शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणारे मतचोर कुठे पळाले?; उद्धव ठाकरेंचा तुफानी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 17:43 IST

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या.

- बालाजी बिराजदारलोहारा (धाराशिव): 'सातबारा कोरा करतो' असे निवडणुकीपूर्वी आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने आता शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. हे सरकार केवळ 'मतचोर' आणि 'दगाबाज' आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा पाटोदा चौरस्ता येथे जोरदार हल्लाबोल केला.

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी उपमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'टोमणे मारण्याशिवाय दुसरं काय येतं' या टीकेला रोखठोक उत्तर दिले. "शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, हे टोमणा आहे का? शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या, हे टोमणा आहे का? हा टोमणा नाही, पण टोला मात्र नक्कीच मारणार आहे," असे सांगत ठाकरे यांनी आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार केला.

अजित पवारांना थेट आव्हानउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वी 'तुमचा सातबारा कोरा केल्याशिवाय पवारांचा अवलाद सांगणार नाही' असे केलेले विधान उद्धव ठाकरे यांनी यावेळी आठवण करून दिली. "निवडणूक आली की लोकांच्या कोपऱ्याला गूळ लावतात. आता सत्तेत आल्यावर कर्जाचे पैसे भरा म्हणतात. मग आता कोणाची अवलाद लावणार?" असा थेट सवाल त्यांनी अजित पवारांना केला.

'कागदावर मदत, खिशात एक पैसा नाही!'उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले की, सरकारने जाहीर केलेली मदत केवळ कागदावर आहे, एकाही शेतकऱ्याच्या खिशात एक पैसाही गेलेला नाही. शेतकऱ्यांसाठी केलेली सर्व आश्वासने फसवी ठरली आहेत. ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले: "या दगाबाज सरकारला दगा दिलाच पाहिजे. जोपर्यंत आमचे कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत आम्ही महायुतीला मतदान करणार नाही, असे यांना ठणकावून सांगा."

याप्रसंगी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार दिनकर माने, शामलताई वडणे, जिल्हा प्रवक्ते जगदिश पाटील, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्यासह शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना लाकडी नांगर भेट देण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Where did promise-breaking vote thieves flee?: Uddhav Thackeray's furious attack

Web Summary : Uddhav Thackeray slammed the government for neglecting farmers after promising loan waivers. He accused them of being 'vote thieves' and betrayers, demanding immediate relief and questioning unfulfilled promises made by Ajit Pawar regarding debt relief for farmers. He urged farmers to reject the current government if their debts aren't forgiven.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेdharashivधाराशिवRainपाऊसFarmerशेतकरी