शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरला चार फे-यांंत होणार मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST

१५ रोजी एकूण ७६़३६ टक्के मतदान झाले़ एकूण मतदान ५२ हजार १५४ होते, त्यापैकी ३९ हजार ८२३ मतदारांनी मतदानाचा ...

१५ रोजी एकूण ७६़३६ टक्के मतदान झाले़ एकूण मतदान ५२ हजार १५४ होते, त्यापैकी ३९ हजार ८२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ बाळदे, भटाणे, बोरगाव, भोरखेडा व बाभुळदे अशा पाच ग्रामपंचायतींमध्ये केवळ एका जागेसाठी निवडणूक घेण्यात आली़

मात्र, या गावांमध्ये फारसा उत्साह मतदारांमध्ये दिसून आला नाही़ बलकुवे, कुवे, चाकडू, होळ, उप्परपिंड, दहिवद, नटवाडे, जामन्यापाडा, गरताड, भाटपुरा, साकवद, जुने भामपूर, मांडळ, वरूळ, विखरण, शिंगावे, शेमल्या याठिकाणी आमनेसामने लढती असल्यामुळे मतदारांचा उत्साह दिसून आला़

बिनविरोध ग्रामपंचायत

माघारीअंती घोडसगाव, पिंपळे, वाठोडा, असली, हिंगोणीपाडा व भावेर अशा सहा ग्रामपंचायतींसह १११ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत़

३ जागा रिक्त :

बोरगाव येथे ७ जागांपैकी ४ बिनविरोध, २ रिक्त तर १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात होते़ बाभुळदे येथे ७ जागांपैकी ५ बिनविरोध, १ रिक्त तर १ जागेसाठी २ जण रिंगणात होते़ बोरगाव व बाभुळदे येथील रिक्त असलेल्या ३ जागेकरिता केव्हा निवडणूक होते, याकडे लक्ष लागले आहे़

४ फे-यांत मतमोजणी

१८ रोजी सकाळी ९ वाजेपासून येथील तहसील कार्यालयात मतमोजणी केली जाणार आहे़ ७ टेबलांवर एकाच वेळी एका गावाचीच मतमोजणी केली जाणार आहे, जेणेकरून मतमोजणी ठिकाणी अधिक गर्दी होणार नाही़ पहिल्या फेरीत शिंगावे, दहिवद, चाकडू, कुवे, जातोडा, साकवद, दुस-या फेरीत नटवाडे, जामन्यापाडा, जवखेडा, शेमल्या, बलकुवे, सावळदे, मांडळ, तिस-या फेरीत जुने भामपूर, उप्परपिंड, कळमसरे, भाटपुरा, होळ, हिंगोणी बु़, वरूळ तर शेवटच्या अंतिम फेरीत बाळदे, बोरगाव, गरताड, बाभुळदे, भटाणे, टेकवाडे, भोरखेडा या गावांची मतमोजणी केली जाणार आहे़ एकूण चार फे-यांत मतमोजणी केली जाणार आहे़

सरपंच आरक्षणाकडे लक्ष

युती सरकारच्या काळात सरपंचपद थेट जनतेतून निवडून दिले जात होते़ आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंचपद निवडले जाणार आहे़ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या़ निवडणूक आयोगाने नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्यात़ ग्रामपंचायतींचे मतदान १५ रोजी झाले़ कदाचित २२ जानेवारीनंतर सरपंच आरक्षण सोडत होणार आहे़ या सोडतीकडे आता गावपुढा-यांचे लक्ष लागून राहिले आहे़