शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

अध्यक्षांकडून ‘सरपंचां’ची खरडपट्टी!

By admin | Updated: March 9, 2017 23:42 IST

जिल्हा परिषद : वैयक्तिक शौचालयांची टक्केवारी कमी असलेल्या ४० गावांच्या पदाधिकाºयांची सुनावणी

धुळे : वैयक्तिक शौचालयाचे काम समाधानकारक नाही़ सरपंचांचे पद केवळ शोभेचे नाही तर त्याची जबाबदारीसुद्धा सांभाळली पाहिजे़ याकामी जनजागृती करणे आणि ग्रामसेवकांना सोबत घेऊन काम करणे गरजेचे असताना मात्र दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे़ जबाबदारीचे भान सरपंचांनी बाळगायला हवे़ असेच सुरू राहिल्यास अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ वैयक्तिक शौचालयांची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी सुनावणीप्रसंगी व्यक्त केली़ जिल्ह्यातील शौचालयाची टक्केवारी कमी असलेल्या ग्रामसेवकांची सुनावणी घेतल्यानंतर गुरुवारी जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये जिल्ह्यातील ४० गावांतील सरपंचांना सुनावणीसाठी बोलाविण्यात आले होते़ त्यांच्याही गावात शौचालयांची टक्केवारी अगदी बोटावर मोजण्याइतकीच असल्याने त्यांची झाडाझडती घेण्यात आली़ या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे उपस्थित होते़ गेल्या १५ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील चारही तालुकानिहाय ग्रामसेवकांची सुनावणी घेण्यात आली़ अतिशय कमी काम झालेल्या ग्रामसेवकांची खरडपट्टी निघाल्यानंतर आता सरपंचांकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अध्यक्ष दहिते यांनी याकामी पुढाकार घेऊन लवकरच त्याबाबत बैठक लावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते़ त्यानुसार सभागृहात सुनावणी घेण्यात आली़ अध्यक्ष दहिते यांनी सांगितले, गावात स्वच्छता राखणे, गाव हगणदरीमुक्त करणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे़ त्याकडे दुर्लक्ष केल्यास सरपंचपद धोक्यात येऊ शकते़ या आनुषंगाने गाव हगणदरीमुक्त करण्याला प्राधान्य देण्यात यावे़ गावात आरोग्यपूर्ण वातावरण राखणे ही जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे़ गाव हगणदरीमुक्त करण्याच्या प्रक्रियेत दुर्लक्ष केल्यास ज्याप्रमाणे ग्रामसेवकांवर कारवाई होऊ शकते, तसे सरपंचांचेसुद्धा पद धोक्यात येऊ शकते़ सर्वांनी हा विषय प्राधान्याने घेऊन गाव हगणदरीमुक्त करावे़ या कामी कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत, असे आश्वासनही त्यांनी दिले़ सोनवणे यांनी सांगितले, मार्च २०१८ पर्यंत धुळे जिल्हा हगणदरीमुक्त करायचा आहे़ त्या दृष्टीने जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे़ आगामी काळात उद्दिष्ट गाठण्यासाठी सामूहिक योगदान महत्त्वाचे आहे़ त्यासाठी सरपंचांनीदेखील पुढाकार घेऊन अभियान पुढे नेण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, उपस्थित ४० सरपंचांची ग्रामपंचायतनिहाय सुनावणी घेऊन कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या़ गाव हगणदरीमुक्त करण्यासाठीचे नियोजन याबाबत विचारणा करण्यात आली़ सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावाची सद्य:स्थिती सांगून गावाचे नियोजन सादर करावे़ कामात प्रगती साधावी, अशा प्रकारच्या सूचना या वेळी देण्यात आल्या आहेत़ या गावातील सरपंचांचा होता समावेश धुळे तालुक्यात सडगाव, नवलाणे, बेंद्रेपाडा, खोरदड, चिंचवार, कुंडाणे, पाडळदे, जुन्नेर, लळींग, तांडा कुंडाणे़साक्री तालुक्यात अलाणे, म्हसदी प्ऱ पिंपळनेर, टेंभे प्ऱ वर्सा, वर्धाने, हट्टी बुद्रुक, हट्टी खुर्द, बुरुडके, घोडदे, जामदे, रुणमळी़ शिरपूर तालुक्यात लाकड्या हनुमान, आंबे, रोहिणी, उमडदे, खमखेडा प्ऱ आंबे, भोईटी, शेमल्या, बोरपाणी, हाडाखेड, बुडके़ शिंदखेडा तालुक्यात सुराय, तावखेडा प्ऱ ब़, वरुळ, वरझडी, तामथरे, शेवाडे, मेथी, रंजाने, जुने कोडदे, तावखेडा प्ऱ ऩस्वच्छ भारत मिशन ग्रामपंचायतअंतर्गत गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे़ ग्रामसेवकांच्या सुनावणीनंतर आता सरपंचांची सुनावणी घेण्यात आली़ ४० गावांमध्ये समाधानकारक काम झालेले नाही़ त्यामुळे कमी काम असलेल्या ग्रामपंचायतींनी आगामी काळात कामाची गती वाढविण्याची गरज आहे़ गाव हगणदरीमुक्त करावे़                                           - ओमप्रकाश देशमुख