शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST

धुळे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जलदगतीने पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळवून ...

धुळे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जलदगतीने पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करीत शिवेसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. परंतु पंचनामे करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. पंचनामे अतिशय संथ गतीने सुरू आहेत, शिवाय काही भागात पंचनामे होत आहेत तर काही भागात पंचनामे होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच नुकसान झाले असताना देखील ५० टक्क्यांच्या वर आणेवारी लावणे चुकीचे आहे. पीक विमा कंपनीच्या बाबतीतही तक्रारी आहेत. नुकसानग्रस्त भागामध्ये विमा कंपनीचे कर्मचारी कोऱ्या अर्जांवर शेतकऱ्यांच्या सह्या घेत आहेत. अनागाेंदी कारभार सुरू आहे. त्याची चाैकशी होणे गरजेचे आहे. विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कर्ज त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनात केली आहे.

शेतकऱ्यांच्या या मागण्या त्वरित मान्य न केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, आधार हाके, विलास चाैधरी, देवराम माळी, गीतेश पाटील, किशोर आढावे, जगदीश पाटील, रवींद्र माळी, अरुण जाट आदी उपस्थित होते.