शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कार्यकर्त्यांचा सूर, सेनेला ठेवा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका शिवसेनेला सोबत घेऊन लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने मांडत आहे. या पार्श्वभूमीवर ...

उस्मानाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका शिवसेनेला सोबत घेऊन लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने मांडत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी उस्मानाबादेत झालेल्या परिवार संवादात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेला दूर ठेवून स्वबळावर लढण्याचा सूर आळवला. तसेच ते गटातटावरही बरसले. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अत्यंत संयमी शब्दात समजूत काढत मार्ग काढण्याचा शब्द दिला.

उस्मानाबाद येथे उस्मानाबाद - कळंब विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणीशी संवाद साधला. यावेळी मंचावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, आ. विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जीवनराव गोरे, डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. संवादाची सुरुवातच पदाधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यापासून करण्यात आली. एका पदाधिकाऱ्याने शिवसेनेशी जुळवून घेणे कठीण असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेचे लोकप्रतिनिधी किंमत देत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर दुसऱ्यानेही तोच सूर आळवला. उलट शिवसेना राष्ट्रवादीच्या ताब्यातील संस्थेच्या कामात बाधा आणत असल्याची तक्रार केली. आतापर्यंत शिवसेनेलाच विरोध केला. आता त्यांच्याशी कसे जुळवून घ्यायचे, असा सवालही त्या पदाधिकाऱ्याने केला. अधिकारी आपली कोणतीच कामे ऐकत नाहीत, अशी तक्रार काही पदाधिकाऱ्यांनी केली. खासदार, आमदारांच्या शिफारशी आणायला सांगतात, असे सांगताच जयंत पाटील यांनी कोणती कामे, असा प्रतिप्रश्न केला. त्यावर सावरून त्या पदाधिकाऱ्याने सर्वसामान्यांच्या काही कामांची उदाहरणे दिली. पाटील यांनी कोण कामे ऐकत नाहीत, त्यांची नावे द्या, आपण स्वत: त्यांच्याशी बोलू, असे सांगून समाधान केले.

आम्हाला काही किंमत आहे का...

कोणत्याही पक्षातील गटतट, भांडणे ही राजकारणात सजीवपणाची लक्षणे समजली जातात. तोच प्रकार येथे पाहायला मिळाला. अनेक पदाधिकाऱ्यांनी गटातटावर तळमळीने भाष्य केले. पक्षाच्या बैठका कळविल्या जात नाहीत. फोटोत काही मोजकेच चेहरे दिसतात. ज्येष्ठांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत, त्यामुळे मग आम्ही नेमके जायचे कोणाकडे, अशा स्वरुपाच्या या तक्रारी होत्या. त्यावरही जयंत पाटील यांनी संयतपणे उत्तरे दिली.

राणादादांनी नुकसान केले...

राणादादा हे पक्षाची धोरणे ठरवीत होते, आता त्यांना तिकडे धोरणे कळविली जात आहेत. त्यांचे स्वत:चे नुकसान झाले अन् आपलेही, असे स्पष्टपणे सांगतानाच उपस्थित असलेल्या सर्व निष्ठावंत होतात म्हणून आपण येथे थांबला आहात. तुमची कुचंबणा होऊ देणार नाही. ज्यांचे गट आहेत, त्या सर्वांना रात्रीच बोलावून घेत आजच समेट घडवून आणतो. तुम्ही सर्वजण चांगले काम करणारे आहात. हे गटतट विसरून एकदिलाने मिळून काम करू, असे सांगत जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न या संवादाच्या अखेरीस केला.