शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायाला २५ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 12:48 IST

लॉकडाऊन : अनेक उद्योग, व्यापार बंद पडण्याचा मार्गावर, राज्यशासनाकडून उद्योगांना उभारी देण्याची गरज

ठळक मुद्देअन्यथा पुन्हा लॉकडाऊनकाय सुरू?काय बंद?महागाई वाढली का?नागरिकांनी खबरदारी घ्यावी

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अडीच महिन्यासाठी लॉकडाऊन घोषीत करण्यात आले होते़ या अडीच महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील उद्योग, व्यापारावर मोठा परिणाम झाला असून सुमारे २५ कोटी रूपयांचा फटका उद्योजकांना सहन करावा लागला आहे़जिल्ह्यात नरडाणा व अवधान या दोन ठिकाणी औद्यागिक वसाहती आहेत़ त्यात २८० उद्योग आहेत. या उद्योगाचा विस्तार देशभरात आहे़ राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्रासह खान्देशातील हजारो कामगारांची उदरनिर्वाह या उद्योगावर अवलंबून आहे़ २४ मार्च रोजी शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने अनेकांना उद्योग, व्यापार तसेच लहान मोठे व्यवसाय तब्बल अडीच ते तीन महिने बंद होते. त्यामुळे याठिकाणी कामासाठी आलेल्या जिल्ह्यासह परराज्यातील कामगारांना आपल्या मायदेशी परत जावे लागले़ त्यामुळे ३० ते ३५ हजार कामगारांवर बेरोजगारी कुºहाड पडली आहे़ तीन महिन्यापासून ठप्प उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी थकीत विजबील, कामगारांचा पगार, जीएसटीची रक्कम, जागेचे भाडे, मशीन दुरूस्तीचा खर्च, बॅका व वित्तीय संस्थाकडून घेतलेले कर्ज अशा संकटात व्यापारी, उद्योजक सापडला आहे़े बॅकांचे हप्ते भरण्यासाठी ३ महिन्याची सवलत जरी दिलेली असली तरी मात्र थकीत तीन हप्त्याची रक्कम उद्योजकांना भरावीच लागणार आहे़ हा सर्व आर्थिक फटका भरून काढण्यासाठी व उद्योजक, व्यापाराला उभारी आणण्यासाठी शासनाकडून मदतीची अपेक्षा उद्योजकांकडून होत आहे़नागरिकांनी खबरदारी घ्यावीअडीच महिन्यापासून बंद असलेले उद्योग व व्यापार गेल्या जुन महिन्यापासून सुरू झाला आहे़ तो पूर्वपदावर आणण्यासाठी उद्योजकांची धडपड सुरु असताना. दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी गतीने वाढत आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यात १ हजार १४६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़ अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे़अन्यथा पुन्हा लॉकडाऊनअनलॉकच्या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून सम-विषम तारखेनुसार व्यवसाय नियोजन करून देण्यात आले आहे़ मात्र नागरिक हे बाजारात विनाकारण गर्दी करतांना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधीतापासून संसर्ग होण्याची भीती अधिक आहे. ते टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घरात बाहेर निघणे बंद केले पाहिजे. अन्यथा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर शहरासह जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन घोषीत करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जावू शकतो़तसे झालेतर पूर्वपदावर येत असलेल्या उद्योग, व्यापार तसेच लहान मोठ्या व्यवसायांवर परिणाम होऊ शकतो़ तसेच अनेकांचा रोजगार पुन्हा धोक्यात येवून जिल्ह्यास बेकारी वाढून गुन्हेगारी वाढू शकते़काय सुरू?हॉटेल खानावळीतून घरपोच सेवेला परवानगी, तीनचाकी व चारचाकी वाहनांकरीता एक अधिक दोन व्यक्ती व दुचाकी वाहनांकरीता एका व्यक्तीला सेवेकरीताच परवानगी, मॉल्स व व्यापारी संकुल व्यतिरिक्त जिवनावश्यक वस्तू आणि सेवांची सर्व दुकाने, सर्व सलून, स्पा सेंटर, ब्यूटी पार्लर, बार्बर दुकाने सुरू राहतीलकाय बंद?सर्व प्रकारचे हॉटेल, बार, सिनेमागृहे, मॉल, व्यापारी संकुल, क्रीडा संकुले, स्वीमिंग पूल, सभागृहे, व्यायामशाळा, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संकुल, प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवण्या, रेस्टॉरंट बार, सामाजिक, राजकीय व इतर सेवा बंद राहतीलमहागाई वाढली का?भाजीपाला : अडीच महिन्याचा लॉकडाऊननंतर व्यवहार सुरळीत झाल्याने अनेकांनी अडीच महिन्याची भर काढण्यासाठी जीवनावश्यक वस्तूसह अन्य वस्तूचे भाव वाढवून दिले आहेत़ त्यात भाजीपाला, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पेट्रॉल, डिझेल तसेच भाव वाढीची मागणी देखील केली जात आहे़किराणा : अनलॉकच्या पहिल्या मुगदाळ, तेल, खोबरे, सोयाबीन तसेच विविध खाद्य पदार्थाचे भाव वाढले आहे़ लॉकडाऊनच्या कालावधीत वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेकांनी साठवलेला मालाची किमंती वाढविल्या आहेत़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोरोना संकटाच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे