शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

Shivsena: "उद्धव ठाकरे २०२४ मध्ये पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार, म्हणून भाजपने सरकार पाडले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 09:02 IST

राज्यात ५ वर्षे मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे राहिले तर, 2024 साली ते पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार होतील, ही भीती असल्यानेच भाजपने सरकार पाडले

उस्मानाबाद/मुंबई - राज्यातील विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंसह ४० शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात भूमिका घेतली. त्यानंतर राज्यात भाजपाच्या मदतीने सत्तांतर घडलं. परंतु खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला. ठाकरे-शिंदे गटाकडून आमचीच शिवसेना असा दावा करण्यात आला. उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्या नेत्यांच्या शिंदेंकडून पक्षाच्या पदांवर नेमणूक करण्यात आली. शिवसेनेसोबत युवासेनेतही फेरबदल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, आता युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाईंनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यात ते बंडखोर आमदार आणि फुटीर शिवसेना नेत्यांवर निशाणा साधत आहेत. 

राज्यात ५ वर्षे मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे राहिले तर, 2024 साली ते पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार होतील, ही भीती असल्यानेच भाजपने सरकार पाडले, असा आरोप शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांनी केला आहे. तसेच, भाजप विरोधी प्रत्येक राज्यात जे पक्ष आहेत, ते पक्ष उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यामागे उभे राहतील हे भाजपला कळून आले होते. म्हणूनच, कुणाला खोके दिले, कोणाला धमकी दिली, अजून काही दिलं आणि आपल्याला पायउतार व्हावं लागलं, असा गंभीर आरोप वरुण सरदेसाई यांनी केली आहे. सरदेसाई सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उस्मानाबादेत युवासेना आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी पक्षाची भूमिका मांडली. 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेच

युवासेना एकच आहे. या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आहेत. बाकी कुणाला काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येक गल्लीबोळात अनेक मंडळं असतं त्यामुळे असं मंडळ स्वत:ला कुणाला स्थापन करावसं वाटत असेल तर त्यांचा विषय आहे असं सांगत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. अलीकडेच शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी युवासेना प्रमुखपदी श्रीकांत शिंदे यांची नेमणूक करावी अशी मागणी केली होती.  

त्यांच्या संघटनेला फक्त सचिव

सरदेसाई म्हणाले की, प्रत्येक गणपती मंडळालाही अध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्यकारणी असते. परंतु त्यांची जी संघटना आहे त्याला फक्त सचिव आहे त्याला वर डोकंपण नाही आणि खाली पाय पण नाही. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सध्या आदित्य ठाकरे ज्याप्रकारे काम करतायेत त्यांच्यामागे राज्यातील जनता उभी राहतेय. गेल्या २ महिन्यात आदित्य ठाकरे राज्यातील प्रत्येक भागात फिरत आहेत. जनताही त्यांना कसा प्रतिसाद देतेय हे मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं आहे असं त्यांनी म्हटलं. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाOsmanabadउस्मानाबादVarun Sardesaiवरुण सरदेसाईprime ministerपंतप्रधान