शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

शासनाच्या शैक्षणिक धोरणाविरोधात धुळ्यात शिक्षक संघटनांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:20 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी : प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

ठळक मुद्दे सन २००४-२००५ पासूनचे थकीत वेतनेतर अनुदान पूर्वीच्या नियमाप्रमाणे सर्व शाळांना द्यावे. सन २०१३-२०१४ पासूनचे वेतनेतर अनुदानही ५ टक्के ऐवजी १२ टक्क्यांनी द्यावे. शिक्षकेत्तर सेवकांचा नवीन आकृतीबंध लागू करावा. अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ करावे. त्यांचे पगार आॅनलाइन करावेत. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील गेल्या अनेक वर्षांपासून बंद केलेली भरती पूर्वीप्रमाणेच शिक्षण संस्थांच्या मार्फत सुरू करावी. ४ आॅक्टोबर २०१७ च्या शासन निर्णय विरोधात अतिरीक्त शिक्षकांचे जि.प. शाळांमध्ये समायोजन करावे. कला, क्रीडा शिक्षकांच्या पूर्वीप्रमाणेच नियुक्त्या कराव्यात. प्राथमिक शाळेमध्ये लिपीक व सेवकांची पदे मान्य करावीत. शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांना शाळाबाह्य कामे देवू नयेत.

धुळे :  गेल्या १७ वर्षात शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या सोडविण्याऐवजी विद्यमान शासनकर्ते त्यात आणखी वाढ करीत असून शिक्षकांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. शासनाच्या या शैक्षणिक धोरणाविरोधात विविध शैक्षणिक संघटनांतर्फे मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यानंतर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली . अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा, शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.), राय शिक्षण संस्था महामंडळ, मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक संघटना, आयटीआय निर्देशक संघटना, आश्रमशाळा संघटना, वसतीगृह संघटना व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या विद्यमाने हा मोर्चा काढण्यात आला.  शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. पुढे हा मोर्चा जुन्या आग्रारोडवरून कराचीवाला खुंटमार्गे महापालिका, झाशीचा राणीचा पुतळा, जुने प्रशासकीय संकुलाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी माजी आमदार जे. यू. ठाकरे, संजय पवार, संदीप बेडसे, रामकृष्ण पाटील, आर. व्ही. पाटील, डी. के. पवार, दिलीप सोनवणे, सुनील पवार, डॉ. अरूण साळुंखे, हेमंत ठाकरे, वाल्मीक दामोदर, विजय बोरसे, जे. आर. पवार, एस. आर. पाटील, आर. डी. शिसोदे, बी. डी. भदोरीया आदी उपस्थित होते. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राष्टÑीय व राज्य शासनाने शिक्षणावर सकल घरेलू उत्पादनाच्या कमीत कमी ८ टक्के खर्च केला पाहिजे. शिक्षणाचे व्यापारीकरण करणारे शासन विधेयक त्वरित रद्द करावे, वाडीवस्ती व दुर्गम भागातील दहा विद्यार्थी पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.