शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST

धुळे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जलदगतीने पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळवून ...

धुळे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जलदगतीने पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करीत शिवेसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. परंतु पंचनामे करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. पंचनामे अतिशय संथ गतीने सुरू आहेत, शिवाय काही भागात पंचनामे होत आहेत तर काही भागात पंचनामे होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच नुकसान झाले असताना देखील ५० टक्क्यांच्या वर आणेवारी लावणे चुकीचे आहे. पीक विमा कंपनीच्या बाबतीतही तक्रारी आहेत. नुकसानग्रस्त भागामध्ये विमा कंपनीचे कर्मचारी कोऱ्या अर्जांवर शेतकऱ्यांच्या सह्या घेत आहेत. अनागाेंदी कारभार सुरू आहे. त्याची चाैकशी होणे गरजेचे आहे. विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कर्ज त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनात केली आहे.

शेतकऱ्यांच्या या मागण्या त्वरित मान्य न केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, आधार हाके, विलास चाैधरी, देवराम माळी, गीतेश पाटील, किशोर आढावे, जगदीश पाटील, रवींद्र माळी, अरुण जाट आदी उपस्थित होते.