शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षांकडून ‘सरपंचां’ची खरडपट्टी!

By admin | Updated: March 9, 2017 23:42 IST

जिल्हा परिषद : वैयक्तिक शौचालयांची टक्केवारी कमी असलेल्या ४० गावांच्या पदाधिकाºयांची सुनावणी

धुळे : वैयक्तिक शौचालयाचे काम समाधानकारक नाही़ सरपंचांचे पद केवळ शोभेचे नाही तर त्याची जबाबदारीसुद्धा सांभाळली पाहिजे़ याकामी जनजागृती करणे आणि ग्रामसेवकांना सोबत घेऊन काम करणे गरजेचे असताना मात्र दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे़ जबाबदारीचे भान सरपंचांनी बाळगायला हवे़ असेच सुरू राहिल्यास अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ वैयक्तिक शौचालयांची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी सुनावणीप्रसंगी व्यक्त केली़ जिल्ह्यातील शौचालयाची टक्केवारी कमी असलेल्या ग्रामसेवकांची सुनावणी घेतल्यानंतर गुरुवारी जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये जिल्ह्यातील ४० गावांतील सरपंचांना सुनावणीसाठी बोलाविण्यात आले होते़ त्यांच्याही गावात शौचालयांची टक्केवारी अगदी बोटावर मोजण्याइतकीच असल्याने त्यांची झाडाझडती घेण्यात आली़ या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे उपस्थित होते़ गेल्या १५ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील चारही तालुकानिहाय ग्रामसेवकांची सुनावणी घेण्यात आली़ अतिशय कमी काम झालेल्या ग्रामसेवकांची खरडपट्टी निघाल्यानंतर आता सरपंचांकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अध्यक्ष दहिते यांनी याकामी पुढाकार घेऊन लवकरच त्याबाबत बैठक लावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते़ त्यानुसार सभागृहात सुनावणी घेण्यात आली़ अध्यक्ष दहिते यांनी सांगितले, गावात स्वच्छता राखणे, गाव हगणदरीमुक्त करणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे़ त्याकडे दुर्लक्ष केल्यास सरपंचपद धोक्यात येऊ शकते़ या आनुषंगाने गाव हगणदरीमुक्त करण्याला प्राधान्य देण्यात यावे़ गावात आरोग्यपूर्ण वातावरण राखणे ही जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे़ गाव हगणदरीमुक्त करण्याच्या प्रक्रियेत दुर्लक्ष केल्यास ज्याप्रमाणे ग्रामसेवकांवर कारवाई होऊ शकते, तसे सरपंचांचेसुद्धा पद धोक्यात येऊ शकते़ सर्वांनी हा विषय प्राधान्याने घेऊन गाव हगणदरीमुक्त करावे़ या कामी कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत, असे आश्वासनही त्यांनी दिले़ सोनवणे यांनी सांगितले, मार्च २०१८ पर्यंत धुळे जिल्हा हगणदरीमुक्त करायचा आहे़ त्या दृष्टीने जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे़ आगामी काळात उद्दिष्ट गाठण्यासाठी सामूहिक योगदान महत्त्वाचे आहे़ त्यासाठी सरपंचांनीदेखील पुढाकार घेऊन अभियान पुढे नेण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, उपस्थित ४० सरपंचांची ग्रामपंचायतनिहाय सुनावणी घेऊन कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या़ गाव हगणदरीमुक्त करण्यासाठीचे नियोजन याबाबत विचारणा करण्यात आली़ सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावाची सद्य:स्थिती सांगून गावाचे नियोजन सादर करावे़ कामात प्रगती साधावी, अशा प्रकारच्या सूचना या वेळी देण्यात आल्या आहेत़ या गावातील सरपंचांचा होता समावेश धुळे तालुक्यात सडगाव, नवलाणे, बेंद्रेपाडा, खोरदड, चिंचवार, कुंडाणे, पाडळदे, जुन्नेर, लळींग, तांडा कुंडाणे़साक्री तालुक्यात अलाणे, म्हसदी प्ऱ पिंपळनेर, टेंभे प्ऱ वर्सा, वर्धाने, हट्टी बुद्रुक, हट्टी खुर्द, बुरुडके, घोडदे, जामदे, रुणमळी़ शिरपूर तालुक्यात लाकड्या हनुमान, आंबे, रोहिणी, उमडदे, खमखेडा प्ऱ आंबे, भोईटी, शेमल्या, बोरपाणी, हाडाखेड, बुडके़ शिंदखेडा तालुक्यात सुराय, तावखेडा प्ऱ ब़, वरुळ, वरझडी, तामथरे, शेवाडे, मेथी, रंजाने, जुने कोडदे, तावखेडा प्ऱ ऩस्वच्छ भारत मिशन ग्रामपंचायतअंतर्गत गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे़ ग्रामसेवकांच्या सुनावणीनंतर आता सरपंचांची सुनावणी घेण्यात आली़ ४० गावांमध्ये समाधानकारक काम झालेले नाही़ त्यामुळे कमी काम असलेल्या ग्रामपंचायतींनी आगामी काळात कामाची गती वाढविण्याची गरज आहे़ गाव हगणदरीमुक्त करावे़                                           - ओमप्रकाश देशमुख