शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘बारीपाडा’ आत्मनिर्भर गावाचे एक उत्तम उदाहरण - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:07 IST

साक्री तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील आदर्श गाव बारीपाडा येथे गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली. गावातील पर्यावरण अभ्यास ...

साक्री तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील आदर्श गाव बारीपाडा येथे गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली. गावातील पर्यावरण अभ्यास केंद्र येथे बारीपाडा ग्रामविकास समिती आणि देवगिरी कल्याण आश्रमतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर बारीपाडा सरपंच सुनीता मधू बागूल, ग्रामविकास समितीचे अध्यक्ष चैत्राम पवार, देवगिरी कल्याण आश्रमचे विजय पवार, उपाध्यक्ष मोतीराम पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते.

सामूहिक वनहक्क अधिकार पत्राचे वाटप - कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आठ ग्रामपंचायतीच्या लोकांना सामूहिक वनहक्क अधिकार पत्राचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक करतांना चैत्राम पवार यांनी बारीपाडा गावात ग्रामस्थांसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने जंगल, जल, जमीन यात विविध प्रकारचे प्रयोग करून गावाचा विकास कसा घडवून आणला याची माहिती दिली.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले की, मी जीवनात खूप फिरलो आहे. पण बारीपाडा गावात आल्यानंतर नवीन अनुभव आला. या गावाने सामूहिक प्रयत्न केले तर जंगल, जल आणि माणसाचे जीवन कशापद्धतीने फुलते आणि गावातील प्रत्येक नागरिक कसा आत्मनिर्भर बनतो याचे एक सुंदर उदाहरण सर्वांसमोर उभे केले आहे.

विरोध हा मानवी स्वभावच - चैत्राम पवार यांनी सांगितले की, संपूर्ण गाव एकीकडे आणि १० ते १२ कुटुंबे विरोधात आतहे. त्याला घाबरू नये कारण विरोध हा मानवी स्वभाव आहे. संसदेमध्येही विरोधक असतात. पण त्याला न घाबरता काम केले पाहीजे. तसे केले तर बारीपाडासारख्या आदर्श गावाची निर्मिती होते. बारीपाडा येथे आदिवासी विकास, कृषी, महसूल आणि वनविभागाच्या सहकार्याने ग्रामस्थांनी घडविलेला बदल अनुकरणीय आहे. गावाच्या विकासाचा हा रथ पुढे नऊन अन्य गावांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे. तसेच या गावात केलेल्या कामाचा प्रचार व प्रसार राज्य आणि केंद्रस्तरावर केला पाहिजे, यासाठी आपण राज्य शासन आणि केंद्र शासनाला सांगणार. असे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात त्याप्रमाणे बारीपाडासारखी अनेक गावे देशात निर्माण होतील आणि त्यातूनच आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल.

महात्मा गांधी एक आदर्श- जीवनात एका सर्वसामान्य व्यक्तीने निश्चय केला तर काय होऊ शकते, याच्यासाठी महात्मा गांधी एक उत्तम उदाहरण आहेत.

कार्यक्रमास आमदार मंजुळा गावीत, जिल्हा परिषद अध्यक्ष डाॅ. तुषार रंधे, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

बारीपाडा संवर्धित वनास भेट - राज्यपाल कोश्यारी यांनी बारीपाडा येथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीने संवर्धित केलेल्या वनाची पाहणी केली.