शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
5
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
6
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
7
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
8
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
9
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
10
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
11
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
12
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
13
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
14
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
15
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
16
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
17
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायासाठी पाेलीस मुख्यालयासमाेर उपाेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST

कळंब : तक्रारी अर्जाची दखल न घेणाऱ्या पाेलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी कळंब तालुक्यातील डिकसळ ...

कळंब : तक्रारी अर्जाची दखल न घेणाऱ्या पाेलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी कळंब तालुक्यातील डिकसळ येथील एका कुटुंबाने शनिवारी पाेलीस मुख्यालयासमाेर उपाेषण सुरू केले आहे.

वारंवार तक्रारी अर्ज करूनही पोलीस यंत्रणा दखल तर घेतच नाही, परंतु आपल्यालाच पोलिसांकडून समजपत्र दिले जात आहे. आपल्या तक्रारीची दखल घेऊन संबंधितावर गुन्हा नोंद करावा व कार्यवाहीस टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, या मागणीसाठी कळंब तालुक्यातील डिकसळ येथील शेतकरी सचिन वाघमारे हे उस्मानाबाद पोलीस मुख्यालयासमोर कुटुंबासह उपोषणास बसले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने २००५-०६ मध्ये डिकसळ येथील शेतकरी सचिन वाघमारे यांच्या शेतातून रस्त्याचे काम मंजूर केले हाेते. या कामास वाघमारे यांनी हरकत घेतली. ‘‘माझ्या मालकीच्या शेतातून रस्त्याचे काम केले जाऊ नये’’, असे बांधकाम विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांना सांगितले हाेते, असे असतानाही त्यांनी हे काम रेटून नेले. ही बाब वाघमारे यांनी शासनाच्या विविध विभागासह पाेलीस यंत्रणेच्याही निदर्शनास आणून दिली हाेती. तसा तक्रारी अर्जही दाखल केला हाेता. परंतु, त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही. उलट वाघमारे यांनाच समजपत्र पाठविण्यात आले. वारंवार अर्ज, विनंती करूनही संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याची भूमिका पाेलीस अधिकाऱ्यांनी घेतली, असा आराेप करीत वाघमारे यांनी सहकुटुंब पाेलीस अधीक्षक कार्यालयासमाेर उपाेषण सुरू केले आहे. तक्रारी अर्जाची दखल न घेतलेल्या पाेलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

140821\img-20210814-wa0089.jpg

तक्रारीची दखल न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाहीसाठी कळंब तालुक्यातील डिकसळ येथील सटवा वाघमारे हे कुटुंबासह उस्मानाबाद येथे उपोषणास बसले आहेत.