शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

पोट भरण्याची मारामार, मी टॅक्स कशाला भरू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:39 IST

शासकीय कर्मचारी असो वा अधिकारी आणि व्यापारी यांच्या उत्पन्नाची आकडेवारी ही कागदावर दिसून येते. परिणामी वार्षिक कर हा त्यांच्या ...

शासकीय कर्मचारी असो वा अधिकारी आणि व्यापारी यांच्या उत्पन्नाची आकडेवारी ही कागदावर दिसून येते. परिणामी वार्षिक कर हा त्यांच्या माध्यमातून शासनाकडे जमा केला जातो. पण, सर्वसामान्य नागरिकांसह हातावर पोट भरणाऱ्यांनी काय करायचे, त्यांच्याकडून मिळविणारे उत्पन्न इतकेे कमी असते त्यांना पोट भरण्याची मारामार असताना ते नेमका किती टॅक्स भरतील आणि पोटाला काय करतील अशी स्थिती आहे.

आपण भरता का टॅक्स

- कामगार ऑटो : रिक्षा चालवून सामान्य जनतेला सेवा देण्याचा प्रयत्न आहे. त्यात पेट्रोलचे दर अधिक वाढून गेले आहेत. व्यवसाय कसा करायचा हा प्रश्न आहे.

- चालक : वाहन चालवित असताना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न असतो. कमी पैशात संसाराचा रथ हाकलण्याची चिंता सर्वाधिक आहे.

- भाजीपाला विक्रेता : पावसाची अनियमितता त्यात भाज्यांचे वाढलेले दर लक्षात घेता रोजचा खर्च निघणे कठीण झालेले आहे.

- फेरीवाला : फेरीवाल्यांकडून लागलीच वस्तूंची खरेदी होतच असे नाही, वस्तू विकली गेली तर आमचे घर चालणार आहे.

- सिक्युरिटी गार्ड : मोठ्या मॉलसह उद्योजकांच्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे सेवा देत असतो. मिळणारे उत्पन्न लक्षात घेता टॅक्स भरणार कसा?

- साफसफाई कामगार : नियमित स्वच्छता करत असताना आमचे उत्पन्न देखील तुटपुंजे असते. आमची पाेट भरण्याची मारामार आहे.

- सलून चालक : आमचे हातावर पोट आहे. टॅक्स भरण्यासारखे आमचे उत्पन्न देखील नाही. वाढणाऱ्या महागाईमुळे जीव मेटाकुटीला आला आहे.

- लॉन्ड्री चालक : सर्वच जण कपड्यांना इस्त्री करतात असे नाही. जे करतात त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशांतून आमचा उदरनिर्वाह चालतो.

- घर कामगार करणाऱ्या महिला : घरोघरी जाऊन घरगुती काम करीत असलो तरी सर्वच ठिकाणी आम्हाला काम मिळतेच असे नाही. त्यातही मानधन हे कमीच असते.

- घर महिला : घर चालविणे आणि संसार सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी आमची आहे. आम्हाला उत्पन्न नाही तर टॅक्स भरणार कोणता?

- वार्षिक ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला कर भरावा लागत नाही. छोट्या व्यावसायिकांनी हिशोब मात्र ठेवायला हवा. आपले उत्पन्न किती याचे रेकाॅर्ड असायला हवे. गुंतवणूक करुन आयकर बचत करता येते. प्रत्येकाने पॅन कार्ड काढून घ्यायला हवे. उत्पन्न कमी असेल तर रिटर्न भरण्याची सुद्धा गरज नाही. प्रत्येकाने योग्य ती बचत केली पाहिजे.

श्रीराम देशपांडे, अर्थतज्ज्ञ