शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST

धुळे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जलदगतीने पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळवून ...

धुळे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जलदगतीने पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करीत शिवेसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. परंतु पंचनामे करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. पंचनामे अतिशय संथ गतीने सुरू आहेत, शिवाय काही भागात पंचनामे होत आहेत तर काही भागात पंचनामे होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच नुकसान झाले असताना देखील ५० टक्क्यांच्या वर आणेवारी लावणे चुकीचे आहे. पीक विमा कंपनीच्या बाबतीतही तक्रारी आहेत. नुकसानग्रस्त भागामध्ये विमा कंपनीचे कर्मचारी कोऱ्या अर्जांवर शेतकऱ्यांच्या सह्या घेत आहेत. अनागाेंदी कारभार सुरू आहे. त्याची चाैकशी होणे गरजेचे आहे. विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कर्ज त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनात केली आहे.

शेतकऱ्यांच्या या मागण्या त्वरित मान्य न केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, आधार हाके, विलास चाैधरी, देवराम माळी, गीतेश पाटील, किशोर आढावे, जगदीश पाटील, रवींद्र माळी, अरुण जाट आदी उपस्थित होते.