शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

जि.प., मनपा मधील ठेकेदारी व राजकीय संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 1:11 PM

या आंदोलनातून सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांमध्ये अंर्तगत वाद सुरु

राजेंद्र शर्माजिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभेत, तसेच स्थायी समिती व बांधकाम समितीच्या सभेत आयत्यावेळेला आर्थिक धोरणात्मक निर्णय घेतले जात नाही. पण सत्ताधारी भाजपने या सभांमध्ये आयत्यावेळी आर्थिक धोरणात्मक निर्णय घेतल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांनी शासनाकडे अपील दाखल केले होते. तेव्हा अपिलाची चौकशी पूर्ण होत नाही. तोपर्यंत सभेत आयत्यावेळी मंजूर केलेली कामे सुरु करु नये, असे आदेश ग्रामविकास मंत्र्यांनी दिले होते. परंतू तरीसुद्धा ही कामे सुरु होती. तेव्हा पोपटराव सोनवणे यांनी पुन्हा शासनाकडे सीईओ यांची खातेनिहाय चौकशी लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता सीईओ यांनी ही सर्व कामे थांबविण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले. दरम्यान, जिल्हा परिषदेत कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा कामांची माहिती देऊन जि.प.अध्यक्ष तुषार रंधे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच सोनवणे यांच्याविरोधात अबु्र नुकसानीचा दावा आणि सभागृहातील व सभागृहाबाहेरचे त्यांनी केलेले गैरवर्तन लक्षात घेता त्यांनाच अपात्र करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले. हा वाद सुरु असतांनाच दुसरीकडे जिल्हा परिषदेतील केवळ काल्पनिक कामे करुन निधी उकळला जात असल्याचा आरोप करीत जि.प.च्या सदस्या सुनिता सोनवणे व त्यांचे पती शानाभाऊ सोनवणे यांनी चौकशीची मागणी केली. तेव्हा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले. या दोन्ही प्रकरणामुळे ठेकेदारीच्या अवतीभवतीच जिल्हा परिषदेचे राजकारण फिरत असल्याचे स्पष्ट होते. हे प्रकरण सुरु असतांना जि.प.च्या बांधकाम व अन्य विभागातील काही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर देखील पाठविण्यात आले होते. त्यापैकी काही अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकारात आपला सहभाग नको म्हणून स्वत:हून आपली बदलीही करवून घेतली होती. त्यामुळे सुद्धा या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असली तरी आज जे भाजपतर्फे सत्तेत आहे ते काही काळापूर्वी काँग्रेस सत्तेत असतांनाही सत्ता भोगीतच होते. जि.प. निवडणूकपूर्वी ते भाजपमध्ये जाऊन निवडून आले. त्यामुळे ते आजही सत्तेतच आहे. तर आज जे विरोधात आहे. ते काँग्रेसमध्ये असतांना याच लोकांचे मित्र होते. पण आता एकमेकांच्या आमने-सामने उभे आहेत. त्यांना एकमेकांविरोधात बोलतांना पाहून साहजिकच आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. तेव्हा या प्रकरणाला राजकारणाचाही स्पर्श असल्याचे जाणवते. पण जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्याची चौकशी लवकर आणि प्रामाणिकपणे झाली पाहिजे, तेव्हा यात कोण किती गुरफटलेला आणि कोण किती धुतल्या तांदळाचा आहे, हे चौकशीअंती स्पष्ट होईल. तसेच आधीच वाघ बापू भ्रष्टाचार प्रकरणाने बदनाम झालेल्या धुळे जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा नवीन डाग लागू नये, अशी रास्त अपेक्षा धुळेकरांची आहे. मनपातील ठेकेदारी- जिल्हा परिषदेपाठोपाठ धुळे महानगरपालिकेतही ठेकेदारांची बिले काढल्यासंदर्भात सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवक शितल नवले यांनी महापालिकेबाहेर धरणे आंदोलन केले. मनपा प्रशासनाने कोरोना काळात २००८ सालातील पावणेतीन कोटीची ठेकेदारांची बिले काढली. मात्र जनतेच्या हिताची सार्वजनिक शौचालय दुरुस्ती, पाणी आणि स्वच्छता या मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी पैसा देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. नवले यांनी सत्ताधाºयांना घरचाच आहेर दिला. मनपातील ठेकेदारी ही थेट अधिकाºयापासून नेत्यापर्यंत सर्वांकडून पोसली जाते. मनपातील काही अधिकारी आणि नगरसेवक हे नातेवाईकांच्या नावाने कामाचे ठेके घेतात हे सर्वांना माहिती आहे. जिल्हा परिषदेप्रमाणेच याठिकाणीही ठेकेदारांच्या अवतीभवतीच मनपाचे राजकारण फिरत असते. या आंदोलनामुळे मनपाकडे निधी असून सुद्धा शहरातील रस्ते आणि विकास कामे बंद का आहेत, हा नवले यांनी उपस्थित केलेला मुद्दा योग्य आहे. शहरात पावसामुळे कॉलनी परिसरातील रस्त्यांची पार दैना झाली आहे. नागरिकांना रस्त्यावरुन पायी चालणे देखील कठीण झाले आहे. त्यांची दुरुस्ती आवश्यक असतांना ते काम केले जात नाही. अनेक विकास कामे मंजूर आहे, पण निधीअभावी ते कामे होत नाही, असे सांगितले जाते. मग ती कामे या निधीतून करता आली असती, नवलेंचे हे म्हणणे रास्त वाटते. पण सत्तेत असतांना आपले म्हणणे ते आपल्या पदाधिकारी व अधिकाºयांना पटवून देऊ शकले असते, मग त्यात नवले कुठे कमी पडले की त्यांचे त्यांनी ऐकून घेतले नाही म्हणून त्यांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला, हाही प्रश्न आहे. एकूणच या आंदोलनातून सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांमध्ये अंर्तगत वाद सुरु असल्याचे दिसते.

टॅग्स :Dhuleधुळे