शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

सालगड्याचा पगार लाखावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:35 AM

गुढीपाडवा आला की शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी सालदाराचा शोध घेत असतात. परंतु, यंदा शेतात काम करण्यासाठी सालदार एक ...

गुढीपाडवा आला की शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी सालदाराचा शोध घेत असतात. परंतु, यंदा शेतात काम करण्यासाठी सालदार एक लाख रुपयापेक्षाही जास्त रकमेची मागणी करीत असल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील बहुतांश मजूर शेतात काम करण्यापेक्षा शहरात जाऊन कोणतेही काम केलेले बरे असे म्हणून शहराकडे कामासाठी निघून जात आहेत. त्यामुळे सालदार मिळणे कठीण झाले आहे. शेतीमध्ये सालदार मिळत नसल्याने व त्यांचे पगार लाखांच्यावर गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक कारणांमुळे शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने पगार देणे अवघड होऊन बसले आहे.

यंदा सालदारचा पगार कुठे ९० हजार तर कुठे १ लाखांवर गेल्याचे चित्र आहे. स्थानिक भागांमध्ये सालदार मिळत नसल्यामुळे परजिल्ह्यासह परराज्यातून (मध्य प्रदेश) येथून मजूर आणावे लागत आहेत. सहजासहजी सालदार मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने शेती करण्याला पसंती दिली आहे.

अनेक जण बैल मोडीत काढीत आहेत. शेती वाटणीने देण्याची पद्धत ही वाढली असून अर्धा हिस्सा अथवा तिसरा हिस्सा देऊन शेती केली जात आहे. त्यामुळे काम करणाऱ्यासोबत आपल्यालाही हिस्सा मिळत असल्याने संबंधित व्यक्ती चांगले कष्ट करून उत्पादनात वाढ करील आणि त्यातून आपल्याला हिस्सा मिळेल, या उद्देशाने शेती वाटणीने देण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे महागाई वाढत असल्याने सालगड्यांनाही आपल्याला मिळणारा पगार वाढवून द्यावा, अशी अपेक्षा वाटत आहे. शहरात गेल्यावर छोटी-मोठी कामे केली तर त्यातून मिळणाऱ्या पैशांतून आपले कुटुंब बऱ्यापैकी चालते, म्हणून शहरात जाऊन कामे केलेली बरी असा मतप्रवाह मजुरांमध्ये दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी याचा चांगलाच धसका घेतला असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. एकीकडे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा मुहूर्त जवळ आलेला असताना तालुक्यातील शेतकऱ्यांना मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे.

यांत्रिक शेतीवर भर - राज्य व केंद्र सरकारकडून शेती अवजारासाठी अनुदान मिळत असल्याने व मजुरांची उपलब्धता होत नसल्याने तालुक्यातील छोटे-मोठे शेतकरी यांत्रिक शेती करण्याकडे भर देत असल्याचे चित्र आहे. एकीकडे शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करीत आहेत. मात्र, दुसरीकडे सालगड्याची जीवनशैली बदलली असल्याने सालगडी ठरवणे व कराराप्रमाणे काम करून घेणे जिकिरीचे ठरत आहे. ग्रामीण भागातील तरुणांचे शिक्षण झाले आहे, असे म्हणत शेतीतील कामांना टाळत आहेत. मागील पिढीतील युवा शेतकरी काम करण्यास तयार होतात. परंतु, तेही रोजंदारी पद्धतीवर. याचा मोठा परिणाम बटाई(निम्मे) असलेल्या मोठ्या शेतकऱ्यांवर होत असल्याचे चित्र आहे. लाख रुपये मोजनदेखील हवा तसा सालदार मिळत नसल्याची परिस्थिती तालुक्यात दिसून येत आहे.