शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

नवीन पाणीपुरवठा योजनेची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:09 IST

मौजे कुसुंबा येथील ग्रामस्थांची मागणी : जिल्हा प्रशासन, जि.प. अधिकाऱ्यांना दिले निवेदन

धुळे : तालुक्यातील मौजे कुसुंबा येथील नवीन नळ पाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्यात येऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. हा प्रश्न येत्या ४-५ दिवसात न सुटल्यास ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करतील असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, कुसुंबा येथे २००६-०७ मध्ये नवीन पाईप लाईन नळ पाणी पुरवठा योजना सुमारे ७० लाख रूपये करून करण्यात आली. नवीन नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी व राबविण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली नाही. ही योजना मंजूर करण्यासाठी बनावट ठराव करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.कुसुंबा गावाची रचना चौरस पद्धतीने अभियंता सर विश्वेश्वरैय्या यांनी आखणी केलेली आहे. गावात सात गल्ल्या आहेत.नवीन नळ पाणी पुरवठा योजना गावाच्या पुढील गल्लीतून करणे योग्य नव्हते. तांत्रिकदृट्या चुकीच्या पद्धतीने ही पाईपलाइन केलेली आहे. ही पाईपलाईन ठिकठिकाणी फुटून पाणी वाहून जाते. तसेच बांधलेला जलकुंभ १२ वर्षांपासून रिकामा आहे. त्यामुळे या योजनेची चौकशी होणे गरजेचे आहे. सध्या गावात दहा दिवसानंतर पाणी येत आहे. दुष्काळीस्थितीत नवीन पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी सोडण्यात येत असल्याने, गावातील ग्रामस्थांना पूरेसे पाणी मिळत नाही.जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाने गावात येऊन या योजनेची पहाणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी शुक्रवारी दुपारी आपल्या मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून, निवेदन प्रशासनाला निवेदन दिले.निवेदनावर जयश्री पवार, रत्ना परदेशी, सुरेखा पवार, मंदाबाई परदेशी, अनिता परदेशी, रेणुकाबाई परदेशी, यमुनाबाई परदेशी, कुसुमबाई परदेशी, शुभांगी परदेशी, सुनीता परदेशी, मंगलाबाई परदेशी, मीराबाई परदेशी यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे