शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नवीन पाणीपुरवठा योजनेची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:09 IST

मौजे कुसुंबा येथील ग्रामस्थांची मागणी : जिल्हा प्रशासन, जि.प. अधिकाऱ्यांना दिले निवेदन

धुळे : तालुक्यातील मौजे कुसुंबा येथील नवीन नळ पाणी पुरवठा योजनेची चौकशी करण्यात येऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. हा प्रश्न येत्या ४-५ दिवसात न सुटल्यास ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करतील असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, कुसुंबा येथे २००६-०७ मध्ये नवीन पाईप लाईन नळ पाणी पुरवठा योजना सुमारे ७० लाख रूपये करून करण्यात आली. नवीन नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी व राबविण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली नाही. ही योजना मंजूर करण्यासाठी बनावट ठराव करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.कुसुंबा गावाची रचना चौरस पद्धतीने अभियंता सर विश्वेश्वरैय्या यांनी आखणी केलेली आहे. गावात सात गल्ल्या आहेत.नवीन नळ पाणी पुरवठा योजना गावाच्या पुढील गल्लीतून करणे योग्य नव्हते. तांत्रिकदृट्या चुकीच्या पद्धतीने ही पाईपलाइन केलेली आहे. ही पाईपलाईन ठिकठिकाणी फुटून पाणी वाहून जाते. तसेच बांधलेला जलकुंभ १२ वर्षांपासून रिकामा आहे. त्यामुळे या योजनेची चौकशी होणे गरजेचे आहे. सध्या गावात दहा दिवसानंतर पाणी येत आहे. दुष्काळीस्थितीत नवीन पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी सोडण्यात येत असल्याने, गावातील ग्रामस्थांना पूरेसे पाणी मिळत नाही.जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाने गावात येऊन या योजनेची पहाणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी शुक्रवारी दुपारी आपल्या मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून, निवेदन प्रशासनाला निवेदन दिले.निवेदनावर जयश्री पवार, रत्ना परदेशी, सुरेखा पवार, मंदाबाई परदेशी, अनिता परदेशी, रेणुकाबाई परदेशी, यमुनाबाई परदेशी, कुसुमबाई परदेशी, शुभांगी परदेशी, सुनीता परदेशी, मंगलाबाई परदेशी, मीराबाई परदेशी यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे