शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Gulabrao Patil : "बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून शिवसेना दूर जात होती त्यामुळे आम्ही उठाव केला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 22:49 IST

Gulabrao Patil : "शिवसेनेमुळे आम्ही मोठे झालो अशी टीका आमच्यावर केली जात आहे. मात्र आम्ही आंदोलने करत शिवसेनेलाही वाढवले."

धुळे - उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात हिंदुत्वाशी फारकत घेतली होती, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून शिवसेना दूर जात होती त्यामुळे आम्ही उठाव केला असे प्रतिपादन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते शुक्रवारी सायंकाळी शिंदे गटाने सैनिक कल्याण भवन येथे आयोजित केलेल्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख तुळशिराम गावित, नंदुरबारचे जिल्हाप्रमुख विरसींग वसावे, महानगर प्रमुख सतीश महाले, मनोज मोरे, संजय गुजराथी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, शिवसेनेमुळे आम्ही मोठे झालो अशी टीका आमच्यावर केली जात आहे. मात्र आम्ही आंदोलने करत शिवसेनेलाही वाढवले. महाविकास आघाडी मधून बाहेर पडा असे उद्धव ठाकरे यांना वेळोवेळी सांगितले मात्र त्यांनी ऐकून न घेतल्याने उठाव करावा लागला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

सतीश महाले तयारीला लागा...

गुलाबराव पाटील यांना धुळे शहरातून सतीश महाले निवडणूक लढवतील याचे संकेत दिले. विधानसभा निवडणूकीला अजून दोन वर्षे बाकी आहेत. आजपासून तयारीला लागा असे फर्मान त्यांनी महाले यांना सोडले.

शरद पाटील यांना निवडून आणण्यासाठी घेतली मेहनत 

माजी आमदार शरद पाटील मला विरोध करत आहेत मात्र त्यांना निवडून आणण्यासाठी ५० पेक्षा जास्त सभा घेतल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. धुळे शहरात उमेदवारी देत शिवसेना नेतृत्वाने हिलाल माळी यांची फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले.

समित्यांमध्ये ५० टक्के वाटा द्या - रघुवंशी

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर पक्षात फुट पडली नसती. जे झाले ते विसरा आता कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भावना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली. शासकीय व अशासकीय समित्यांमध्ये शिवसेनेला ५० टक्के वाटा मिळावा अशी मागणी त्यांनी केली.

"८०० फुटाच्या घरात राहतो, ईडीची भीती नाही"

ईडीच्या धाकामुळे बंड केल्याचा आरोप केला जातो. मात्र मी आजही ८०० फुटाच्या घरात राहतो, माझी कोणतीही कंपनी नाही त्यामुळे ईडीची भीती नसल्याचे पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण