शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे यंदा खंडेराव यात्रोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:33 IST

२७ फेब्रुवारी रोजी यात्रोत्सव असून मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे़ जिल्ह्यातील विविध भागातील ...

२७ फेब्रुवारी रोजी यात्रोत्सव असून मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे़ जिल्ह्यातील विविध भागातील यात्रा, जत्रा, उत्सव, आनंदमेळावा यांना जिल्हा प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे़

खान्देशातील खंडोबाची एक महत्त्वाची यात्रा म्हणून शिरपूर यात्रा आहे. अरुणावती नदीच्या काठावर व नदीपात्रात ही यात्रा दोन आठवडे भरते़ यात्रोत्सवात सर्वात मोठी उलाढाल मेवाशी मेळाव्यात होत असते़ या काळात मार्केट कमिटी सुमारे ३ कोटींच्यावर उलाढाल करते़ या यात्रोत्सवात राजस्थान, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यातून घोडे, बैल, म्हैशी विक्रीसाठी येतात़

मेवाशी मेळावा मार्केट कमिटीच्या आवारात भरत असतो़ या ठिकाणी चारा मुबलक मिळत असल्यामुळे तब्बल महिनाभर हा मेवाशी मेळावा भरत असतो़ या यात्रोत्सवात खर्दे बु़ व शिंगावे येथील ग्रामस्थ यात्रेनिमित्त तगतराव सजवून आणून अनेक वर्षापासून ही परंपरा त्यांनी जोपासली आहे़ खंडेराव बाबा भक्त मंडळाने लोकांच्या सहभागातून या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. मंदिराचे भव्य आकर्षक रूप यात्रेकरूंना नेहमीच आकर्षित करीत आहे. याचबरोबर हा परिसरदेखील प्रेक्षणीय ठरावा म्हणून विकास कामे झाली आहेत.

अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेल्या धार्मिक कार्यातून या मंदिराची स्थापना झाली असावी असे सांगितले जाते. नवसाला पावणारा देव म्हणून खंडेराव महाराज मानले जातात. येथील कालू बाबा खंडेरावांची निस्सीम सेवा पूजाअर्चा करूनही मूलबाळ नव्हते म्हणून व्यथित होते. खंडेरावाला स्वतचे शिर अर्पण करण्याचा नवस त्यांनी करून मूल होण्याचे साकडे घातले. त्यांनी शिर अर्पण केल्यावर रक्त न निघता भंडारा निघाला अशी आख्यायिका आहे. नवस करून, देवाला साकडे घालून आपली मनोकामना पूर्तीसाठी यात्रेच्या काळात मान-मानता, नवस करणारे अनेक नवदाम्पत्य व भाविक येत असतात.

यात्रेत दुकान थाटणारे व्यापारी यात्रोत्सव आहे की नाही, याची विचारणादेखील मंदिर संस्थानचे अध्यक्ष कैलास धाकड यांच्याकडे करीत होते़ मात्र प्रशासनाने नकार दिल्यामुळे यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे़