शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

सव्वादोनशे शेतकऱ्यांना मिळेना शेततळ्याचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : वर्ष-दाेन वर्षांआड पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना शेती तोट्याची ठरत होती. त्यामुळे शासनाने दुष्काळी भागात पाणी साठवण करून कमी ...

उस्मानाबाद : वर्ष-दाेन वर्षांआड पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना शेती तोट्याची ठरत होती. त्यामुळे शासनाने दुष्काळी भागात पाणी साठवण करून कमी पाण्यात शेतपिके घेण्यासाठी मागेल त्याला शेततळे योजना कार्यान्वित केली होती. या योजनेस शेतकऱ्यांंतून चांगला प्रतिसाद मिळत होता. चार वर्षांत तब्बल ३ हजार ९२७ शेतकऱ्यांंनी शेततळे घेतले आहे. यातील सव्वादोनशे शेतकऱ्यांंना अद्यापही शेततळ्याचे अनुदान मिळाले नाही. राज्यात बहुतांश भागांत वर्ष-दोन वर्षांआड दुष्काळाला सामोरे जावे लागत असते, तर काही भागांत अल्पपर्जन्यमान झाल्याने शेती पिकांसाठी पाण्याचा प्रश्न जटिल बनत असे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना शेती करणे कठीण होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने २०१६-१७ पासून मागेल त्याला शेततळे योजना कार्यान्वित केली. जिल्ह्यात पहिल्या वर्षी या योजनेस शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शासनाने शेततळ्यांचे उद्दिष्ट वाढविले होते. मागील चार वर्षांत जिल्ह्यासाठी ३ हजार ७०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले हाेते. जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे ३ हजार ९३० शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे शेततळ्यासाठी अर्ज केले होते. कृषी विभागाने आलेले अर्ज मंजूर करून शेतकऱ्यांंना शेततळे पूर्ण करण्यास सूचना केल्या. यातील ३ हजार ९२७ शेतकऱ्यांंनी काम पूर्ण करून घेतले आहे. तीन शेतकऱ्यांच्या कामांचे फोटो काढणे शिल्लक राहिले आहे. ३ हजार ७०५ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे, तर अद्यापही सव्वादोनशे शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे.

कोट...

चार वर्षांत जिल्ह्यासाठी ३ हजार ७०० शेततळ्यांचे उद्दिष्ट मिळाले हाेते. ३ हजार ९३० शेतकऱ्यांनी शेततळ्याची कामे पूर्ण केली आहेत. शेततळ्याच्या माध्यमातून शेती सिंचनाखाली आली आहे. २२५ शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आहे. निधीची मागणी शासनाकडे केली आहे.

उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी