शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

जातीचा उंबरठा ओलांडणाऱ्या ७५ जोडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:31 IST

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात २०१८-१९ या वर्षभरात १२० आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांनी पन्नास हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी ...

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात २०१८-१९ या वर्षभरात १२० आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांनी पन्नास हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी प्रस्ताव पाठविला होता. त्या सर्वांना ५० हजार रुपये असे एकूण सात लाखांचे अनुदान देण्यात आले होते. यंदाच्या आर्थिक वर्ष २०१९-२० या वर्षात ७५ लाभार्थ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. मात्र कोरोना संसर्ग काळात शासनाकडून अनुदान प्राप्त न झाल्याने लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे.

मार्चनंतर वंचितांना लाभ

यंदा कोरोना संसर्ग काळात शासनाकडून निधी मिळालेला नाही. त्यामुळे ७५ लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे. मार्चपर्यंत शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यावर उर्वरित लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे.

शासकीय योजनेतून मिळते मदत

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासकीय कन्यादान योजनेतून अर्थसाहाय्य दिले जाते. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजेएनटी आदी मागास प्रवर्गातील एखाद्या व्यक्तीचा इतर मागासवर्ग किंवा खुल्या प्रवर्गातील व्यक्तीसोबत विवाह झाल्यास असे जोडपे शासकीय मदतीला पात्र ठरतात. शिवाय एका मागास प्रवर्गातील व्यक्तीने दुसऱ्या मागास प्रवर्गातील व्यक्तीसोबत विवाह केला तरी ते जोडपे मदतीसाठी पात्र ठरतात.

यांना मिळते मदत

या योजनेत प्रत्येक जोडप्याला ५० हजार रुपयांचे अनुदान धनादेशाद्वारे दिले जाते. पूर्वी काही अनुदान रोख स्वरूपात तर काही वस्तू स्वरूपात दिले जात होते. त्या वेळी अनुदानाची रक्कमही केवळ १५ हजार रुपयांपर्यंत मर्यादित होती. २०१० पासून अनुदानाची रक्कम ५० हजार रुपये करण्यात आली आहे. सुरुवातीपासून या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दिला जात आहे.

अशी मिळते मदत

१ फेब्रुवारी २०१० पूर्वी आंतरजातीय विवाह झाला असल्यास १५ हजार रुपये आणि त्यानंतर विवाह झाला असल्यास ५० हजार रुपयांचे अनुदान मिळते. त्यामुळे आंतरजातीय विवाह केलेल्या लाभार्थ्यांना दिलासा मिळतो.

आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. गेल्या वर्षी आलेल्या सर्व प्रस्तावांना मान्यता देण्यात आली होती. मार्चनंतर काहींना अनुदान देण्यात येईल.

-संजय बागुल,

समाज कल्याण अधिकारी