शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पीएम स्वनिधीला बॅकांकडून खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST

मनपाकडून पीएम स्वनिधी योजनेचा लाभ फेरीवाल्यांना मिळवून देण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी काही महिन्यापूर्वी शहरातील फेरीवाल्याचे सर्वेक्षण ...

मनपाकडून पीएम स्वनिधी योजनेचा लाभ फेरीवाल्यांना मिळवून देण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी काही महिन्यापूर्वी शहरातील फेरीवाल्याचे सर्वेक्षण करून नोंदणी करण्यात आली आहे. त्यानुसार टप्याटप्यात या योजनेचा लाभ फेरीवाल्यांना दिला जात आहे. मनपाकडून पीएम स्वनिधी योजनेच्या लाभासाठी बॅकेत प्रस्ताव पाठविण्यात येतात. लाभार्थांची संपूर्ण माहिती घेऊन बॅकेव्दारे अर्थसाहाय्य केले जाते. मात्र काही बॅकांकडून पीएम स्वनिधी योजनेचा लाभ दिला जात नसल्याने तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही योजना यशस्वी करण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे.

कोरोना महामारीच्या काळात तीन महिने व्यवसाय ठप्प हाेते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. व्यवसाय करण्यासाठी फेरीवाल्यांना अर्थसाहाय्य होण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातुन पीएम स्वनिधी योजना राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप या योजनेची माहिती फेरीवाल्यांना मिळालेली नाही. त्यामुळे माहिती घेऊन लवकरच बॅकेकडे प्रस्ताव पाठवणार आहे. बॅकेकडून सहकार्याची अपेक्षा आहे.

-पंकज माळी, भाजीविक्रेता

पीएम स्वनिधी योजनेची माहिती मिळाल्यानंतर ऑनलाईन प्रस्ताव बॅकेकडे पाठविला आहे. यासाठी मात्र चार ते पाच महिन्यानंतरही बॅकेकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. दोन ते तीन वेळा बॅकेत फेऱ्या मारून झाल्या. प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. लाभार्थांची यादी बॅकेत लावली जाईल. त्यानंतर विचारणा करावी, अशी उत्तरे बॅकेकडून दिली जातात.

-उज्वल ठाकूर, व्यावसायिक

बॅकेकडून सहकार्य केले जाते.

पीएम स्वनिधी योजनेची व्यवसायिकांना बॅकेकडून वेळोवेळी माहिती दिली जाते. आतापर्यत प्रस्ताव दाखल केलेल्या लाभार्थांना बॅकेच्या माध्यमातून धनादेश देण्यात आलेला आहे. लाभार्थांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणी येत असतील तर त्यांना बॅकेच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधावा

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तीन ते चार महिने उद्योग व्यवसाय बंद असल्याने बेरोजगार व्हावे लागले. त्यामुळे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करावा लागला. केंद्र सरकारकडून दहा हजार रुपयांंपर्यत अर्थसाहाय्य दिले जाणार असल्याने बॅकेकडे प्रस्ताव पाठविला होता. तीन ते चार महिने पाठपुरावा केल्यानंतर योजनेचा लाभ मिळाला. केंद्राच्या योजनेचा लाभार्थांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून दखल घेण्याची गरज आहे.

-श्रीधर महाजन, फेरीवाला