शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

थाळनेरला पाणीपुरवठा योजनेची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:35 IST

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, धुळे यांच्यामार्फत शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे सन २०१७/२०१८मध्ये एक कोटी ...

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, धुळे यांच्यामार्फत शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे सन २०१७/२०१८मध्ये एक कोटी २७ लाख ६९ हजार ७४३ रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. या योजनेचे काम ठेकेदाराने १५ महिन्यांत पूर्ण करून त्यानंतर किमान तीन वर्षे योजना चालविणे कंत्राटदारावर बंधनकारक होते. योजना पूर्ण झाल्यानंतरच ठेकेदाराला अंतिम देयके अदा करण्यात येणार होती. परंतु ठेकेदाराने संथगतीने व निकृष्ट दर्जाचे काम केले. त्यामुळे ४ वर्षांनंतरही ही योजना पूर्ण झालेली नाही. या योजनेबाबत ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत व नागरिकांनी तोंडी तक्रारी केल्या होत्या. याबाबत पंचायत समिती सदस्य विजय बागुल यांनी गटविकास अधिकारी शिरपूर यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी शिरपूर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि. प. धुळे यांना लेखी कळविले होते. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्‍हा परिषद धुळे यांनी सदर तक्रारीची दखल घेऊन पाणीपुरवठा योजना कामाची चौकशी करून अहवाल तत्काळ कार्यालयास सादर करण्यासंबंधीचे पत्र उपअभियंता साखरे यांना दिले होते. या पत्राच्या अनुषंगाने तब्बल एक महिन्यानंतर साक्री येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप विभागीय अभियंता ए.आर. पाटील यांनी थाळनेरला चौकशीसाठी भेट दिली. त्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने बसस्थानकाजवळील पाण्याची टाकी, जमादारपाडा, दामशेरपाडा, मच्छी बाजार आदी भागांत जाऊन पाहणी केली. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांवर नागरिकांनी तोंडी तक्रारींचा भडिमार केला. नागरिकांनी अनेक भागांत जुन्या पाइपलाइनद्वारे पाणी येत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच अनेक भागांत आजपर्यंत नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणीच आले नसल्याचे सांगितले. तसेच अनेक ठिकाणी पाण्याची गळती दाखविली. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यताही बोलून दाखवली.

या वेळी पंचायत समिती सदस्य विजय बागुल, ग्रामपंचायत सदस्य नवनीत वाडीले, श्याम भील, विकास सोसायटीचे चेअरमन दिनकरराव पाटील, मुकेश ठाकरे, कुबेर जमादार, दिलीप कोळी, रवींद्र तवर, रामकृष्ण बोरसे, अक्षय पाटील, भैरव जमादार, सुनील पाटील, ग्राम विकास अधिकारी वेताळे व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. दरम्यान, सदर अधिकाऱ्यांनी २/३ तासांत चौकशी आटोपती घेतल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.