शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या खर्चाची लाखोंची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST

धुळे जिल्ह्यात एकूण २१८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या, त्यापैकी माघारीअंति ३६ बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित १८२ ग्रामपंचायतींमध्ये मतदान घेण्यात आले़ ...

धुळे जिल्ह्यात एकूण २१८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या, त्यापैकी माघारीअंति ३६ बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित १८२ ग्रामपंचायतींमध्ये मतदान घेण्यात आले़ शिरपूर तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींपैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित २८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली़ यात राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सदस्य संख्येनुसार १५ ते ७५ हजार रुपये खर्च करण्यास मान्यता दिली होती. परंतु, आयोगाने दिलेल्या खर्चाच्या मर्यादा जिल्ह्यातील बहुतेक सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ओलांडल्या आहेत. या तालुक्यातील दहिवद, सावळदे, विखरण, मांडळ, भाटपुरा, होळ आदी मोठ्या ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा निवडणूक खर्च लाखोंच्या घरात गेला आहे़

दहिवद येथे एका पॅनलतर्फे मतदानाच्या पूर्वसंध्येला काही मतदारांना प्रत्येकी ३ हजार रुपये देण्यात आल्यानंतर पुन्हा मतदानाच्या भल्या पहाटे २ हजार रुपये देऊन ज्वारी हातात घेऊन शपथ घ्यायला सांगून मतदान करण्यास प्रवृत्त केले़ बहुतांश मतदारांना १ ते ३ हजारांपर्यंत पॅनलप्रमुखांनी पैशाचे वाटप केले़

सावळदे येथे प्रति मतदार ३०० रूपयांसह साडी व ड्रेसचे वाटप करण्यात आले. एका उमेदवाराने तर चक्क १५०० रुपये दिले तर नवीनच राजकारणात शिरकाव केलेल्या एकाने १ हजार रुपये मतदारांना दिलेत़ अधिकाधिक मतदारांना आमिषे देऊन या ठिकाणी मते पदरात पाडण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत दिसून आला़

मांडळ येथेही १ हजारापासून २ हजारांपर्यंत मतदारांना रोकड देऊन खुश करण्यात आले़ याशिवाय भाटपुरा, विखरण, होळ, शिंगावे, जुने भामपूर, बलकुवे आदी मोठ्या गावांमध्ये पैशांचा महापूर वाहिला़ संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर साड्या, ड्रेस, विविध प्रकारच्या वाणांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले़ निवडणुका जाहीर झाल्यापासून उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात मिष्टान्न व मांसाहार जेवणाच्या रोज पंगती उठवल्या जात होत्या़ मतदानाच्या बहुतेक सर्व मोठ्या व चुरशीच्या ग्रामपंचायतीत अनेक सदस्यांनी थेट मतदारांना पैसे वाटप करण्यात आले़ एका मतासाठी ३०० रुपयांपासून ५००, १०००, १५००, २००० तर काहींना ३ हजार रुपयांचे देखील वाटप करण्यात आल्याची चर्चा जोरात सुरू आहे. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, इंदोर, सुरत येथे नोकरीनिमित्त गेलेल्या मतदारांना गावाला घेऊन येणे व पुन्हा सोडण्यासाठी देखील विशेष सोयी करण्यात आल्या होत्या़

दहिवद येथे एका ग्रामपंचायत उमेदवाराने तब्बल एका मतदानाला ५ हजारांपर्यंत वाटप केल्याची जोरदार चर्चा गावाच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे़ सावळदे येथे कपड्यांसह रोख रक्कम दिल्याची चर्चिले जात आहे.