमध्ये हलविले जात आहेत़ पाण्यामुळे रस्ता वाहून गेल्याने आता या रुग्णांसह त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टर व संपूर्ण स्टाप यांची गैरसोय होणार आहे़ या आधी साधारण १५ ते २० दिवसांपुर्वी नकाणे तलावाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी रस्त्यावर आल्याने जवाहर मेडीकलचा संपर्क तुटला होता़ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पाणी शिरु नये म्हणून बांधलेल्या बांधामुळे पाणी अडले व ते रस्त्यावर आले होते़ यावेळी शेतकºयांनी शेतातून पायवाट दिल्याने जवाहर मेडीकलचे कर्मचारी, डॉक्टर कसेबसे पोहचले होते़ दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत पाण्याचा प्रवाहाचा वेग तसाच होता़ परिणामी संपर्कच तुटल्याने दिवसभर सर्वांचे हालच झाले़ डॉक्टरांसह सर्वांना देखील रुग्णालयात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागल्याचे दिसून आले़दुसºयांदा तुटला संपर्क, पुन्हा हालचनकाणे तलाव परिसरात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस पडला. त्यामुळे काही तासातच नकाणे तलावाला जोडणाºया सांडव्यातील पाण्याची पातळी वाढून तलाव ओसंडून वाहू लागला. तलावातील पाणी रस्त्यावर आले. पाण्याचा एक मोठा प्रवाह जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या भिंतीला लागून रस्त्यावर आला. त्यामुळे हरणमाळ व धुळे शहराचा संपर्क दुसºयांदा तुटला़ मागील १५ दिवसांपुर्वी देखील असाच संपर्क तुटलेला होता़ तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे जाणाºया रस्त्यावरही पाणी आल्याने तो रस्ता देखील बंद झाला होता.पुन्हा तीच पुनरावृत्ती, लक्ष कधी देणार?गेल्यावर्षी पावसातही या भागात पाणी साचून रस्ता बंद झाला होता. त्यामुळे हॉस्पिटलच्या प्रशासनाने जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन तसेच जलसंपदा विभागाला पत्र देऊन ही समस्या दूर करण्याची मागणी केली होती. याशिवाय या रस्त्यावर मोरीचे बांधकाम करून रस्ता उंच करण्याची मागणीही करण्यात आली होती. परंतु ती मागणी पूर्ण न केल्याने पुन्हा हरण्यामाळचा धुळे शहराशी संपर्क तुटण्याची वेळ आली. हा प्रकार यापुर्वी देखील अनेकवेळा घडलेला आहे़ पुन्हा त्याची पुनरावृत्ती शुक्रवारी झाली, आता याकडे लक्ष कधी देणार, असा प्रश्नच आहे़

टॅग्स :Dhuleधुळे