शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बँक विलीनीकरणाचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:40 IST

केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना जाहीर केल्यानंतर ठरावीक महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात. त्यामुळे शेतकरी ...

केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना जाहीर केल्यानंतर ठरावीक महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात. त्यामुळे शेतकरी निश्चिंत होते. परंतु साक्री येथील पूर्वीची देना बँके व आताची बँक ऑफ बडोदा यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे खाते आहेत त्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर या योजनेचे दोन हजार रुपये प्राप्त झाले आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांचे खाते देना बँकेत होते त्यांना मात्र अद्यापपर्यंत पैसे मिळाले नाहीत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी बँकेकडे विचारणा केली असता पूर्वीचे खाते नंबर बदलल्याने हा घोळ झाला आहे. बँकेने सांगितल्यानुसार शेतकरी तहसीलदार यांच्याकडे गेले असता तहसीलदारांनी कृषी खात्याकडे बोट दाखवले आहे. तेथून शेतकरी कृषी खात्यामध्ये गेले असता ही जबाबदारी आमची नसून शासनाच्या आदेशानुसार ही जबाबदारी महसूल खात्याची असल्याचे सांगितले. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक यात शेतकऱ्यांचा कोणताही दोष नसताना केवळ प्रशासनाच्या गोंधळामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे व शेतकऱ्यांना हक्काच्या पैशापासून वंचित व्हावे लागले आहे. ही परिस्थिती केवळ साक्रीपुरतीच मर्यादित नसून संपूर्ण राज्यात ज्या ज्या शेतकऱ्यांचे देना बँकेत खाते होते त्यांनाही ही अडचण निर्माण झाली आहे.

यासंदर्भात साक्रीचे तहसीलदार प्रवीण चव्हाण के यांच्याशी संपर्क साधला असता खाते नंबर बदलण्यासाठी महसूल खात्यामार्फत ही प्रक्रिया करण्यात येत असली तरी या योजनेत चांगले काम महसूल यंत्रणेने केले. परंतु पुरस्कार मात्र कृषी खात्याला मिळाला. यामुळे सर्व तलाठी यांनी या योजनेच्या कामावर बहिष्कार घातल्याने हा तिढा अधिकच वाढला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ज्या कृषी खात्याची ही जबाबदारी असल्याचे म्हटले जात होते त्या संदर्भात तालुका कृषी अधिकारी सी. के. ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, ही प्रक्रिया पूर्णपणे महसूल यंत्रणा हाताळत असल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कोणाकडे जावे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पंतप्रधान किसान योजना ही केंद्र सरकारची योजना असल्याने यासंदर्भात नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. हीना गावीत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणार असून, ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.