शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

सव्वादोनशे शेतकऱ्यांना मिळेना शेततळ्याचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : वर्ष-दाेन वर्षांआड पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना शेती तोट्याची ठरत होती. त्यामुळे शासनाने दुष्काळी भागात पाणी साठवण करून कमी ...

उस्मानाबाद : वर्ष-दाेन वर्षांआड पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना शेती तोट्याची ठरत होती. त्यामुळे शासनाने दुष्काळी भागात पाणी साठवण करून कमी पाण्यात शेतपिके घेण्यासाठी मागेल त्याला शेततळे योजना कार्यान्वित केली होती. या योजनेस शेतकऱ्यांंतून चांगला प्रतिसाद मिळत होता. चार वर्षांत तब्बल ३ हजार ९२७ शेतकऱ्यांंनी शेततळे घेतले आहे. यातील सव्वादोनशे शेतकऱ्यांंना अद्यापही शेततळ्याचे अनुदान मिळाले नाही. राज्यात बहुतांश भागांत वर्ष-दोन वर्षांआड दुष्काळाला सामोरे जावे लागत असते, तर काही भागांत अल्पपर्जन्यमान झाल्याने शेती पिकांसाठी पाण्याचा प्रश्न जटिल बनत असे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना शेती करणे कठीण होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने २०१६-१७ पासून मागेल त्याला शेततळे योजना कार्यान्वित केली. जिल्ह्यात पहिल्या वर्षी या योजनेस शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शासनाने शेततळ्यांचे उद्दिष्ट वाढविले होते. मागील चार वर्षांत जिल्ह्यासाठी ३ हजार ७०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले हाेते. जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे ३ हजार ९३० शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे शेततळ्यासाठी अर्ज केले होते. कृषी विभागाने आलेले अर्ज मंजूर करून शेतकऱ्यांंना शेततळे पूर्ण करण्यास सूचना केल्या. यातील ३ हजार ९२७ शेतकऱ्यांंनी काम पूर्ण करून घेतले आहे. तीन शेतकऱ्यांच्या कामांचे फोटो काढणे शिल्लक राहिले आहे. ३ हजार ७०५ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे, तर अद्यापही सव्वादोनशे शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे.

कोट...

चार वर्षांत जिल्ह्यासाठी ३ हजार ७०० शेततळ्यांचे उद्दिष्ट मिळाले हाेते. ३ हजार ९३० शेतकऱ्यांनी शेततळ्याची कामे पूर्ण केली आहेत. शेततळ्याच्या माध्यमातून शेती सिंचनाखाली आली आहे. २२५ शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आहे. निधीची मागणी शासनाकडे केली आहे.

उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी