शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
5
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
6
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
7
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
8
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
9
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
10
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
11
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
12
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
13
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
14
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
15
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
16
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
17
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
18
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
19
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
20
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...

बँक विलीनीकरणाचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:40 IST

केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना जाहीर केल्यानंतर ठरावीक महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात. त्यामुळे शेतकरी ...

केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना जाहीर केल्यानंतर ठरावीक महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात. त्यामुळे शेतकरी निश्चिंत होते. परंतु साक्री येथील पूर्वीची देना बँके व आताची बँक ऑफ बडोदा यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे खाते आहेत त्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर या योजनेचे दोन हजार रुपये प्राप्त झाले आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांचे खाते देना बँकेत होते त्यांना मात्र अद्यापपर्यंत पैसे मिळाले नाहीत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी बँकेकडे विचारणा केली असता पूर्वीचे खाते नंबर बदलल्याने हा घोळ झाला आहे. बँकेने सांगितल्यानुसार शेतकरी तहसीलदार यांच्याकडे गेले असता तहसीलदारांनी कृषी खात्याकडे बोट दाखवले आहे. तेथून शेतकरी कृषी खात्यामध्ये गेले असता ही जबाबदारी आमची नसून शासनाच्या आदेशानुसार ही जबाबदारी महसूल खात्याची असल्याचे सांगितले. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक यात शेतकऱ्यांचा कोणताही दोष नसताना केवळ प्रशासनाच्या गोंधळामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे व शेतकऱ्यांना हक्काच्या पैशापासून वंचित व्हावे लागले आहे. ही परिस्थिती केवळ साक्रीपुरतीच मर्यादित नसून संपूर्ण राज्यात ज्या ज्या शेतकऱ्यांचे देना बँकेत खाते होते त्यांनाही ही अडचण निर्माण झाली आहे.

यासंदर्भात साक्रीचे तहसीलदार प्रवीण चव्हाण के यांच्याशी संपर्क साधला असता खाते नंबर बदलण्यासाठी महसूल खात्यामार्फत ही प्रक्रिया करण्यात येत असली तरी या योजनेत चांगले काम महसूल यंत्रणेने केले. परंतु पुरस्कार मात्र कृषी खात्याला मिळाला. यामुळे सर्व तलाठी यांनी या योजनेच्या कामावर बहिष्कार घातल्याने हा तिढा अधिकच वाढला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ज्या कृषी खात्याची ही जबाबदारी असल्याचे म्हटले जात होते त्या संदर्भात तालुका कृषी अधिकारी सी. के. ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, ही प्रक्रिया पूर्णपणे महसूल यंत्रणा हाताळत असल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कोणाकडे जावे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पंतप्रधान किसान योजना ही केंद्र सरकारची योजना असल्याने यासंदर्भात नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. हीना गावीत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणार असून, ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.