शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गुरू तत्व आहे़़़ विचार आहे़़़ व्यक्ती नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 13:12 IST

जिल्हाधिकारी । जगाचे व्यापक हीत पहाणारी प्रत्येक व्यक्ति मला गुरूतुल्य आहे

सुनील बैसाणे ।धुळे : गुरू त्व आहे, व्यक्ति नाही़ जगाचे व्यापक हीत पहाणारी प्रत्येक व्यक्ती मला गुरूतुल्य आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी संजय यादव यांनी गुरूपौर्णिमेचे महत्व विषद केले़कोणत्याही क्षेत्रात काम करताना व्यापक सामाजिक हीताला प्राधान्य देवून त्या दृष्टीने प्रामाणिकपणे काम करीत समाजाला दिशा देणारी कोणतीही व्यक्ती गुरू असु शकते़ एखाद्या मोठ्या व्यक्तीलाच गुरू मानले पाहिजे असे नाही़ स्वार्थाचा त्याग करुन जनहितासाठी झटणाऱ्या सर्वच व्यक्ती गुरू आहेत़ देश आणि समाजाच्या कल्याणाचा विचार पेरुन तो विचार कृतीत आणणारा एखादा शिपाई किंवा ड्रायव्हरसुध्दा माझ्यासाठी गुरूतुल्य आहे, असे विचार जिल्हाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना मांडले़गुरूपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजनदेखील केले जाते. भारतात अनेक शाळा, कॉलेज आणि संप्रदायांमध्ये गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. धुळे जिल्ह्यातही गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी होते़ या दिवसाचे महत्व असले तरी कोरोनाच्या संसर्गामुळे घरात राहून हा सण साजरा करावा़ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, लक्षणे दिसल्यास त्वरीत तपासणी आणि उपचार करुन घ्यावे, असे आवाहन त्यानी यानिमित्ताने केले आहे़गुरू ठायी ठायी आहे़ चांगली शिकवण देणारा प्रत्येक व्यक्ती गुरू आहे़ अशा परोपकारी व्यक्तींच्या विचारांना आणि तत्वांना वंदन करतो़, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या़१उन्हाळा संपल्यानंतर येणाºया आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला गुरू पौर्णिमा असते़२गुरू हा शब्द संस्कृत भाषेत ‘अंधकार दूर करणारा’ या अर्थाने वापरला जातो़३गुरू समाजाचे अज्ञान दूर करतो़ निर्मितीचा स्त्रोत अनुभवण्याची क्षमता निर्माण करतो़४गुरूपौर्णिमेच्या दिवशी पारंपारिकरित्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते़५योग आणि ध्यान यांचा अभ्यास करण्यासाठी हा दिवस विशेष फायदेशिर मानला जातो़भारतात पूराण काळापासून गुरू-शिष्य परंपरा आहे़ पूर्वीच्या काळी शिष्य गुरूकडे आश्रमात राहत असत़ ज्ञानसंपादनासाठी शिष्याला सुखस्तु जीवनाचा त्याग करावा लागत असे़ ज्ञानप्राप्तीनंतर गुरूला गुरूदक्षिणा देण्यासाठी गुरू पौर्णिमा साजरी केली जात असे़ आता गुरूकुल परंपरा राहिलेली नाही़ गुरूकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे़ गुरू या शब्दाला आता व्यापकता आली आहे़ चांगला विचार देणारी कोणतीही व्यक्ती गुरू असते़

टॅग्स :Dhuleधुळे