शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी गवळी समाज संघटनेचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST

धुळे : ओबीसींचे रद्द केलेले राजकीय आरक्षण पुन्हा लागू करावे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ...

धुळे : ओबीसींचे रद्द केलेले राजकीय आरक्षण पुन्हा लागू करावे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी धुळ्यात धरणे आंदोलन केले.

गवळी समाज संघटनेने क्युमाईन क्लब रस्त्यावर धरणे आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, राज्यात दोन धर्म तसेच २६ पेक्षा अधिक उपजातीतील ६० लाख इतक्या लोकसंख्येने वास्तव्यास असलेला भटक्या जमातीतील मागासवर्गीय गवळी समाज भटक्या जमातीच्या ब प्रवर्गात मोडतो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण मिळाले. सन २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण कायम ठेवत ओबीसींची खानेसुमारीसह ईम्पेरिकल डाटा सादर करण्याचे आदेश सरकारला दिले. मात्र सदर माहिती अद्याप सरकारने सादर केलेली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तूर्त आरक्षण रद्द केले आहे. रद्द केलेले आरक्षण पूर्ववत करण्यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता एकूण पदांच्या ३३ टक्के पदे राखीव ठेवून अन्य पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश द्यावेत, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.

आंदोलनात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हिरामण गवळी, जिल्हाध्यक्ष शिवाजी लंगोटे, उपमहापाैर भगावान गवळी, जिल्हा सचिव कृष्णाभाऊ बाचलकर, शहराध्यक्ष दीपक औशिकर, शहर सचिव व्यंकटेश गवळी, दत्तात्रय कल्याणकर, विठ्ठल उन्हाळे, समीर गवळी, भागवत घुगरे, राजीव जाधव, चिंतामण उदीकर, विजय गवळी, अशोक गवळी, भानुदास गवळी, कोंडिबा काटकर, योगेश गवळी, अमर यमगवळी, भरत गेनाप्पा, भगवान घुगरे, संजय गवळी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.