शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी कांदा लागवड अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 12:58 IST

मालपूर : भारनियमनाच्या वेळेत बदल करुन, दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपुरसह परिसरात यावर्षीच्या खरीपातील कांदा लागवडीस सुरुवात झाली आहे. मात्र, परिसरात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे विहीरी, कुपनलिकात असेल तितक्या पाण्यात कांदा लागवड करण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. मात्र, अवेळीच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामुळे किमान कांदा लागवडीसाठी दिवसा पुर्णवेळ वीजपुरवठा सुरू ठेऊन शेतकरी हिताचे धोरण कंपनीने राबवावे, अशी मागणी येथील शेतकºयांनी केली आहे.मालपूरसह सुराय, कलवाडे चुडाणे, अक्कलकोस, कर्ले, परसोळे, देवकानगर आदी भागात दरवर्षी कांदा लागवड मोठया प्रमाणावर होत असते. मात्र, यावर्षी कांद्याच्या रोपाअभावी क्षेत्रफळात घट दिसून येत आहे. कांद्याची लागवड करायची असेल तर महिना-दीड महिना आधीच रोप टाकावे लागते. येथील शेतकºयांनी रोप देखील टाकले. मात्र, बहुतांश शेतकºयांची रोपे कोमेजून गेली. काहींनी दुबार रोप टाकले आहे. त्याची देखील वाढ व उगवण क्षमता योग्य दिसून येत नाही. त्यामुळे यावर्षी येथे कांदा लागवड क्षेत्र घटणार आहे. तसेच सध्याचा बाजारातील कांद्याचे भाव पहाता या नगदी पिकाकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे.१५ जूनला झालेल्या पावसानंतर येथे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यानंतर दमदार पाऊस झालाच नाही. नदी, नाले ओसंडून वाहुनच निघाले नाहीत. येथील अमरावती मध्यम प्रकल्पात अद्याप एक थेंब देखील पाणी जमा झाले नाही. मागीलवर्षीचे पाणी शिल्लक आहे. विहीरीची जलपातळी आतापासून घटत चालल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. कांदा हे भरपूर पाण्याचे पिक आहे. भाद्रपद महिन्यात जोरदार पाऊस येईल, या आशेवर सध्या असेल तेवढ्या पाण्यावर येथील शेतकरी कांदा लागवड करतांना दिसून येत आहेत.काही शेतकरी विकत रोप आणून कांद्याची लागवड करीत आहे. यासाठी भांडवल जास्त खर्च होते. मात्र कांद्याच्या उत्पादनातुन येथील बºयाच शेतकºयांनी प्रगती साधली आहे म्हणून हा धाडसी निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. शेतकरी जोखीम पत्करून कांदा पिकाची लागवड करीत असतात.यावर्षी येथे कडधान्य पिके पाण्याअभावी वाया गेली आहेत. तर भुसार पिकातून पाहिजे तेवढे उत्पादन हाती लागत नाही. म्हणून कांदा हे नगदी पिक असून मागीलवर्षी कमी उत्पन्न हाती लागले तरीही हातात चलन मात्र समाधानकारक आल्याने येथील कांदा लागवडीसाठी काही शेतकºयांची ओढ मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे.मात्र भारनियमनाच्या चुकीच्या वेळेमुळे कांदा लागवड अडचणीत आली असून यासाठी दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा सुरू ठेवण्याची गरज आहे. महिन्यातून चार वेळा येथे भारनियमनात बदल होत असून दर महिन्याला वेगवेगळी वेळ असते. सध्या आॅगस्ट महिन्यात रात्री ८.३५ ते सकाळी ६.३५ वीजपुरवठा सुरू राहणार आहे.तर दिवसा सकाळी ७.५० ते ३.५० यावेळेत भारनियमन राहणार आहे. यामुळे कांदा लागवड कशी करावी, असा प्रश्न येथील शेतकºयांना पडला आहे. त्यात मजुरांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यात रात्रीच्या वेळी लागवड करणे शक्य नाही. यासाठी दिवसा अखंडीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.