शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अवघड क्षेत्रातील १४ शाळा भरतात झोपडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:10 IST

शिरपूर तालुक्यातील स्थिती : मुख्य रस्त्यापासून चार-पाच कि.मी.दूर, पावसाळ्यात होतात सर्वाधिक हाल 

सुनील साळुंखे । लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यात अवघड क्षेत्रातल्या ३३ जिल्हा परिषद मराठी शाळांना तक्तालीन सीईओंनी सर्व्हे करून मंजुरी देण्यात आलेली होती़ परंतु त्यामधून १९ शाळा कुठलाही सारासार विचार न करता वगळण्यात आल्यामुळे फक्त १४ शाळांना मंजुरी देण्यात आली आहे़ त्यामुळे डोंगर-दºयातील व त्या शाळांना ये-जा करण्यासाठी रस्ता, भौतिक सुविधा नसतांनाही वगळण्यात आलेल्या १९ शाळांमधील शिक्षकांवर अन्याय झालेला आहे़ वगळलेल्या शाळा कोणत्या कारणांमुळे रद्द केल्या, ते मात्र सांगण्यात आलेले नाही़ १४ शाळांमध्ये पोहचणेही कठीण आहे. पावसाळ्यात सर्वाधिक हाल होतात. जून २०१७ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी तालुक्यातील अवघड क्षेत्रातील शाळांचा सर्व्हे करून ३३ शाळांची यादी मंजूर केली होती़ त्यात या तालुक्यातील अंबडपाडा-सामºयापाडा, एकलव्यपाडा-बोराडी, धाबादेवीपाडा- सलईपाडा, विद्यानगर-टेंभेपाडा, वरचे रोषमाळ-गधडदेव, मालपूरापाडा-मालकातर, नवादेवी, उमरपाडा-चाकडू, धरमपूरापाडा- गधडदेव, विकलापाडा- मालकातर, इंगन्यापाडा-फत्तेपूर फॉरेस्ट, रोषमाळ, रामपूर, कढईपाणी-उमर्दा, प्रधानदेवी-उमर्दा, साकळीपाडा, कंज्यापाणी, बिकानेर-हाडाखेड, कुंडीपाडा-खैरखुटी, शेकड्यापाडा-खैरखुटी, काकडमाळ, थुवानपाणी-गुºहाळपाणी, निशानपाणी, पिपल्यापाणी-रोहिणी, नोटूपाडा-हिगांव, कौपाटपाडा-हिगांव, नवापाडा-लाकड्या हनुमान, टिटवापाणी-चिलारे,  खुटमळी-चिलारे, पिरपाणी-चिलारे, कोईडोकीपाडा- सावेर, सातपाणीपाडा-महादेव दोंदवाडे, न्यु सातपाणी-महादेव दोंदवाडे या शाळांचा समावेश होता़ या गावातील शाळांमध्ये ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्यापासून ४-५ किमी अंतरावर असून तेथे जाण्यासाठी पायवाटेने जावे लागते़ कुठलेही वाहन जात नाही, खडकळ रस्ता, नदी-नाल्यातून जावे लागते, पावसाळ्यात तर ये-जा करणे शक्य नाही़ पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो, विजेची सोय नाही तसेच भौतिक सुविधांपासून तेथील ग्रामस्थ वंचित राहतात़ अशाही परिस्थितीत तेथे झोपडीवजा घरात ज्ञानदानाचे काम केले जाते़ अवघड क्षेत्रातील शाळा सर्वसाधारणपणे तालुका मुख्यालयापासून दूर, दळणवळणाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोहचण्यास सोईसुविधा नाहीत, दुर्गम व डोंगराळ भागातील गावे तसेच काम करण्यास प्रतिकूल असलेली गावे ही अवघड क्षेत्र म्हणून निश्चित केली जातात असा अध्यादेश आहे़ या अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदली करतेवेळी प्राधान्य दिले जाते़ किमान त्याने ३ वर्षे त्या भागात नोकरी केली पाहिजे असे शिक्षकांना अधिक लाभ होतो, भविष्यात या शिक्षकांना आर्थिक व इतर लाभ देखील मिळू शकणार आहेत़ पेसा अंतर्गत आदिवासी भागातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी दिली आहे, त्याप्रमाणे भविष्यात या शिक्षकांना देखील लाभ होवू शकणार आहे़त्यामुळे आता फक्त या तालुक्यातील १४ शाळेतील शिक्षकांनाच लाभ मिळणार आहेत़ त्यात वरचे रोषमाळ-गधडदेव, मालपूरापाडा- मालकातर, कढईपाणी- उमर्दा, प्रधानदेवी-उमर्दा, साकळीपाडा, कंज्यापाणी, थुवानपाणी- गुºहाळपाणी, निशानपाणी, पिपल्यापाणी-रोहिणी, टिटवापाणी-चिलारे,  खुटमळी-चिलारे, पिरपाणी-चिलारे, कोईडोकीपाडा- सावेर,  न्यु सातपाणी-महादेव दोंदवाडे या शाळांचा समावेश आहे़उर्वरीत १९ शाळांना वगळण्यात आल्यामुळे त्या शाळेतील शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे़ त्याही शाळा डोंगरदºयात असतांना नेमके कोणत्या कारणामुळे वगळ्यात आल्या त्याचा खुलासा करावा अशा आशयाचे निवेदन सीईओंना देण्यात आले आहे़ मात्र अद्यापपर्यंत त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही़शासनाच्या धोरणामुळे आदिवासी मुलांची शिक्षणाची गैरसोय नको म्हणून शाळांना मंजूरी दिली जाते़ गावातील ग्रामस्थांच्या मदतीनेच झोपडीवजा खोली मुलांसाठी सजली जाते़ मुले अ-ब-क-ड़़़ गिरवू लागतात, गाणी म्हणू लागतात, त्याच झोपडीत कुटुंबांची रेलचेल़़़ कोंबड्यांची पिलावळ तर कधी सापाचे दर्शनही घडते़  आज ना उद्या आपल्या गावात शाळेची टुमदार इमारत होईल असे स्वप्न साºयांचेच, परंतु ८-१० वर्षे झाली तरी या मुलांचे दिवस मात्र झोपडीतच काढावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळाले़ दहा बाय दहाच्या खोलीत पहिली ते चौथीची मुले, गुरेढोरांचा कुबट वास, ऊन पावसाची परिस्थिती, त्यातच मुलांना गोणपाटाची स्वच्छता गृहे तग धरून आहेत़ पाण्याची पुरेसी सोय नाही़ खिचडी शिजविण्याची जागा नाही़ प्रत्येक शाळेत भौतिक सुविधा पुरविण्याच्या जाहीराती पाहून धन्य वाटते, परंतु असे वास्तव देखील आहे हे कळाल्यावर मात्र शासन किती निष्ठूर आहे याची जाणीव होते़ पाऊस आला म्हणजे काय हाल होत असतील कोण जाणे! तेथील गुरूजनांची होणारी परवड लक्षात घेण्याजोगी आहे़ शाळा वर्ग खोली, स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा, स्वयंपाकगृह आदी भौतिक सुविधा नसल्याने शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होतांना दिसते़घरात अठराविश्व दारिद्रय असलेल्या आदिवासी मुलांच्या जीवनात शाळा हाच बंगला़़़ मनमोहक जागा़़़ प्रगतीची दारे सारे काही असतांना गुणवत्तेचा आग्रह धरण्याअगोदर अशा शाळांना भौतिक सुविधा द्याव्यात़ जेणेकरून मुलांचे मन तेथे चांगल्या प्रकारे रमेल. अन्यथा मुलांचे भविष्य अंधारातच राहील व त्याचे पाप हे शासनाच्या माथी आल्याशिवाय राहणार नाही़कौपाटपाडा येथे शाळेसाठी जागा मंजूऱ़़४हिगांव ग्रामपंचायत अंतर्गत असलेली कौपाटपाडा येथे गावाने गावठाणची १८५ चौमि जागा शाळेसाठी मंजूर केली आहे़ मात्र हा पाडा अभयारण्य क्षेत्रात येत असल्यामुळे येथे बांधकामास मंजूरी मिळत नाही़ या ठिकाणी १ ते ४ वर्ग असून १२ मुले-मुलींना शिक्षण देण्याचे काम दोन शिक्षक करतात़ सदर शाळा सन २०१२ पासुन सुरू केलेली असून झोपडीवजा खोली शाळा भरते़४शिरपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २६४ शाळा असून त्यापैकी कौपाटपाडा, टिटवापाणी, खुंटमळी, पिरपाणी, काईडोकीपाडा, सोज्यापाडा, सातपाणीपाडा, चिंचपाणी, रोलसिंगपाडा या शाळांना ८ वर्षापासून मंजुरी मिळाली असतांना अद्यापपर्यंत इमारत नाही़ सद्यस्थितीत मुले उघड्यावर शिक्षण घेत आहेत़ या शाळांना २००७-८ मध्ये वर्ग खोल्या बांधकामासाठी देखील निधी मंजूर झाला होता, परंतु या शाळा अभयारण्य क्षेत्रात येत असल्यामुळे बांधकामास परवानगी मिळाली नाही़ त्यामुळे आलेला निधी परत पाठवावा लागला आहे़ याठिकाणी १ ते ४ वर्ग असून झोपडीवजा खोलीत त्यांची तात्पुरती सुविधा करण्यात आली आहे़ सन २०१५-१६ मध्ये देखील मालपूरपाडा, प्रधानदेवी, शेकड्यापाडा, न्यु सातपाणी व भूपेशनगर या शाळांना मंजूरी मिळाली असून याही ठिकाणी इमारत नाही़

टॅग्स :Dhuleधुळे