शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

काेरोनामुळे पालक गमावलेल्या कुटुंबांसाठी खते, बियाणे मोफत देण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST

धुळे : कोरोनामुळे पालक गमावलेल्या शेतकरी कुटुंबांना खते आणि बियाणे मोफत मिळवून देण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत. ...

धुळे : कोरोनामुळे पालक गमावलेल्या शेतकरी कुटुंबांना खते आणि बियाणे मोफत मिळवून देण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच पालक गमावलेल्या मुलांची शाळेची फी माफ करण्यासाठी संस्थाचालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती सोमवारी झालेल्या कृती दलाच्या बैठकीत देण्यात आली. अनाथ झालेल्या बालकांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी गठीत जिल्हास्तरीय कृती दलाची जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी बैठक झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. एम. मोहन, महानगरपालिकेच्या उपायुक्त शिल्पा नाईक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, शिक्षणाधिकारी मनीष पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी चव्हाण, जिल्हा परीविक्षा अधिकारी एम. एम. बागूल, निरीक्षणगृहाच्या अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अमित दुसाने आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना विषाणूमुळे एकाच कुटुंबातील दोन्ही पालकांचा म्हणजे आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे, अशा पालकांच्या निधनामुळे शून्य ते १८ वर्षे वयोगटातील बालके अनाथ झाली आहेत. या बालकांप्रती प्रत्येकाने संवेदनशील राहणे आवश्यक आहे. या बालकांची भावनिक व वैयक्तिक हानी भरून निघणे अशक्य आहे. मात्र, या बालकांचे शिक्षण व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईपर्यंतचे आयुष्य सन्मानाने जगता यावे म्हणून ही मदत आर्थिकदृष्ट्या पूरक ठरणार आहे. त्यामुळे अशा पात्र बालकांचा शोध घेऊन त्यांना ही मदत मिळवून द्यावी. तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या प्रस्तावांची पूर्तता करून संबंधितांना लाभ मिळवून द्यावेत. तालुकास्तरावरील कृती दलाच्या बैठका नियमितपणे घेवून पालक गमावलेल्या मुलांशी संपर्क साधावा. तसेच अशा कुटुंबाना मदत मिळवून द्यावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिल्या.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी सांगितले, पालक गमावलेल्या कुटुंबांसाठी बि-बियाणे, रासायनिक खते मोफत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिक्षणाधिकारी पवार यांनी सांगितले, की कृती दलाच्या आवाहनानंतर काही शाळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले जात आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी भदाणे यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या १५ असून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच या मुलांच्या व कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.